शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातील कायद्याचे हत्त्यार !

By admin | Updated: February 26, 2016 04:41 IST

राजकीय कुरघोडीसाठी केवळ हत्त्यार म्हणून कायद्याचा वापर करण्याची आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी प्रथा पाडलेल्याला बरीच वर्षे उलटली आहेत.

राजकीय कुरघोडीसाठी केवळ हत्त्यार म्हणून कायद्याचा वापर करण्याची आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी प्रथा पाडलेल्याला बरीच वर्षे उलटली आहेत. त्यामुळे नि:पक्षपाती पारदर्शी तपास होत नाही; कारण तसा तो करून आरोपींना शिक्षा व्हावी, हे उद्दिष्टच नसते. किंबहुना आरोपाची राळ उडवून प्रतिस्पर्ध्याला राजकीयदष्ट्या बदनाम करायचे, हाच मूळ हेतू असतो. त्यामुळे सर्व प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रि या जितकी लांबेल, तितके ते सोईचे व राजकीयदृष्ट्या फायद्याचेही असते. छगन भुजबळ यांच्यावर आता आरोपपत्र ठेवण्यात आले असले, तरी त्या प्रकरणातही हेच होण्याची लक्षणे आहेत. ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भुजबळांवर आहे. राजकारणी मंडळी किती चतुर व चलाख असतात आणि लोकशाही राज्यव्यवस्थेतील प्रशासकीय कारभाराचे बारकावे हेरून ते बेकायदेशीर कृत्येही कशी कायद्याच्या चौकटीत बसवून घेऊ पाहतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळा. सध्या भारतात मुक्त अर्थव्यवहाराची चौकट आहे. ‘किमान सरकार, कमाल कारभार’ हे तत्व अंमलात आणले जात आहे. अशा या अर्थव्यवहाराच्या चौकटीत एखाद्या उद्योगपतीने एखादे बांधकाम कमी किंमतीत वा मोफत करण्याच्या अटीवर मोबदला म्हणून दुसऱ्या ठिकाणचा एखादा भूखंड देण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आणि त्याबाबत निर्णय घेण्यासाठी लोकनियुक्त सरकारने मंत्र्यांची एक उपसमिती नेमली व तिने हा प्रस्ताव स्वीकारण्याचा कौल दिला, तर तो भ्रष्ट व्यवहार ठरेल काय, हा या भुजबळ प्रकरणातील खरा मुद्दा आहे. या संबंधात ‘टू-जी’ घोटाळ्यातील एका उप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायदेशीर बाजू स्पष्ट करणारा आहे. या प्रकरणात खरे सूत्रधार पी. चिदंबरम आहेत, तेव्हा त्यांना सहआरोपी करावे, असा अर्ज सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. स्पेक्ट्रम वाटप लिलाव पद्धतीने करावे, अशी सूचना त्यावेळचे अर्थखात्याचे सचिव व नंतरचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनलेले सुब्बाराव यांनी केली होती. ती चिंदबरम यांनी स्वीकारली नाही, त्यामुळे सरकारचा हजारो कोटींचा तोटा झाला, असा स्वामी यांचा युक्तिवाद होता. वस्तुस्थिती अशी होती की, वाजपेयी सरकारच्या अखेरच्या काळात २००४ साली मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता की, यापुढे जेव्हा स्पेक्ट्रम वाटपाची गरज भासेल, तेव्हा अर्थमंत्री व दूरसंचार मंत्री या दोघानी त्याबाबत निर्णय घ्यावा आणि दोघात मतभेद झाल्यास प्रकरण मंत्रिमंडळासमोर आणावे. पण चिदंबरम व राजा यांच्यात मतभेदच झाले नाहीत. त्यामुळे प्रकरण मंत्रिमंडळासमोर आलेच नाही. सुब्बाराव यांची सूचना मंत्री म्हणून चिदंबरम यांनी स्वीकारायलाच हवी होती, हा स्वामी यांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. लोकनियुक्त सरकारच्या मंत्र्याने सचिवाची सूचना स्वीकारायलाच हवी, असा दावा लोकशाही राज्यव्यवस्थेच्या एकूण कार्यकारणभावाला बाधा आणणारा ठरेल, असे मत स्वामी यांचा अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नेमण्यात आलेल्या मंत्र्यांच्या उपसमितीने घेतलेल्या निर्णयामागच्या हेतूची चिकित्सा न्यायालय करू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ होता. म्हणजे ‘टू-जी’ प्रकरणात भ्रष्टाचार झालाच नाही, असे सर्वोच न्यायालय म्हणत नव्हते. भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी नि:पक्षपाती,पारदर्शी व विनाविलंब तपास व सज्जड निर्णायक पुरावा हवा, इतकाच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मतितार्थ होता. हाच मुद्दा भुजबळ प्रकरणाला लागू पडू शकतो. मंत्री वा नेत्यांनी घेतलेला निर्णय आणि झालेला भ्रष्टाचार यातील संबंध व साखळी न्यायालयीन पुराव्यानिशी सिद्ध करणे हे कठीण ठरत आले आहे. तीन दशकांपूर्वी अब्दुल रहमान अंतुले यांना सीमेंट घोटाळ्यातील न्यायालयीन निकालातील शेऱ्यांमुळे नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा लागला होता. पण याच प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपातील खटल्यात अंतुले यांच्यावरील आरोप निर्विवादपणे सिद्ध होण्याएवढा पुरावा न्यायालयापुढे येऊ शकला नाही. भुजबळ यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाल्यावर आता जो खटला चालेल, त्यात त्यांना निर्र्विवादपणे दोषी ठरवण्याएवढा निर्णायक पुरावा न्यायालयासमोर येईल काय, हाच खरा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘टू-जी’ प्रकरणातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीत भुजबळ होते आणि समितीनेच तसा निर्णय घेतला, हा मुद्दा टिकणार काय, हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. थोडक्यात न्यायालयीन प्रक्रि येतून भुजबळ दोषी ठरून ते तुरूंगात जाणे नजीकच्या भविष्यकाळात तरी कठीण दिसते. अर्थात खटले चालत राहतील, त्या कालावधीत भुजबळ यांची व पर्यायाने त्यांच्या पक्षाची राजकीय बदनामी होत राहील आणि कदाचित भुजबळाचे राजकारण संपेल, एवढेच होईल.