शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:59 IST

मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

- बी.व्ही. जोंधळेआंबेडकरी चळवळीचे अभ्यासकमराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. वारकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अनंतरावांवर भागवत धर्माचे संस्कार झाले होते हे खरे; पण त्यांची खरी वैचारिक जडणघडण झाली ती हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातच. स्वामी रामानंद तीर्थ हे अनंत भालेरावांचे श्रद्धास्थान असल्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यातून स्वामी रामानंद तीर्थांविषयीचा आदरभाव पदोपदी व्यक्त झालेला दिसतो. पत्रकारितेबरोबरच एक शिक्षक, एक फर्डा, पल्लेदार वक्ता, एक उत्तम राजकीय कार्यकर्ता, अशा विविधांगी भूमिकाही त्यांनी समर्थपणे पेलल्या.नेहमी हसतमुख असणारे अनंतराव अतिशय स्पष्टवक्ते होते. जे पटेल ते समोरच्याची भीडभाड न ठेवता ते बोलून मोकळे होत असत. त्यांचा जनसंपर्क अफाट असल्यामुळे त्यांचा संपादकीय दरबार सदोदित सर्वांसाठी मोकळा असायचा. अनंतराव अष्टपैलू खरे; पण त्यांनी ‘मराठवाड्या’चे संपादक म्हणून जी लढाऊ पत्रकारिता केली ती दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सेनानी आ.कृ. वाघमारे यांनी १० फेब्रुवारी १९३८ ला‘मराठवाडा’ साप्ताहिकाची मुहूर्तमेढ रोवली होती; पण निजाम सरकारने ‘मराठवाडा’वर बंदी आणल्यामुळे वाघमारे यांनी मग निरनिराळी ११ नावे धारण करून ‘मराठवाडा’ सुरू ठेवला. निजामविरोधी लिखाणामुळे आ.कृ. वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना दीड वर्षाची शिक्षाही झाली. अशा या लढाऊ ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचे अनंतराव १९५३ साली संपादक झाले. आ.कृ. वाघमारे यांचा लढाऊबाणा त्यांनी साप्ताहिक ‘मराठवाडा’, अर्धसाप्ताहिक ‘मराठवाडा’ व पुढे दैनिक ‘मराठवाडा’तून कायम जोपासला. संपादक म्हणून भालेरावांच्या आयुष्यात अनेक वादळे निर्माण झाली; पण या वादळांना न डगमगता त्यांनी ती धीरोदात्तपणे सहन केली. ‘मराठवाडा’ अर्धसाप्ताहिकातून भालेराव यांनी पन्नालाल सुराणा यांचा साखर कारखान्यासंदर्भात एक लेख छापला होता. लेखात असा आरोप करण्यात आला होता की, साखर कारखान्यात पोत्यामागे २ रुपये कापून घेतात. या आरोपाचा रोख तत्कालीन पुरवठामंत्री होमी तल्यारखान यांच्या दिशेने होता. त्यांनी भालेराव-सुराणांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. खटल्याच्या कामकाजाच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ नयेत म्हणून होमी तल्यारखान यांच्या मागणीनुसार हा खटला इनकॅमेरा चालविण्यात आला. भालेराव-सुराणांना ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. भालेराव-सुराणांनी माफी मागितली तर त्यांची शिक्षा माफ करण्यात येईल, असा देकारही सरकारने दिला होता; पण तो नाकारून भालेराव-सुराणांनी आम्ही केलेले आरोप सिद्ध करू शकलो नाही, अशी भूमिका घेऊन तुरुंगवास पत्करला. शिक्षा भोगून जेव्हा भालेराव-सुराणा बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी सत्कार झाले; पण या स्वागताने हुरळून न जाता ‘ठेवितो हा पायी जीव थोडा’ या मथळ्याचा अग्रलेख लिहिताना भालेरावांनी ‘या तुरुंगवासाने नव्या भ्रमात अडकण्याचा प्रमाद आम्ही करणार नाही’ असे म्हटले. तात्पर्य, जमिनीवर पाय असणारा हा लढाऊ संपादक होता. १९७५ साली आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करून त्यांनी १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. लढाऊपणा हा अनंतरावांच्या पत्रकारितेचा बाणा असल्यामुळे ‘मराठवाडा’ म्हणजे भालेराव, असे समीकरणच महाराष्टÑात रूढ झाले होते.अनंत भालेरावांनी प्रारंभी ‘मराठवाडा’ पत्रातून दलितांच्या प्रश्नांना भरीव स्थान दिले होते. दलित साहित्याची चर्चा करणारा पहिला दिवाळी अंकही त्यांनी प्रसिद्ध केला होता; पण नामांतराचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा त्यांनी मराठवाड्याच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध केला. लोकशाहीनुसार लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात एकमताने संमत केलेला नामांतराचा ठराव नाकारला. मराठवाड्याच्या अस्मितेने खेडोपाडी दलितांवर मन हेलावणारे अत्याचार केले; पण याचा खेद कोणाही नामांतरविरोधकाने कधीही व्यक्त केला नाही. मराठवाड्यातील दलितांना मराठवाड्याची अस्मिता नव्हती वा नाही, असे नाही; पण नामांतरवाद्यांची अस्मिता बंधुत्वाच्या नात्याने समजून घेण्यात अनंतराव कमी पडले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात दलितांनी भाग घेतला; पण मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिताना अनंतरावांनी दलित स्वातंत्र्यसैनिकांची साधी नोंदही घेतली नाही. पत्रकार आणि इतिहासकार म्हणून भालेरावांनी दलित समाजास न्याय दिलाच नाही, ही खंत आंबेडकरानुयायांच्या मनात कायम घर करून राहिली; पण याची जाणीव पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावरही अनंतरावांच्या समर्थकांना अजूनही होत नाही. अनंतरावांच्या नामांतरविषयक भूमिकेचा विपर्यास करण्यात आला, असे ते अजूनही म्हणतात. ही बाब खेदजनकच म्हटली पाहिजे. बाकी अनंतराव पत्रकार म्हणून मोठेच होते. त्यांचे मराठवाडा प्रेम वादातीत होते, याविषयी शंकाच नाही.

टॅग्स :Journalistपत्रकार