शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रभूजी, महाराष्ट्राला काय देणार?

By admin | Updated: February 21, 2015 02:17 IST

दहा वर्षांत एकूण ९९ रेल्वेमार्ग जाहीर करण्यात आले. पैकी केवळ एकच पूर्ण झाला. अनेक मार्ग ३०-४० वर्षे जुने आहेत. रेल्वेच्या अनेक योजना पाच वर्षेही पूर्ण होणार नाहीत अशा आहेत.

रेल्वेची आर्थिक परिस्थिती बिघडण्याला यूपीए सरकार कसे कारणीभूत होते, हे सांगून वेळ मारून नेण्यात आली होती खरी, पण पहिल्या शंभर दिवसांतच सदानंद गौडा नापास झाले आणि त्यांच्या जागी सुरेश प्रभू यांना आणावे लागले. प्रभूंनी हाती छडी घेऊन कामाला धडाकेबाज सुरुवात केली, पण पैशाचे सोंग कसे आणणार? पेशाने सीए असलेले प्रभू आल्या दिवसापासून रेल्वेची बॅलन्सशिट घेऊन बसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेली वर्ल्डक्लास रेल्वे त्यांना प्रत्यक्षात उतरवायची आहे. काम सोपे नाही.दहा वर्षांत एकूण ९९ रेल्वेमार्ग जाहीर करण्यात आले. पैकी केवळ एकच पूर्ण झाला. अनेक मार्ग ३०-४० वर्षे जुने आहेत. रेल्वेच्या अनेक योजना पाच वर्षेही पूर्ण होणार नाहीत अशा आहेत. ‘मॅन आॅफ इनोव्हेशन’ अशी ख्याती असलेले प्रभू यावेळी ‘आउट आॅफ बॉक्स’ योजना नक्कीच घेऊन येणार आहेत. त्यामुळे नवी भर पडून अर्थसंकल्प रंजक असेल. ६० हजार कोटींची आवश्यकता असलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेन व मेट्रो शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड ट्रेन्सचा सध्या विचारही करायला नको. मराठी प्रभूंकडून महाराष्ट्राला काय मिळणार, असे विचारले जात आहे. त्याचे कारण, ज्या भागाचा रेल्वेमंत्री असतो, त्या क्षेत्राचे भले करण्याचा चंग तो बांधतो. अवघे साडेचार महिन्यांचे रेल्वेमंत्री असलेल्या सदानंद गौडा यांनीही पाच मोठ्या योजना कर्नाटकात नेल्या होत्या. याउलट मराठी माणूस महाराष्ट्राशी नाते सांगतो, पण देशाचा विचार करतो. त्यामुळे यापूर्वी हे खाते महाराष्ट्राकडे येऊनही महाराष्ट्राला फारसा फायदा झालेलाच नव्हता. प्रभूंकडून अपेक्षा आहेत.महाराष्ट्राची रेल्वे कनेक्टिव्हिटी एकसंध नाही. कोकण रेल्वेचे कौतुक होते, मुंबईला थोडेफार मिळते आणि महाराष्ट्र उघड्यावरच राहतो. रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, विद्युतीकरण राहतो. रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, विद्युतीकरण व मोठ्या पुलांच्या बळकटीकरणासोबतच अनेक ठिकाणी मानवरहित फाटकांच्या समस्येचे निराकरण करण्याची नितांत गरज आहे. मुंबईतून मोठा महसूल रेल्वेला मिळतो, पण मुंबईकरांच्या सुरक्षित जीवनाशी रेल्वेला घेणे-देणे नाही. रेल्वेमुळे जीव गेलेल्यांची संख्या नजरेखालून घालण्याचा दुर्दैवी छंद मुंबईकरांना आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद या मार्गाचे सुसूत्रीकरण कधी होईल? नांदेडला मध्य रेल्वेचे प्रादेशिक मुख्यालय कधी मिळेल? वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गाला पूर्ण आर्थिक ताकद कधी मिळेल? पुणे-कोल्हापूर- चिपळूण मार्ग कोकण रेल्वेला जोडण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचे घोंगडे अजून भिजतच आहे, असे अनेक विषय प्रभूंच्या दिशेने जातात. शेती उत्पादनासह नाशवंत पदार्थांच्या निर्मिती ते बाजारपेठ या सुलभ वाहतुकीसाठी स्पेशल किसान एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विदर्भ भूमीतून तिचा प्रारंभ झाल्यास प्रभूंचा ठसा उमटेल. पुढच्या आठवड्यात सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी ‘अच्छे दिन’ घेऊन येतो का, त्याचीच उत्सुकता आहे. आबा व दिल्लीदिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या तासगावच्या विधानसभा निवडणुकीतील यंदाच्या विजयाची आठवण कायम ताजी राहील. आबांना पराभूत करायचेच हा चंग भाजपाने बांधला होता. भाजपाची फौज तासगावात फिरत होती. प्रचारयुद्ध शिगेला होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगावात सभा घेतली. विशेष म्हणजे, मोदींच्या सभेमुळे वातावरण बदलल्याची जाणीव होत असल्याने शरद पवार यांनी तासगावची सभा रद्द केली. आबांच्या मतदारसंघात पवार फिरकलेच नाहीत. (असं सांगतात की आबांनीच त्यांना येऊ नका म्हटले होते.) आबांनी एकहाती किल्ला लढवला.. आणि पूर्वी कधीच नव्हे एवढ्या मोठ्या फरकाने आबांनी विजय मिळवला. राज्यात मोदींच्या २४ सभा झाल्या होत्या. त्यात तासगावची एक ! पण मोदींची सभा होऊनही आबा मोठ्या फरकाने विजयी झाल्याने भाजपाने त्या मतदारसंघाचा अभ्यास सुरू केला. दुर्दैवाने आबा गेले..- रघुनाथ पांडे