शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खेळ मांडियेला

By admin | Updated: June 15, 2016 04:35 IST

तो एकटाच होता. खेळायला कोणी नाही. मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत. त्याला कसेही करुन करमेना. ‘एकाकी न रमते’ तो परमात्मा एकटेपणाला कंटाळला.

(मनाचिये गुंथी)

- डॉ.गोविंद काळेतो एकटाच होता. खेळायला कोणी नाही. मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत. त्याला कसेही करुन करमेना. ‘एकाकी न रमते’ तो परमात्मा एकटेपणाला कंटाळला.‘एकोऽहं बहुस्यां प्रजायेय इति।’त्याने जीवात्म्याची निर्मिती केली. सृष्टी निर्माण केली. तेव्हा कोेठे त्याला समाधान वाटले. अणुुरेणूतून चराचरातून तोच भरून उरला.‘अत्य तिष्ठत् दशांगुलम्’असे त्याचे वर्णन वेदांनीच केले आहे. एकूण काय तर खेळ सुरू झाला. हजारो वर्षे झाली तो चालू आहे. चालू राहणार आहे. कारण त्याचा खेळ, त्याची लीला कोण रोखणार? मनुष्यप्राण्यानेही ईश्वराचा खेळ मनापासून स्वीकारला. चार दिवसाच्या लेकराने पाळण्यात पाय जरी हलविले तरी आईला आनंदाचे भरते येते. ती म्हणते ‘बाळ, बघ कसा खेळतोय! बाळाचा खेळ जन्मत:च सुरू झाला. मातेच्या पोटातही तो जीव लाथा मारण्याचा खेळ खेळायचा. त्याच्या लाथा आईला सुखावह वाटायच्या. हेच बाळ बालक झाले आणि आईला म्हणू लागले मी खेळायला जाऊ? याचा खेळ संपेना. घरात खेळ-बाहेर खेळ. आई रागावू लागली. तहान नाही-भूक नाही. दिवस नाही-रात्र नाही, कारटे दिवसभर खेळत असते. पुरे झाला तुझा खेळ. आता तिन्हीसांज झाली आहे. देवाचे म्हणायला घे. आईला सृष्टीनिर्मात्या मोठ्या खेळाडूचे स्मरण होते. कारण सूत्रधार तोच आहे. आदि अंति राहणारा. तो कान्हा काय कमी खेळ खेळला. झाडावर काय चढायचा, गोपींची वस्त्रे काय लपवायचा, गोपाळांना घेऊन चेंडू काय खेळायचा, दहीहंडी खेळायचा. परमेश्वर जन्मापासूनच खेळतच राहिला आहे. विठूरायाने खेळ नाही केला; परंतु संतानी मात्र त्याच्या दारात‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’ खेळाचे आणि जीवाचे जन्मापासून ते आतापर्यंतचे अतूट नाते आहे. थकलेल्या कुडीतील प्राणज्योत निघून जाते तेव्हा म्हणतात खेळ खलास झाला. आयुष्यभर खेळता खेळता अंतिम क्षण केव्हा येतो ते कधी कोणाला कळले आहे का? खेळ नीट जमला नाही तर होतो खेळखंडोबा.संसार म्हणजे तरी काय? खेळायला दुसरा भिडू आला की सुरू होतो संसार. हार-जीत, सुख-दु:ख सारे खेळाचा अविभाज्य भाग बनतात. परमार्थात मात्र आपणच आपल्याशी खेळायचे-भिडूशिवाय. सर्वात अवघड खेळ. संताना मात्र हा खेळ चांगलाच जमला. तुकोबांना न्यायला विमान आले. आवली मात्र अहो! अहो म्हणत खालीच राहिली. परमार्थ वर जातो संसार खाली उरतो.