शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

खेळ मांडियेला

By admin | Updated: June 15, 2016 04:35 IST

तो एकटाच होता. खेळायला कोणी नाही. मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत. त्याला कसेही करुन करमेना. ‘एकाकी न रमते’ तो परमात्मा एकटेपणाला कंटाळला.

(मनाचिये गुंथी)

- डॉ.गोविंद काळेतो एकटाच होता. खेळायला कोणी नाही. मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत. त्याला कसेही करुन करमेना. ‘एकाकी न रमते’ तो परमात्मा एकटेपणाला कंटाळला.‘एकोऽहं बहुस्यां प्रजायेय इति।’त्याने जीवात्म्याची निर्मिती केली. सृष्टी निर्माण केली. तेव्हा कोेठे त्याला समाधान वाटले. अणुुरेणूतून चराचरातून तोच भरून उरला.‘अत्य तिष्ठत् दशांगुलम्’असे त्याचे वर्णन वेदांनीच केले आहे. एकूण काय तर खेळ सुरू झाला. हजारो वर्षे झाली तो चालू आहे. चालू राहणार आहे. कारण त्याचा खेळ, त्याची लीला कोण रोखणार? मनुष्यप्राण्यानेही ईश्वराचा खेळ मनापासून स्वीकारला. चार दिवसाच्या लेकराने पाळण्यात पाय जरी हलविले तरी आईला आनंदाचे भरते येते. ती म्हणते ‘बाळ, बघ कसा खेळतोय! बाळाचा खेळ जन्मत:च सुरू झाला. मातेच्या पोटातही तो जीव लाथा मारण्याचा खेळ खेळायचा. त्याच्या लाथा आईला सुखावह वाटायच्या. हेच बाळ बालक झाले आणि आईला म्हणू लागले मी खेळायला जाऊ? याचा खेळ संपेना. घरात खेळ-बाहेर खेळ. आई रागावू लागली. तहान नाही-भूक नाही. दिवस नाही-रात्र नाही, कारटे दिवसभर खेळत असते. पुरे झाला तुझा खेळ. आता तिन्हीसांज झाली आहे. देवाचे म्हणायला घे. आईला सृष्टीनिर्मात्या मोठ्या खेळाडूचे स्मरण होते. कारण सूत्रधार तोच आहे. आदि अंति राहणारा. तो कान्हा काय कमी खेळ खेळला. झाडावर काय चढायचा, गोपींची वस्त्रे काय लपवायचा, गोपाळांना घेऊन चेंडू काय खेळायचा, दहीहंडी खेळायचा. परमेश्वर जन्मापासूनच खेळतच राहिला आहे. विठूरायाने खेळ नाही केला; परंतु संतानी मात्र त्याच्या दारात‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’ खेळाचे आणि जीवाचे जन्मापासून ते आतापर्यंतचे अतूट नाते आहे. थकलेल्या कुडीतील प्राणज्योत निघून जाते तेव्हा म्हणतात खेळ खलास झाला. आयुष्यभर खेळता खेळता अंतिम क्षण केव्हा येतो ते कधी कोणाला कळले आहे का? खेळ नीट जमला नाही तर होतो खेळखंडोबा.संसार म्हणजे तरी काय? खेळायला दुसरा भिडू आला की सुरू होतो संसार. हार-जीत, सुख-दु:ख सारे खेळाचा अविभाज्य भाग बनतात. परमार्थात मात्र आपणच आपल्याशी खेळायचे-भिडूशिवाय. सर्वात अवघड खेळ. संताना मात्र हा खेळ चांगलाच जमला. तुकोबांना न्यायला विमान आले. आवली मात्र अहो! अहो म्हणत खालीच राहिली. परमार्थ वर जातो संसार खाली उरतो.