शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

औचित्याचा भंग?

By admin | Updated: October 25, 2015 21:59 IST

बँकॉकला निघालेल्या महाराष्ट्राच्या एका सांस्कृतिक शिष्टमंडळाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून आठ लक्ष रुपये देण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या

बँकॉकला निघालेल्या महाराष्ट्राच्या एका सांस्कृतिक शिष्टमंडळाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून आठ लक्ष रुपये देण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या विरोधात काहूर माजणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या सहायता निधीमधून मुख्यमंत्र्यांनी नाचगाण्यासाठी ‘पैसे उधळले’ आणि त्यांच्यातील असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले असा आरोपही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केला गेला. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी लगेचच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करून टाकली. (राजीनामा आणि माफी यांचे गांभीर्य सारेच राजकीय पक्ष एव्हाना घालवून बसले आहेत.) दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने एक खुलासा केला. खुलाशाप्रमाणे प्रस्तुत निधीचे तीन भाग पडतात. दुष्काळ निवारण, जलयुक्त शिवार आणि अन्य. यातील तिसऱ्या श्रेणीतून आठ लाख दिल्याचा व त्यात काहीही गैर झाले नसल्याचा दावाही खुलाशाद्वारे केला गेला आहे. अर्थात हलकल्लोळ माजल्यानंतर जी माहिती उघड केली गेली ती आधीच म्हणजे माहितीच्या अधिकारात केल्या गेलेल्या पृच्छेचे समाधान करताना दिली गेली असती तर कदाचित गदारोळ टळला असता. पण तरीदेखील मुख्यमंत्र्यांनी याबाबत औचित्याचा भंग केला का, हा प्रश्न चर्चिला जाऊच शकतो. इंदिरा गांधी पंतप्रधान आणि वसंत साठे तेव्हाचे नभोवाणी मंत्री असताना देशात दूरचित्रवाणी सुरू करण्याचा त्या दोहोंचा आग्रह होता. या आग्रहाला विरोध करताना तत्कालीन विरोधी पक्षांनी देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना, दूरचित्रवाणीसारख्या चोचल्यांची गरज काय, असा खडा सवाल उपस्थित केला होता. नंतरच्या काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘अपना उत्सव’चा गाभाच मुळात सांस्कृतिक परंपरांची देवाणघेवाण हाच होता आणि तेव्हा राजीव गांधी यांच्याविरुद्धही जोरदार टीका केली गेली होती.