शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

आर्थिक मुद्द्यांची लोकप्रिय मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:01 IST

रोजगाराच्या संधी हा संपूर्ण निवडणूक काळात एक महत्त्वाचा मुद्दा होता. एकीकडे नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाली आहे, असे मोदी यांचे विरोधक सांगत होते, तर दुसरीकडे नोकऱ्यांत वाढ झाल्याचे मोदी भाषणातून सांगत होते.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला मिळालेल्या अभूतपूर्व विजयात आर्थिक मुद्द्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निवडणुकीचे निकाल निश्चित करण्यात आर्थिक कारणे विशेष प्रभावी राहिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकडे दृष्टिक्षेप टाकला, तर असे लक्षात येते की, त्यात रोजगारवाढ, अर्थव्यवस्था गतिमान करणे, कृषी, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधांचा विकास, व्यापारीहित आणि महागाईवर नियंत्रण, हे मुद्दे वारंवार समोर आलेले दिसतात.

निश्चितपणे देशाच्या स्वातंत्र्यानंतर १६व्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कुठे ना कुठे आर्थिक ऐरणीवर येत राहिले होते. परंतु १७व्या लोकसभा निवडणुकीत आर्थिक मुद्दे आणि ‘सबका विकास’ यासारखे नारे गेल्या काही लोकसभा निवडणुकीच्या मानाने अधिक प्रभावी राहिले आहेत. मागच्या अनेक निवडणुकांवर प्रामुख्याने जमीनदारी प्रथा नष्ट करणे, बँकांचे राष्टÑीयीकरण, गरिबी हटाव, रोजगार हमी, भूमी अधिग्रहण, शेतकरीहित, भ्रष्टाचार हटाव यासारख्या मुद्द्यांनी निवडणूक निकाल प्रभावित केले आहेत. अशा स्थितीत जगातील सर्वात जास्त विकास दर आणि वाढती गंगाजळी, विक्रमी निर्यात, जगातील गुंतवणूकदारांचा भारतातील वाढता आर्थिक विश्वास, यासारख्या मुद्द्यांनी १७व्या लोकसभा निवडणुकीत मोठा प्रभाव टाकला आहे.नरेंद्र मोदी यांची उचललेली आर्थिक पावले देशासाठी चांगली आहेत आणि त्यामुळे भारत एक बळकट देश म्हणून जगात आपला नावलौकिक करू शकतो, असे कोट्यवधी मतदार सांगत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेली नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सुरुवातीला त्रास झाला असला, तरी त्याचे फायदे नंतर दिसू लागले आहेत आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देशांमध्ये महागाई वाढली, तरी भारतात ती आटोक्यात आहे, हे मतदारांच्या मनावर बिंबविण्यात सत्तारूढ पक्षाला यश आले. याबाबत मोदी यांनी सातत्याने केलेल्या वक्तव्यांचाही कोट्यवधी मतदारांवर प्रभाव पडला.

देशातील रोजगाराच्या संधी हा संपूर्ण निवडणूक काळात एक महत्त्वाचा मुद्दा बनून राहिलेला होता, यात कसलेही दुमत नाही. एकीकडे देशातील नोकºयांमध्ये मोठी घट झाली आहे, असे मोदी यांचे विरोधक सांगत होते, तर दुसरीकडे देशात रोजगाराच्या संधी आणि नोकºयांत वाढ झाल्याचे मोदी आपल्या भाषणातून आवर्जून सांगत होते. १७ कोटी लोकांना मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ कर्ज देऊन स्वयंरोजगार आणि उद्योगांना चालना देण्यात आली आहे. सोबतच कर्मचारी भविष्य निधी योजनेंतर्गत संघटित क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळाल्याची आकडेवारीही प्रभावीपणे मतदारांसमोर मांडण्यात मोदींना यश आले आहे.

नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने रोजगार निर्मितीच्या अनेक घोषणाही याच काळात केल्या. शेतकरी आणि गरिबांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजनाही मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ करणारी ठरली.डॉ. जयंतीलाल भंडारी(अर्थतज्ज्ञ)