शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकबंदी अन् आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:08 IST

केंद्र, राज्य सरकारसह महापालिकांच्या निर्देशानुसार २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे.

केंद्र, राज्य सरकारसह महापालिकांच्या निर्देशानुसार २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. आता प्लॅस्टिकबंदीनंतर प्लॅस्टिकविरोधात कारवाईसाठी प्रशासनाला वेगाने व जोमाने काम करावे लागेल. विशेषत: कारवाईदरम्यान गोळा झालेल्या प्लॅस्टिकचे काय करायचे? हा यक्षप्रश्न प्रशासनासमोर असेल. किंबहुना हाच कळीचा मुद्दा आहे. यासह नागरिकांना प्लॅस्टिक वापरापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीवर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्लॅस्टिकबंदीवर सांगोपांग चर्चा झालेली आहे. आपल्या राज्याप्रमाणेच अन्य १६ राज्यांनी प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे. आता मात्र अंमलबजावणीचे शिवधनुष्य मुंबईसह राज्यातील महापालिकांना पेलावे लागणार आहे. प्रत्यक्षात कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाला मोठा टप्पा सर करायचा आहे. मात्र प्लॅस्टिकबंदीची घोषणा झाल्यानंतर आपल्याकडील प्लॅस्टिकचे काय करायचे, याचे नेमके उत्तर नागरिकांना मिळालेले नाही. त्यामुळे संभ्रम मात्र वाढतोय. प्लॅस्टिक संकलनासाठी प्रशासनाने केंद्रे खुली केलेली आहेत. त्याची पुरेशी माहिती नागरिकांना नाही. माहिती झाल्यानंतर या केंद्रांवर प्लॅस्टिक जमा करण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे लागणार आहे. प्लॅस्टिकबंदी संदर्भात जनजागृती झाल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी हवी तेवढी जनजागृती झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोणते प्लॅस्टिक वापरायचे व कोणते नाही, या प्रश्नाचे उत्तरही नागरिकांना सध्या मिळालेले नाही. प्रदर्शने व व्याख्याने आयोजित करून हा प्रश्न अपेक्षित वेगाने नक्कीच सुटणार नाही. खऱ्या अर्थाने मुंबई महापालिकेचे प्रशासन गेल्या तीन ते चार दिवसांपासून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी प्लॅस्टिक संकलन केंद्र, प्लॅस्टिक पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया केंद्राबाबत प्रशासनाने नागरिकांना पुरेशी माहिती दिलेली नाही. प्लॅस्टिक वापरले तर नेमका किती दंड आकारला जाईल, याबाबतही सध्या संभ्रम आहे. मुळात दंडाची रक्कम पाच हजार रुपयांऐवजी दोनशे रुपये एवढी व्हावी, म्हणून महापालिकेच्या विधि समितीच्या बैठकीत दाखल प्रस्तावही राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. हा प्रस्ताव विधि समितीत आता आला. मुळात हा प्रस्ताव केव्हाच दाखल होणे गरजेचे होते. परंतु प्रशासन याबाबत सुस्त होते. प्लॅस्टिकविरुद्ध कारवाईसाठी महापालिकेची पथके तैनात असली तरी कारवाईदरम्यान सावळा गोंधळ होणार हे निश्चित आहे. कारण प्रत्येक वॉर्डात केवळ चार सदस्य असणार आहेत; आणि ही संख्या अत्यंत तोकडी आहे. कारवाई करून गोळा झालेले प्लॅस्टिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणीकृत संस्थांकडे जमा केले जाणार आहे. त्यामुळे या विषयात महापालिकेने आधीच हात वर केले आहेत. प्लॅस्टिकचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रियेबाबत सुसंगत स्पष्ट धोरण नाही. एका अर्थाने प्लॅस्टिकच्या संकटाने मोठे स्वरूप धारण केल्यावर प्रशासनाला आलेली ही जाग आहे. या सर्व आव्हानांचा सामना प्रशासन कसे करते व नागरिक त्यास कसा हातभार लावतात, हे येणाºया काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.