शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 02:48 IST

देशभरातील विद्यापीठे म्हणजे मोकळ्या विचारांची मशागत करण्याचे स्थान आहे. येथे शिकणारे विद्यार्थी आणि अध्यापकांनी कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला थारा न देता योग्य

देशभरातील विद्यापीठे म्हणजे मोकळ्या विचारांची मशागत करण्याचे स्थान आहे. येथे शिकणारे विद्यार्थी आणि अध्यापकांनी कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला थारा न देता योग्य चर्चा आणि वादविवादावर भर दिला पाहिजे, असा मोलाचा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे. राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतो. हा प्रमुख पालकत्वाच्या नात्याने आपल्या कुटुंबासम देशातील तरुणपिढीला मार्ग भरकटण्यापासून परावृत्त करीत असेल तर कनिष्ठांसोबतच ज्येष्ठांनीसुद्धा त्याचा गांभीर्याने विचार करावयास हवा. विद्यापीठांमधूनच भविष्यातील नेतृत्व आकाराला येत असते, आणि या नेतृत्वावरच उद्याच्या भारताची जबाबदारी असल्याने त्यांच्यात परिपक्वतेसोबतच सहिष्णुता, सर्वसमावेशकता आदि गुण अपेक्षित असतात. सुदैवाने आपल्या देशात विद्यापीठांची समृद्ध परंपरा आहे. ज्ञानाचा सागर असलेल्या शिक्षणाच्या या मंदिरात अगणित शिष्य घडले आहेत. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांपासून देशातील काही विद्यापीठांमध्ये कमालीची अशांतता आणि हिंसक वातावरण निर्माण झाल्याने विद्यार्थीमन कलुषित होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना संघर्ष आणि हिंसाचार करताना बघणे ही मोठी शोकांतिका असल्याचे जे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहे त्याला गेल्या आठवडाभरापासून दिल्ली विद्यापीठातील रामजस कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या पक्षांशी संबंधित संघटना ‘आयसा’ यांच्यात सुरू असलेल्या हिंसक संघर्षाचा संदर्भ आहे. पूर्वी विद्यापीठांमध्ये अत्यंत खेळीमेळीत विद्यार्थी संघाच्या निवडणुका होत असत. वैचारिक संघर्ष व वादविवादही घडत. परंतु हा संघर्ष विद्यार्थी संघटनांपुरताच मर्यादित राहात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक चढाओढ दिसून येई. आता शिक्षण क्षेत्रातही राजकारण शिरल्याने वातावरण बिघडले. देशातील समस्त विद्यापीठात आघाडीवर असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गेल्या वर्षी विद्यार्थी हिंसाचाराच्या भोवऱ्यात सापडले तेव्हासुद्धा राष्ट्रपतींनी भविष्यातील धोक्याबाबत सतर्क केले होते, हे विशेष ! आज जेएनयूमधील हे लोण आणखीही काही विद्यापीठात पसरले आहे. पुणे विद्यापीठात अभाविप आणि स्टुडण्ट्स फेडरेशन आॅफ इंडिया यांच्यात झालेला राडा हा त्यातलाच प्रकार. खरे तर विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा द्यायला हवा. पण त्या आज राजकीय पक्षांचे अजेंडे राबविण्यात व्यस्त आहेत. भाजपा असो वा काँग्रेस, डावे पक्ष सर्वच विद्यार्थ्यांच्या माध्यमाने पोळी शेकून घेण्याच्या मागे लागले आहेत. कन्हय्याकुमार प्रकरणावरून सर्वांनीच याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठातील या घटनांना आवर घालायचा असल्यास सर्वप्रथम राजकीय पक्षांनी शिक्षण क्षेत्रातील हस्तक्षेप थांबवायला हवा.