शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

उदारीकरणाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 03:51 IST

गेल्या दोन-अडीच दशकांत आर्थिक उदारीकरण करताना सत्ताधाºयांनी बिचकत बिचकत पावले टाकली. आज जे चटके सोसावे लागत आहेत ते या अर्ध्यामुर्ध्या उदारीकरणाचे आहेत. विकासाची आणि बदलत्या जीवनशैलीची चटक लागल्यानंतर जनतेच्या आशाआकांक्षाही वाढल्या.

गेल्या दोन-अडीच दशकांत आर्थिक उदारीकरण करताना सत्ताधा-यांनी बिचकत बिचकत पावले टाकली. आज जे चटके सोसावे लागत आहेत ते या अर्ध्यामुर्ध्या उदारीकरणाचे आहेत. विकासाची आणि बदलत्या जीवनशैलीची चटक लागल्यानंतर जनतेच्या आशाआकांक्षाही वाढल्या. लोकसंख्येत निम्म्याहून अधिक संख्येने असलेली तरुणाई उतावीळ झाली.आधीच्या काँग्रेसप्रणीत संपुआच्या सरकारांवर ‘धोरण लकव्या’च्या व नानाविध घोटाळ्यांच्या आरोपांची राळ उठवून भाजपा सत्तेवर आली. लोकांच्या स्वप्नांशी तीन वर्षे खेळल्यानंतर आता भाजपाप्रणीत ‘रालोआ’ सरकारची नवाळी ओसरू लागली असून पूर्वी टीका करणारे आता टीकेचे केंद्र बनले आहेत. अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे हे सांगत असतानाच थबकलेल्या विकासाला चालना मिळावी यासाठी साडेआठ लाख कोटी रुपयांचे ‘टॉनिक’ देण्याची कसरत वित्तमंत्री अरुण जेटली यांना करावी लागली. यापैकी २.११ लाख कोटी रुपयांचा खुराक बुडित व थकीत कर्जांच्या बोजाखाली दबून धापा टाकणाºया सरकारी बँकांना भांडवलाच्या रूपाने देण्यात येणार आहे. चांगल्या चालणाºया दोन डझनांहून अधिक खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून आधी त्यांच्या पायात बेड्या अडकविल्या गेल्या. आता त्याच बँका बुडण्याची वेळ आल्यावर एवढा मोठा पैसा त्यांच्यात ओतावा लागत आहे.माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ताज्या लेखामध्ये देशाच्या भविष्याचा सौदा करणारे यांनी चुकीचे निर्णय घेतल्याने ही वेळ आल्याचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनियोग कसा करावा याविषयीचे तात्विक मतभेद याच्या मुळाशी आहेत. त्यांच्या मते, सर्वोच्च न्यायालय व ‘कॅग’ने नैसर्गिक साधने ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचे मानावे व त्यांचा विनियोग तशाच पद्धतीने करावा, या तत्त्वाचा पुरस्कार केला. त्याचाच भाग म्हणून आधीच्या सरकारने केलेले टेलिकॉम स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणींचे वाटप एकगठ्ठा रद्द केले गेले. यासाठी लिलाव ही एकमात्र पद्धत योग्य ठरविली गेली. धंद्यात टिकून राहण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी महागडे स्पेक्ट्रम कर्ज काढून खरेदी केले. पण त्यांचे कंबरडे मोडून गेले. कोळसा खाणींच्या लिलावांना हव्या तशा बोली आल्या नाहीत. कोळशाच्या आशेवर उभारले गेलेले अनेक खासगी विद्युत व पोलाद प्रकल्प अडचणीत आले. त्यांनाही घेतलेली कर्जे फेडता आली नाहीत. अशाप्रकारे अर्थव्यवस्था विकसित व्हावी, फोफावावी यासाठी अनेक उद्योगांनी दिलेली कर्जे अडकून पडल्याने बँका अडचणीत आल्या. ग्राहकाचे अंतिम हित लक्षात घेऊन या नैसर्गिक साधनांचा विनियोग रास्त दराने करण्याची हिमायत सिब्बल साहेबांनी केली आहे. त्यांच्या परीने हे विश्लेषण बरोबरही आहे. हा राजकारणाचा भाग आहे. पण देशाची अर्थव्यवस्था हा परस्परांवर राजकीय कुरघोडी करण्याचा विषय नाही, याचे भान सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही ठेवण्यात खरे राष्ट्रहित आहे. पूर्वी ज्या चुका झाल्या आहेत त्या नव्या वाटेवर ठेचकाळताना झालेल्या आहेत. देशाच्या भल्यासाठी त्या चुकांचे परिमार्जन करणे भाग आहे. राजकारण बाजूला ठेवून हे केले जावे. भांडवलदारी अर्थव्यवस्थेचा महामेरू असलेल्या अमेरिकेतही बलाढ्य बँका बुडायची पाळी आल्यावर सरकारने आपल्या तिजोरीतून पैसे ओतले होते, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था