शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

६० वर्षांनंतर आठवण महाराष्ट्राच्या निर्मात्यांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:24 IST

‘महाराष्ट्र आता बहुजन-दलित जनतेने चालवायचा’ अशा प्रकारची हुल उठवून यशवंतरावांनी समितीच्या रथी-महारथींच्या पाठीवर गोंजारले आणि या सर्व पक्षांमधून मोठमोठे नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

- डॉ. भारत पाटणकर१ मे १९६० रोजी १०५ - १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन हजारोंनी लाठ्या खाऊन आणि जेलमध्ये जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. याचा ‘मंगल कलश’ मात्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. बेळगाव - कारवार - डांग - उंबरगाव आजपर्यंत बाहेर राहिले ते राहिलेच. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा पक्षांच्या नेतृत्वाखाली हा रणसंग्राम लढविला गेला. संयुक्त महाराष्टÑ समितीने काँग्रेसचा दारुण पराभव केल्यामुळे अखेरचा टोला बसला आणि मागणी बहुतांशी मान्य झाली. ‘महाराष्ट्र आता बहुजन-दलित जनतेने चालवायचा’ अशा प्रकारची हुल उठवून यशवंतरावांनी समितीच्या रथी-महारथींच्या पाठीवर गोंजारले आणि या सर्व पक्षांमधून मोठमोठे नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. महाराष्टÑ आता विकासाची नवी वाट चालू लागल्याचे चित्र उभे केले गेले; पण महाराष्टÑ आता एक नवा शोषक वर्ग आणि नव्या प्रकारचे आधुनिक जातवर्चस्व निर्माण करून विकासाचे सहकारी वळण घेऊ लागला.या पार्श्वभूमीवर १९६० पासून सुरू होणाऱ्या दशकाच्या अखेरीला महाराष्टÑाच्या जनतेतून तरुणांच्या बुलंद सहभागातून नव्या चळवळी आणि जनचळवळींच्या नव्या दिशा पुढे आल्या. या चळवळींनी खरे म्हणजे आजचा महाराष्टÑ घडविला आहे; पण हा इतिहास अंधारातच ढकलला गेला आहे. या दशकापासून ते १९७० ते ८० च्या दशकांपर्यंत महाराष्टÑाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, जाती-अंत विषयक, स्त्री मुक्तीविषयक, कला-साहित्यविषयक क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक बदल घडविणाºया चळवळी निर्माण झाल्या. या चळवळींनी आजच्या काळापर्यंतच्या पायाभूत बदलांना दिशा दिली, आकार दिला.या चळवळींपैकी सर्वांत पहिल्यांदा महाराष्टÑाच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर, साहित्यिक कलाविषयक जीवनावर परिणाम करणारी चळवळ ‘दलित पँथर’ या नावाने पुढे आली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानाने, नव्या जाणिवेने, बिनतोड बाण्याने ही नवी चळवळ वादळी पद्धतीने उभी राहिली. आजच्या तरुण पिढीला या चळवळीचे एक खास आकर्षण आहे. याही पिढीवर तिच्या इतिहासाचा प्रभाव आहे. युवक क्रांतीदल, समाजवादी युवक दल अशा वेगवेगळ्या प्रकारे समाजवादी विचारांच्या वेगळ्या चळवळी याच काळात पुढे आल्या. त्यांनीही विद्यार्थी- युवकांमध्ये एक रसरशीत आंदोलन उभे केले. परंपरागत समाजवादी पठडीच्या बाहेर जाऊन उभे केले.

‘मागोवा’ या नावाने उभा राहिलेला नवमार्क्सवादी ग्रुप मात्र याच काळात उदयाला आला. दलित पॅँथर्स आणि युवक क्रांती दल वगैरे प्रवाहांशी जवळीकीचे नाते बांधून या ग्रुपने आदिवासी, शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया अशा सामाजिक घटकांच्या चळवळी नव्या प्रकारे उभ्या केल्या. नवी दिशा, नवा दृष्टिकोन निर्माण केला. महाराष्टÑामधल्या तरुणांना नव्या शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघण्याचा वारसा दिला. याच वारशामधून श्रमिक मुक्ती दल या नावाने एक नवी चळवळ उभी राहिली. मार्क्स - फुले - आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानांशी संयुक्त वैचारिक घुसळण करून वर्गीय - जातीय - लैंगिक शोषणाचा अंत करणारा दृष्टिकोन पर्यावरण संतुलित, शोषणमुक्त समृद्ध समाज निर्माण करण्याचे स्वप्न पुढे आणणाºया चळवळी केल्या. समन्यायी पाणी वाटपाची नवीन संकल्पना संघर्षातून प्रत्यक्षात आणणे, विकसनशील पुनर्वसन, पर्यायी ऊर्जा, विकास चळवळ अशा इतिहास घडविणाºया चळवळी केल्या. स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीच्या माध्यमातून परित्यक्तांच्या प्रश्नाला नवी दिशा दिली.याचवेळी या महाराष्टÑात रोजगार हमी या देशातला पहिलाच कायदा आणणाºया, आधी पुनर्वसन मगच धरण कायदा करण्यास भाग पाडणाºया, दुष्काळ निर्मूलनासाठी दिशा देणाºया आदिवासींचे अधिकार प्रस्थापित करणाºया चळवळी झाल्या. डॉ. बाबा आढाव, कॉ. दत्ता देशमुख, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनी यापैकी वेगवेगळ्या चळवळींचे नेतृत्व केले. सहकारी साखर कारखानदारी ही खºया अर्थाने सभासद नियंत्रित, किफायतशीर आणि वैज्ञानिक पायांवर चालू शकते, अशी चळवळसुद्धा क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनी दिशादर्शक पद्धतीने करून दाखविली.
आजपर्यंत जे जे जनतेच्या हाती विकासाच्या नाड्या देऊ शकणारे, शाश्वत विकासाचा पाया घालणारे, स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त अनुभव देणारे, शोषण संपविण्याच्या दिशेने नेणारे आणि पर्यावरण संतुलित समृद्ध समाजदर्शन करण्याकडे नेणारे झाले. ते ते या सर्व चळवळींमुळे झाले आहे.विद्रोही सांस्कृतिक चळवळ’, सामाजिक अत्याचार प्रतिबंधक - जाती अंत चळवळ अशाही चळवळींनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात ताज्या दमाची, नवी दिशा देणारे कार्यक्रम घेतले. बडवे हटाव चळवळ, विठोबा रखुमाई मुक्ती चळवळ, याही वेगळीच उदाहरणे घालून देणाºया चळवळी महाराष्टÑाला अभिमान वाटावा अशा प्रकारे झाल्या.

(श्रमिक मुक्ती दलाचे नेते)