शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

पुण्याचे पाणी व राजकीय बाणी

By admin | Updated: July 21, 2016 04:11 IST

उशाला चार धरणे असतानाही पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो आहे.

उशाला चार धरणे असतानाही पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो आहे. विस्तारीत पुण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने शहर आणि ग्रामीण अशा नव्या वादाचे ग्रहण पाण्याला लागले आहे.सत्ताबदल झाला की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेची समीकरणेही कशी बदलतात याचा अनुभव पिण्याच्या पाण्यावरून रंगलेल्या राजकारणातून पुणेकर घेत आहेत. गेले नऊ महिने पाणी कपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना काय वाटते याबाबत काही कर्तव्य नसलेले राजकारणी पाण्याचे श्रेय घेण्यासाठी मात्र इरेला पेटले आहेत.कालपर्यंत पुण्याचा कळवळा असणारे गिरीष बापट आज ग्रामीण भागासाठी भांडत आहेत तर एकेकाळी पुणेकर दोनदा आंघोळ करतात म्हणून जादा पाणी देण्यास आक्षेप घेणारे अजित पवार पुण्याच्या पाण्याची काळजी वाहात आहेत. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमधील धरणातील पाणी पुण्यासाठी वर्षभर पुरेल एवढेच असल्याने केवळ शहरासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध केला. सत्तेत येण्यापूर्वी पुणेकरांच्या पाण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणाऱ्या गिरीष बापट यांना आता ग्रामीण भागातील पाण्याची चिंता लागली असल्याने, धरणांमध्ये अल्प पाणीसाठा असतानाही बापट यांनी ग्रामीण भागासाठी पाणी सोडण्यास मान्यता दिली. यंदाच्या वर्षी जून कोरडाच गेल्याने अवघे दीड टीएमसी पाणी शिल्लक राहिले. पाऊस पडला नाही तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णयही घेतला. पालक मंत्री बापट यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने पुणेकरांचा रोष त्यांच्या माथीच मारण्याचा राजकीय प्रयत्न यातून होता. मात्र, बापट यांनीही पाणीकपात करावी लागणार नाही, असे सांगून कुरघोडी केली. २ जुलैनंतर वरूणराजा पावला आणि अवघ्या १२ दिवसात पाणीपुरवठा करणारी चारही धरणे ५० टक्के भरली. जलपूजनाची घाई झालेल्या महापौर प्रशांत जगताप यांनी धरणात पाणी असले तरी, आॅगस्ट महिन्यापर्यंत पाण्याची स्थिती पाहून कपात रद्द करण्याचे सूतोवाच केले. सर्व काही सुरळीत असतानाच एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ‘धरणे भरली आहेत, पुणेकरांना दिलासा द्या’ अशी जाहीर सूचना केली. नेत्याचा आदेश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ ते पूर्ण करायलाच हवे म्हणून की काय महापौरांनी लागलीच पक्ष नेत्यांची बैठक घेऊन घाईगडबडीने पाणी कपात रद्द करण्याची घोषणा केली. कपात रद्द केली तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळणार हे लक्षात घेऊन पालकमंत्री बापट यांनी आपण कालवा समितीचे अध्यक्ष आहोत; समितीत निर्णय झाल्याशिवाय कपात मागे घेतली जाणार नाही असे सांगत महापौरांना कोंडीत पकडले. त्यांच्या साथीला महापालिका प्रशासन ठाम उभे राहिले आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी कपात मागे घेणे शक्य नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतापलेल्या महापौरांनी आयुक्त पालकमंत्र्यांच्या दबाबाखाली काम करतात, अशी थेट टीका केली. पाणी कपात रद्द न केल्यास मुख्यसभा चालू न देण्याचा इशाराही दिला. महापौरांच्या अध्यक्षतेखालीच मुख्य सभा होत असल्याने ती पार पाडण्याची जबाबदारी त्यांची असते, याचाही विसर त्यांना पडला. दुसरीकडे ज्या पुणेकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला निर्भेळ व घवघवीत यश मिळवून दिले; त्यांना प्राधान्याने पाणी देण्याचा सोईस्कर विसर पालकमंत्र्यांना पडला. मात्र, राजकीय पक्षांच्या साठमारीत पुणेकरांची तहान भागविण्याचा विसर सर्वांना पडला, हे दुर्दैव.गांभीर्याची बाब म्हणजे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन होत असलेल्या या राजकारणाने ग्रामीण- शहरी वाद विकोपास जाण्याची भीती आहे. आजपर्यंत राज्या-राज्यांत, जिल्ह्या-जिल्ह्यात वाद होते. पण श्रेयवादाच्या चढाओढीत जिल्ह्यांतर्गत वाद उद्भवणे निश्चितच पुण्याच्या व पुणेरांच्या हिताचे नाही. - विजय बाविस्कर