शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

पुण्याची शान आणि अभिमान

By admin | Updated: March 24, 2016 01:18 IST

सचोटी, चिकाटी, शिस्त आणि परिश्रम या सर्वच स्तरांवर पुणेकरांच्या मनात ‘चितळे बंधू’ या ब्रँडविषयी एक आदराची, आत्मीयतेची व जिव्हाळ््याची भावना आहे़

सचोटी, चिकाटी, शिस्त आणि परिश्रम या सर्वच स्तरांवर पुणेकरांच्या मनात ‘चितळे बंधू’ या ब्रँडविषयी एक आदराची, आत्मीयतेची व जिव्हाळ््याची भावना आहे़ पुणेकरांची एक खासियत अशी, की गाण्यातला असो की खाण्यातला; त्यांना दर्जा लागतोच. ‘चितळे बंधू मिठाईवाले’चं स्थान पुण्याच्या खाद्य संस्कृतीत अविभाज्य आहे़, ते या दर्जामुळेच. एरवी चितळ्यांच्या वक्तशीरपणावर चिमटे काढले जात असले तरी चितळ््यांच्या पदार्थांना कुणी नावं ठेवली तर आपल्यावरच हा आरोप आहे असं मानून पुणेकर विरोध करतील. ही आत्मीयता चितळ्यांनी आपोआप मिळवलेली नाही. खरं तर चितळे हे काही मूळचे पुणेकर नाहीत़ कृष्णेकाठी भिलवडीत बी़ जी़ चितळे यांनी आपली दूध डेअरी १९४०मध्ये सुरू केली़ दुसऱ्या महायुद्धाच्या अतिशय प्रतिकूल काळात त्यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते रेल्वेने मुंबईला पाठविण्यास सुरुवात केली़ व्यवसायाच्या वृद्धीसाठी रघुनाथराव आणि त्यांचे बंधू राजाभाऊ चितळे हे पुण्यात आले़ त्यांनी कुंटे चौकात दुकान सुरू करून दूध, चक्का, लोणी यांची विक्री सुरू केली़ त्याच्या जोडीला पेढे आणि बर्फीचाही घाट घातला़ दुधाचे रतीब टाकत असतानाच १९५४मध्ये त्यांनी डेक्कन जिमखान्यावर दुकान थाटलं़ या व्यवसायाला एक आधुनिक रूप देताना त्यांनी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्याचा विचार सुरू केला़ जपानमधील प्रदर्शनात राजाभाऊ चितळे यांनी १९७०मध्ये मिल्क पाऊच पॅकिंग मशीन पाहिले़ तोपर्यंत चरवीने दुधाचा रतीब घालण्याची पद्धत होती़ त्याचा ध्यास घेऊन केंद्राच्या अनेक परवानग्या मिळवून हे फ्रेंच मशीन चितळ्यांच्या दारात आले़ अशा प्रकारचे भारतातील हे पहिले मशीन होते़ अत्याधुनिकीकरणातून त्यांनी उद्योजकतेची एक नवी वाट आखून दिली. पॅकबंद दूध पिशवीमुळे भेसळीला वाव राहिला नाही आणि ‘चितळे दूध’ हा ब्रँड बनला़ या साऱ्या प्रवासात भाऊसाहेबांची दूरदृष्टी फार महत्त्वाची ठरली. भाऊसाहेब हे कुमारवयात सुरतेला होते़ खरं तर बाकरवडी हा गुजराथी पदार्थ; पण भाऊसाहेबांनी तिला मराठी अंगरखा चढवला. भाऊसाहेबांनीच गुजरातेतून आचारी आणून मराठी बाकरवडीचा प्रयोग केला़ इतकंच नव्हे, ते स्वत:ही बाकरवडी करायला शिकले़ सुरुवातीला ५०-१०० किलो बाकरवडी दिवसाकाठी बनायची़ डेक्कन आणि सदाशिव पेठेतल्या चोखंदळ पुणेकरांनी पसंतीची पावती दिल्यावर बघता-बघता खप वाढला़ कारागीर वाढविले, तरी मागणी-पुरवठ्याचा मेळ बसेना़ त्यातून सगळ्यांना मिळावी, या हेतूने बाकरवडीचे रेशनिंग सुरू झाले. पुढे तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांची सांगड घालून मशीनवर बाकरवडी तयार होऊ लागली़ नव्या पिढीने तिचे मार्केटिंग करून बाकरवडी जगभर लोकप्रिय बनवली़ पुण्याहून बाहेरगावी जाताना नातेवाईकांना काय घेऊन जायचे असा प्रश्न आता पडत नाही़ आपसुकपणे बाकरवडी आणि तीही चितळ्यांची हे एक समीकरणच झाले आहे़ या साऱ्या प्रवासात भाऊसाहेब दीपस्तंभाप्रमाणे सातत्याने मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. केवळ व्यवसायातच नाही, तर सामाजिक कार्यातही भाऊसाहेबांचा नेहमीच पुढाकार असे़ त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळी, जोशी हॉस्पिटल, चित्पावन संघ, पुणे हार्ट ब्रिगेड आणि मिठाई व दुग्धव्यवसाय संघ यांचे अध्यक्षपद भूषविले़ चिपळूण येथील विंध्यवासिनी देवस्थान व अंबाजोगाई येथील भक्तनिवास यासारख्या अनेक धार्मिक व सामाजिक कार्यांत त्यांचा सिंहाचा वाटा होता़ अनेक सामाजिक संस्थांना भाऊसाहेब चितळे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले़ आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला होता़ त्यामुळेच ‘चितळे बंधू’ म्हटले, की एका मराठी उद्योजक घराण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही़ भाऊसाहेबांची निरंतर मेहनत आणि चिकाटी नवउद्योजकांना, विशेषत: मराठी तरुणांना निश्चितच स्फूर्ती आणि प्रेरणा दिल्याशिवाय रहाणार नाही़ - विजय बाविस्कर