शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्वराज से राजतक

By admin | Updated: May 18, 2015 00:38 IST

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सदस्य दौऱ्यावर असला की तो ज्या गावी सूर्यास्तापूर्वी पोहोचेल, त्या गावातील सरकारी डाग बंगल्यात मांडलेल्या

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सदस्य दौऱ्यावर असला की तो ज्या गावी सूर्यास्तापूर्वी पोहोचेल, त्या गावातील सरकारी डाग बंगल्यात मांडलेल्या चौरंगावर त्याला उभे करायचे आणि तिथे हजर असलेल्या दोन-चार पोलिसांनी त्याला सलामी द्यायची, अशी एक गावंढळ पद्धत अनेक वर्षे अस्तित्वात होती. विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ती तर बंद केलीच पण मुख्यमंत्री या नात्याने जाता-येता आपल्याला कडक सॅल्यूट ठोकत राहण्याची गरज नाही, असेही निक्षून सांगितले. देशाच्या पारतंत्र्यातील या ‘राज’ व्यवस्थेच्या खुणा जितक्या लवकर पुसल्या जातील तितके ते बरे. पण देशातील नोकरशाही मात्र आजदेखील त्याच अवस्थेत आणि मन:स्थितीत वावरत असल्याने छत्तीसगड राज्यातील अमित कटारिया आणि के. सी. देवसेनापती या दोन तरुण कलेक्टरांना सरकारी भाषेतील ‘मेमो’चा सामना करणे भाग पडले आहे. या दोघांकडे त्या राज्यातील नक्षलग्रस्त अशा बस्तर आणि दंतेवाडा जिल्ह्यांचा कार्यभार आहे. अगदी अलीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी या जिल्ह्यांचा दौरा केला तेव्हा प्रथेप्रमाणे पंतप्रधानांचे स्वागत करतेवेळी उभयतांनी बंद गळ्याचा जोधपुरी कोट घातला नव्हता आणि कटारिया यांनी तर डोळ्यावर काळा चष्मा चढविला होता व त्याद्वारे त्यांनी शिष्टाचाराचा भंग केला असा त्यांच्यावर ठपका आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा वारंवार बराक असा उल्लेख करून अनौपचारिक संबंधांवर अधिक विश्वास असणाऱ्या मोदींना कदाचित कटारिया आणि देवसेनापती यांचे वर्तन खटकलेही नसेल, पण राजापेक्षा राजनिष्ठ असणाऱ्या वा तसे भासवित राहणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील बाबूंना मात्र ते खटकलेले दिसते. मुळात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तपमानात बंद गळ्याचा कोट घालून व डोळे भाजून काढणाऱ्या सूर्यप्रकाशात डोळे तसेच उघडे ठेवून वावरणे वा तशी सक्ती करणे निव्वळ अमानुष. त्यातून या तरुण अधिकाऱ्यांनी ज्या राजशिष्टाचाराचा भंग केल्याचे म्हटले गेले आहे, त्यात विशिष्ट पोषाखाचा उल्लेखही नाही. एक मात्र बरे झाले, अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांनी मात्र या कारवाईचा उघड निषेध केला आहे.