शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

स्वराज से राजतक

By admin | Updated: May 18, 2015 00:38 IST

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सदस्य दौऱ्यावर असला की तो ज्या गावी सूर्यास्तापूर्वी पोहोचेल, त्या गावातील सरकारी डाग बंगल्यात मांडलेल्या

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सदस्य दौऱ्यावर असला की तो ज्या गावी सूर्यास्तापूर्वी पोहोचेल, त्या गावातील सरकारी डाग बंगल्यात मांडलेल्या चौरंगावर त्याला उभे करायचे आणि तिथे हजर असलेल्या दोन-चार पोलिसांनी त्याला सलामी द्यायची, अशी एक गावंढळ पद्धत अनेक वर्षे अस्तित्वात होती. विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ती तर बंद केलीच पण मुख्यमंत्री या नात्याने जाता-येता आपल्याला कडक सॅल्यूट ठोकत राहण्याची गरज नाही, असेही निक्षून सांगितले. देशाच्या पारतंत्र्यातील या ‘राज’ व्यवस्थेच्या खुणा जितक्या लवकर पुसल्या जातील तितके ते बरे. पण देशातील नोकरशाही मात्र आजदेखील त्याच अवस्थेत आणि मन:स्थितीत वावरत असल्याने छत्तीसगड राज्यातील अमित कटारिया आणि के. सी. देवसेनापती या दोन तरुण कलेक्टरांना सरकारी भाषेतील ‘मेमो’चा सामना करणे भाग पडले आहे. या दोघांकडे त्या राज्यातील नक्षलग्रस्त अशा बस्तर आणि दंतेवाडा जिल्ह्यांचा कार्यभार आहे. अगदी अलीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी या जिल्ह्यांचा दौरा केला तेव्हा प्रथेप्रमाणे पंतप्रधानांचे स्वागत करतेवेळी उभयतांनी बंद गळ्याचा जोधपुरी कोट घातला नव्हता आणि कटारिया यांनी तर डोळ्यावर काळा चष्मा चढविला होता व त्याद्वारे त्यांनी शिष्टाचाराचा भंग केला असा त्यांच्यावर ठपका आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा वारंवार बराक असा उल्लेख करून अनौपचारिक संबंधांवर अधिक विश्वास असणाऱ्या मोदींना कदाचित कटारिया आणि देवसेनापती यांचे वर्तन खटकलेही नसेल, पण राजापेक्षा राजनिष्ठ असणाऱ्या वा तसे भासवित राहणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील बाबूंना मात्र ते खटकलेले दिसते. मुळात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तपमानात बंद गळ्याचा कोट घालून व डोळे भाजून काढणाऱ्या सूर्यप्रकाशात डोळे तसेच उघडे ठेवून वावरणे वा तशी सक्ती करणे निव्वळ अमानुष. त्यातून या तरुण अधिकाऱ्यांनी ज्या राजशिष्टाचाराचा भंग केल्याचे म्हटले गेले आहे, त्यात विशिष्ट पोषाखाचा उल्लेखही नाही. एक मात्र बरे झाले, अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांनी मात्र या कारवाईचा उघड निषेध केला आहे.