शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

‘इशरत’वरुन सुरु झालेला पोरखेळ

By admin | Updated: March 4, 2016 00:02 IST

सध्या देशातील राजकारणात ‘दहशतवाद’ हा परवलीचा शब्द बनवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘दहशतवादा’ला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली त्याबाबतची समाजाची

सध्या देशातील राजकारणात ‘दहशतवाद’ हा परवलीचा शब्द बनवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘दहशतवादा’ला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली त्याबाबतची समाजाची आणि राज्यसंस्थेचीही समज किती तोकडी आहे, याचा प्रत्यय वारंवार येत गेला असला तरी त्यापासून धडा घेण्याचा विचार कुणीही मनात आणीत नाही. ‘इशरत’चे प्रकरण हे या शहामृगी प्रवृत्तीचे ताजे उदाहरण. गेल्या अकरा वर्षांत हे प्रकरण या ना त्या निमित्ताने राजकीय सोईसाठी चर्चेत आणले जात आले आहे. ‘जेएनयु’, हैदराबाद विद्यापीठ इत्यादी प्रकरणांनी देशात ‘राष्ट्रभक्ती’चा पूर आणला जात असतानाच या प्रकरणावरून चर्चा रंगवली जात आहे व राजकीय हिशेब चुकते करण्याचा डाव खेळला जात आहे. निमित्त घडले आहे, ते २६/११च्या हल्ल्यासाठी अमेरिकेतील तुरूंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने भारतीय न्यायालयात दिलेल्या साक्षीचे. ‘इशरत ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या महिला विभागात होती आणि आत्मघातकी बॉम्बहल्ले करण्यासाठी तिचा वापर केला जाणार होता’, असे हेडलीने त्याच्या साक्षीत सांगितले व त्यावरुन वाद सुरू झाला. माजी गृहमंत्री चिदंबरम आणि त्यांचे त्यावेळचे सचिव पिल्लई हेही या वादात उतरून परस्परांच्या विरोधात जाहीर विधाने करू लागले. त्यातूनच सुप्त ‘हिंदू-मुस्लीम’ राजकारण खेळले जात आहे. वस्तुत: इशरतचे प्रकरण अगदी चार वर्षांपर्यत फक्त ‘बनावट चकमकी’चे होते. इशरत व तिच्या बरोबरचे तिघे जण ज्या चकमकीत मारले गेले, ती बनावट होती, हे विविध तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात सिद्ध झाले आहे. कनिष्ठ व उच्च न्यायालयानेही ते सत्य म्हणून स्वीकारले आहे आणि त्यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. इशरतचा ‘लष्कर’शी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, अशा निष्कर्षापर्यंत गुजरात उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ज्याने तपास केला, ते विशेष तपास पथक सांगत आले आहे. तेव्हा चकमक बनावट आणि इशरत दहशतवादी नव्हती, हे दोन मुद्दे प्रथमदर्शनी भारताच्या न्यायालयीन यंत्रणेने स्वीकारले आहेत. अशा परिस्थितीत हेडली काय सांगतो, यावर आपण का व कसा विश्वास ठेवायचा? मात्र हा प्रश्न राजकारण्यांना पडत नाही. दहशतवादाच्या मुद्यावरून असे सत्तालालसेचे उथळ राजकारण खेळण्याने देशाच्या सुरक्षेलाच कसा धोका पोचू शकतो, याची काडीइतकीही पर्वा या नेतेमंडळींना नसते. इशरतच्या मुद्यावरून राजकारण खेळणे म्हणजे देशाच्या सुरक्षेचा सौदा करणे आहे. मुळात २६/११ च्या हल्ल्यानंतर २००९ साली हेडलीला अमेरिकेने पकडले. नंतर खटला चालून त्याला शिक्षा झाली. पण भारतीय न्यायालयात त्याला (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) उभे करण्याची परवानगी अमेरिकेने पुढील पाच वर्षे का दिली नाही आणि आताच का दिली, या प्रश्नाचे उत्तर अफगाणिस्तानातील परिस्थितीत आहे. अमेरिकेला त्या देशातून सैन्य माघारी घ्यायचे आहे. तेथे राजकीय स्थैर्य आल्यासच ते शक्य आहे. आपली अध्यक्षीय कारकीर्द संपण्याआधी ओबामा यांना हे घडवून आणायचे आहे. पण तालिबानच्या काही गटांना सत्तेत सहभागी करून घेतल्याविना हे शक्य नाही, या निष्कर्षापर्यंत अमेरिका आली आहे. तसे करण्यासाठी तिला पाकची मदत लागणार आहे; कारण तालिबानी गटांपैकी जे प्रबळ आहेत, त्यांच्यावर पाकच्या ‘आएसआय’चे नियंत्रण आहे. भारताचा अफगाणिस्तानातील वावर थांबवा, तरच आम्ही मदत करू, अशी पाकने अट घातली आहे. उलट अफगाणिस्तानातील अश्रफ घनी सरकारला पाकची लुडबुड डाचत आहे. त्यांना भारत हवा आहे. हा तिढा सोडवण्यासाठी पाकशी चर्चा करा, असे दडपण एकीकडे अमेरिका भारतावर आणत आहे, तर दुसऱ्या बाजूस ‘तुम्ही दहशतवादाला पाठबळ कसे देत आहात, हे जगापुढे आणू शकतो’, हे पाकला बजावण्यासाठी हेडलीसारख्या दशतवाद्यांना वापरले जात आहे. हेडलीने जे भारतीय न्यायालयात सांगितले, त्याचा सर्व भर हा पाक लष्कर व दहशतवादी यांच्यात कसे घनिष्ट संबंध होते, यावरच होता. ‘इशरत’ हा मुद्दा सरकारी वकिलांनी प्रश्नाद्वारे साक्षीत आणला, हेही लक्षात ठेवायला हवे. अमेरिकेच्या या डावपेचांना उत्तर म्हणून पाक अफगाणिस्तानातील भारतीय वकिलातीत वा वाणिज्य दूतावासावर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. पठाणकोट हल्ल्याच्या वेळेसच अफगाणिस्तानातील मझर-ए-शरीफ या शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला. आता इशरतचे प्रकरण भारतीय राजकारणात रंगत असताना जलालाबाद येथील वाणिज्य दूतावासावर बुधवारी हल्ला झाला. जोपर्यंत देशात दहशतवादावरून असा राजकीय पोरखेळ सुरू ठेवला जाईल तोपर्यंत पाकला असे डावपेच खेळणे सहज शक्य होणार आहे.