शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: January 7, 2015 22:43 IST

प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली. पंतप्रधान मोदी हे मुरब्बी राजकारणी आहेत. कुठे काय बोलायचे, याचे नेमके भान त्यांना आहे. कोणत्या ठिकाणी कुणाला पुढे करायचे, याचेही तंत्र चांगलेच अवगत आहे. ‘मै प्रधानमंत्री नहीं, प्रधानसेवक हूँ’ असे म्हणून थेट जनतेच्या हृदयाला हात घालण्याची खुबी करवीरवासीयांनीही अनुभवली. आमदार-खासदारांप्रमाणे ‘मै कामदार हूँ’ असे म्हणत त्यांनी वेगळी ओळख ठसविण्याचा चतुराईने प्रयत्न केला. त्यांनी आश्वासन कुठलेच दिले नाही; परंतु विविध प्रलंबित मागण्यांबाबत अतिशय मुत्सद्दीपणाने मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले. टोल प्रश्न, शहर आराखडा, खंडपीठ, कोकण रेल्वे आणि विमानतळाचे राष्ट्रीयीकरण हे प्रश्न पंतप्रधानांसमोर आले. परंतु, तेल लावलेला मल्ल जसा कुणाच्या हाती सहसा लागत नाही, त्याप्रमाणे राजकारणाच्या मातीत मुरलेल्या मोदींनी आपल्या अंगावर काही घेतले नाही. समस्यांचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ‘टोल’वला. राष्ट्रीय प्रश्नांवर पंतप्रधान आश्वासन देऊ शकले असते; परंतु त्यांनी ते हुशारीने टाळले आणि प्रलंबित प्रश्न इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे रखडत न ठेवता राज्यात देवेंद्र तडीस लावतील, असा दिलासा दिला. आश्वासनांची खैरात न करता त्यांनी हळूच अंग काढून घेतले. परंतु, त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या प्रश्नांना चालना मिळण्याच्या करवीरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या ऊसदराच्या प्रश्नावर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केले नाही. शेतकऱ्यांना किफायतशीर रास्त भाव मिळणे गरजेचे आहेच; परंतु साखरेच्या ढासळत्या किमतीमुळे कारखाने कर्जात बुडू नयेत, याबाबतही सरकारला विचार करावा लागेल. पुण्यात पंतप्रधानांनी सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत आश्वासक भूमिका जाहीर केली. सरकारी हस्तक्षेप कमी करून जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांना सक्षम करण्याची ग्वाही त्यांंनी दिली. बँकांना भविष्यात स्वायत्तता दिली जाईल व सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद जागवत वित्तीय व्यवस्थापनासंदर्भात मौलिक दिशादर्शन व सोनेरी स्वप्नांची चाहूल देण्याचे काम पंतप्रधानांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची ही भेट चौफेर विकासाची नांदी ठरेल? स्वरोत्सवाची सांगतासवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाची सुरेल सांगता सवाई गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकेने झाली. वॉटरप्रूफ मांडवाखाली झालेल्या या उत्तरार्धात संगीतरसिक सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाले. एकाहून एक सरस, सुरस व सुरेल मैफली या स्वरोत्सवात रंगल्या. नवोदितांनी केलेले ‘सवाई’ सादरीकरण व बुजुर्ग कलावंतांचा अभिजात ‘भीमसेनी’ आविष्कार यांचा अप्रतिम मिलाफ संगीतरसिकांना अनुभवायला मिळाला. हा संगीतानंद वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना आता घरबसल्या अनुभवता येईल, ही यंदाची विशेष उपलब्धी म्हणावी लागेल. स्वर्गीय तालस्वरांचा आनंद तनामनात साठवत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या हृद्गतासह रसिकांनी या स्मरणीय स्वरयज्ञाला निरोप दिला.विज्ञानयोगी हरपलाअवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे प्रमुख शिल्पकार, राष्ट्रीय विज्ञान धोरणाला आकार देणारे बिनीचे शिलेदार आणि ‘मॉन्सून मॉडेल’चे जनक डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या निधनाने एक विज्ञानयोगी हरपला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेल्या गोवारीकरांच्या अवकाशाला गवसणी घालणाऱ्या देदीप्यमान कारकिर्दीची पायाभरणी कोल्हापुरात झाली. अखेरच्या श्वासापर्यंत हा विज्ञानयोगी विविध संशोधन प्रकल्पांत कार्यमग्न राहिला. डॉ. गोवारीकर हे तमाम संशोधकांसाठी दीपस्तंभ होते. या ‘अवकाशव्यापी’ अग्रणी शास्त्रज्ञाची अनुपस्थिती तराळ-अंतराळाला अस्वस्थ करणारी आहे. एकीकडे देशात नवे संशोधक, शास्त्रज्ञ घडावेत आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना डॉ. गोवारीकरांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ शास्त्रज्ञाचे आपल्यातून जाणे, ही न भरून येणारी अवकाश-पोकळी आहे. - विजय बाविस्कर