शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

‘इशरत’वरुन सुरु झालेला पोरखेळ

By admin | Updated: March 4, 2016 00:02 IST

सध्या देशातील राजकारणात ‘दहशतवाद’ हा परवलीचा शब्द बनवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘दहशतवादा’ला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली त्याबाबतची समाजाची

सध्या देशातील राजकारणात ‘दहशतवाद’ हा परवलीचा शब्द बनवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘दहशतवादा’ला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली त्याबाबतची समाजाची आणि राज्यसंस्थेचीही समज किती तोकडी आहे, याचा प्रत्यय वारंवार येत गेला असला तरी त्यापासून धडा घेण्याचा विचार कुणीही मनात आणीत नाही. ‘इशरत’चे प्रकरण हे या शहामृगी प्रवृत्तीचे ताजे उदाहरण. गेल्या अकरा वर्षांत हे प्रकरण या ना त्या निमित्ताने राजकीय सोईसाठी चर्चेत आणले जात आले आहे. ‘जेएनयु’, हैदराबाद विद्यापीठ इत्यादी प्रकरणांनी देशात ‘राष्ट्रभक्ती’चा पूर आणला जात असतानाच या प्रकरणावरून चर्चा रंगवली जात आहे व राजकीय हिशेब चुकते करण्याचा डाव खेळला जात आहे. निमित्त घडले आहे, ते २६/११च्या हल्ल्यासाठी अमेरिकेतील तुरूंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने भारतीय न्यायालयात दिलेल्या साक्षीचे. ‘इशरत ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या महिला विभागात होती आणि आत्मघातकी बॉम्बहल्ले करण्यासाठी तिचा वापर केला जाणार होता’, असे हेडलीने त्याच्या साक्षीत सांगितले व त्यावरुन वाद सुरू झाला. माजी गृहमंत्री चिदंबरम आणि त्यांचे त्यावेळचे सचिव पिल्लई हेही या वादात उतरून परस्परांच्या विरोधात जाहीर विधाने करू लागले. त्यातूनच सुप्त ‘हिंदू-मुस्लीम’ राजकारण खेळले जात आहे. वस्तुत: इशरतचे प्रकरण अगदी चार वर्षांपर्यत फक्त ‘बनावट चकमकी’चे होते. इशरत व तिच्या बरोबरचे तिघे जण ज्या चकमकीत मारले गेले, ती बनावट होती, हे विविध तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात सिद्ध झाले आहे. कनिष्ठ व उच्च न्यायालयानेही ते सत्य म्हणून स्वीकारले आहे आणि त्यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. इशरतचा ‘लष्कर’शी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, अशा निष्कर्षापर्यंत गुजरात उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ज्याने तपास केला, ते विशेष तपास पथक सांगत आले आहे. तेव्हा चकमक बनावट आणि इशरत दहशतवादी नव्हती, हे दोन मुद्दे प्रथमदर्शनी भारताच्या न्यायालयीन यंत्रणेने स्वीकारले आहेत. अशा परिस्थितीत हेडली काय सांगतो, यावर आपण का व कसा विश्वास ठेवायचा? मात्र हा प्रश्न राजकारण्यांना पडत नाही. दहशतवादाच्या मुद्यावरून असे सत्तालालसेचे उथळ राजकारण खेळण्याने देशाच्या सुरक्षेलाच कसा धोका पोचू शकतो, याची काडीइतकीही पर्वा या नेतेमंडळींना नसते. इशरतच्या मुद्यावरून राजकारण खेळणे म्हणजे देशाच्या सुरक्षेचा सौदा करणे आहे. मुळात २६/११ च्या हल्ल्यानंतर २००९ साली हेडलीला अमेरिकेने पकडले. नंतर खटला चालून त्याला शिक्षा झाली. पण भारतीय न्यायालयात त्याला (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) उभे करण्याची परवानगी अमेरिकेने पुढील पाच वर्षे का दिली नाही आणि आताच का दिली, या प्रश्नाचे उत्तर अफगाणिस्तानातील परिस्थितीत आहे. अमेरिकेला त्या देशातून सैन्य माघारी घ्यायचे आहे. तेथे राजकीय स्थैर्य आल्यासच ते शक्य आहे. आपली अध्यक्षीय कारकीर्द संपण्याआधी ओबामा यांना हे घडवून आणायचे आहे. पण तालिबानच्या काही गटांना सत्तेत सहभागी करून घेतल्याविना हे शक्य नाही, या निष्कर्षापर्यंत अमेरिका आली आहे. तसे करण्यासाठी तिला पाकची मदत लागणार आहे; कारण तालिबानी गटांपैकी जे प्रबळ आहेत, त्यांच्यावर पाकच्या ‘आएसआय’चे नियंत्रण आहे. भारताचा अफगाणिस्तानातील वावर थांबवा, तरच आम्ही मदत करू, अशी पाकने अट घातली आहे. उलट अफगाणिस्तानातील अश्रफ घनी सरकारला पाकची लुडबुड डाचत आहे. त्यांना भारत हवा आहे. हा तिढा सोडवण्यासाठी पाकशी चर्चा करा, असे दडपण एकीकडे अमेरिका भारतावर आणत आहे, तर दुसऱ्या बाजूस ‘तुम्ही दहशतवादाला पाठबळ कसे देत आहात, हे जगापुढे आणू शकतो’, हे पाकला बजावण्यासाठी हेडलीसारख्या दशतवाद्यांना वापरले जात आहे. हेडलीने जे भारतीय न्यायालयात सांगितले, त्याचा सर्व भर हा पाक लष्कर व दहशतवादी यांच्यात कसे घनिष्ट संबंध होते, यावरच होता. ‘इशरत’ हा मुद्दा सरकारी वकिलांनी प्रश्नाद्वारे साक्षीत आणला, हेही लक्षात ठेवायला हवे. अमेरिकेच्या या डावपेचांना उत्तर म्हणून पाक अफगाणिस्तानातील भारतीय वकिलातीत वा वाणिज्य दूतावासावर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. पठाणकोट हल्ल्याच्या वेळेसच अफगाणिस्तानातील मझर-ए-शरीफ या शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला. आता इशरतचे प्रकरण भारतीय राजकारणात रंगत असताना जलालाबाद येथील वाणिज्य दूतावासावर बुधवारी हल्ला झाला. जोपर्यंत देशात दहशतवादावरून असा राजकीय पोरखेळ सुरू ठेवला जाईल तोपर्यंत पाकला असे डावपेच खेळणे सहज शक्य होणार आहे.