शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: January 7, 2015 22:43 IST

प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली. पंतप्रधान मोदी हे मुरब्बी राजकारणी आहेत. कुठे काय बोलायचे, याचे नेमके भान त्यांना आहे. कोणत्या ठिकाणी कुणाला पुढे करायचे, याचेही तंत्र चांगलेच अवगत आहे. ‘मै प्रधानमंत्री नहीं, प्रधानसेवक हूँ’ असे म्हणून थेट जनतेच्या हृदयाला हात घालण्याची खुबी करवीरवासीयांनीही अनुभवली. आमदार-खासदारांप्रमाणे ‘मै कामदार हूँ’ असे म्हणत त्यांनी वेगळी ओळख ठसविण्याचा चतुराईने प्रयत्न केला. त्यांनी आश्वासन कुठलेच दिले नाही; परंतु विविध प्रलंबित मागण्यांबाबत अतिशय मुत्सद्दीपणाने मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले. टोल प्रश्न, शहर आराखडा, खंडपीठ, कोकण रेल्वे आणि विमानतळाचे राष्ट्रीयीकरण हे प्रश्न पंतप्रधानांसमोर आले. परंतु, तेल लावलेला मल्ल जसा कुणाच्या हाती सहसा लागत नाही, त्याप्रमाणे राजकारणाच्या मातीत मुरलेल्या मोदींनी आपल्या अंगावर काही घेतले नाही. समस्यांचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ‘टोल’वला. राष्ट्रीय प्रश्नांवर पंतप्रधान आश्वासन देऊ शकले असते; परंतु त्यांनी ते हुशारीने टाळले आणि प्रलंबित प्रश्न इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे रखडत न ठेवता राज्यात देवेंद्र तडीस लावतील, असा दिलासा दिला. आश्वासनांची खैरात न करता त्यांनी हळूच अंग काढून घेतले. परंतु, त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या प्रश्नांना चालना मिळण्याच्या करवीरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या ऊसदराच्या प्रश्नावर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केले नाही. शेतकऱ्यांना किफायतशीर रास्त भाव मिळणे गरजेचे आहेच; परंतु साखरेच्या ढासळत्या किमतीमुळे कारखाने कर्जात बुडू नयेत, याबाबतही सरकारला विचार करावा लागेल. पुण्यात पंतप्रधानांनी सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत आश्वासक भूमिका जाहीर केली. सरकारी हस्तक्षेप कमी करून जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांना सक्षम करण्याची ग्वाही त्यांंनी दिली. बँकांना भविष्यात स्वायत्तता दिली जाईल व सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद जागवत वित्तीय व्यवस्थापनासंदर्भात मौलिक दिशादर्शन व सोनेरी स्वप्नांची चाहूल देण्याचे काम पंतप्रधानांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची ही भेट चौफेर विकासाची नांदी ठरेल? स्वरोत्सवाची सांगतासवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाची सुरेल सांगता सवाई गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकेने झाली. वॉटरप्रूफ मांडवाखाली झालेल्या या उत्तरार्धात संगीतरसिक सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाले. एकाहून एक सरस, सुरस व सुरेल मैफली या स्वरोत्सवात रंगल्या. नवोदितांनी केलेले ‘सवाई’ सादरीकरण व बुजुर्ग कलावंतांचा अभिजात ‘भीमसेनी’ आविष्कार यांचा अप्रतिम मिलाफ संगीतरसिकांना अनुभवायला मिळाला. हा संगीतानंद वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना आता घरबसल्या अनुभवता येईल, ही यंदाची विशेष उपलब्धी म्हणावी लागेल. स्वर्गीय तालस्वरांचा आनंद तनामनात साठवत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या हृद्गतासह रसिकांनी या स्मरणीय स्वरयज्ञाला निरोप दिला.विज्ञानयोगी हरपलाअवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे प्रमुख शिल्पकार, राष्ट्रीय विज्ञान धोरणाला आकार देणारे बिनीचे शिलेदार आणि ‘मॉन्सून मॉडेल’चे जनक डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या निधनाने एक विज्ञानयोगी हरपला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेल्या गोवारीकरांच्या अवकाशाला गवसणी घालणाऱ्या देदीप्यमान कारकिर्दीची पायाभरणी कोल्हापुरात झाली. अखेरच्या श्वासापर्यंत हा विज्ञानयोगी विविध संशोधन प्रकल्पांत कार्यमग्न राहिला. डॉ. गोवारीकर हे तमाम संशोधकांसाठी दीपस्तंभ होते. या ‘अवकाशव्यापी’ अग्रणी शास्त्रज्ञाची अनुपस्थिती तराळ-अंतराळाला अस्वस्थ करणारी आहे. एकीकडे देशात नवे संशोधक, शास्त्रज्ञ घडावेत आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना डॉ. गोवारीकरांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ शास्त्रज्ञाचे आपल्यातून जाणे, ही न भरून येणारी अवकाश-पोकळी आहे. - विजय बाविस्कर