शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

वेध - हायकोर्ट न्यायाधीशांना दाखविली योग्य जागा!

By admin | Updated: February 21, 2017 00:02 IST

न्या. सभरवाल यांच्याच हितचिंतकांच्या प्रयत्नांमुळे ‘कन्टेम्प्ट’चे अस्त्र उगारले गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने ते म्यान करून त्या

न्या. सभरवाल यांच्याच हितचिंतकांच्या प्रयत्नांमुळे ‘कन्टेम्प्ट’चे अस्त्र उगारले गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने ते म्यान करून त्या न्यायालयाच्या आताच्या समीकरणांमध्ये न्या. सभरवाल यांच्या बाजूने उभे राहणारे कोणी नाही, हेही एक प्रकारे दाखवून दिले. 

गेल्या काही महिन्यांत दोन निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांना आणि तेथील न्यायाधीशांना त्यांची योग्य जागा दाखविली आहे. या निकालांनी उच्च न्यायालयांना त्यांच्या अधिकारांची योग्य मर्यादा दाखविण्यासोबतच हायकोर्ट न्यायमूर्तींच्या डोक्यात असलेला त्यांच्या प्रतिष्ठेविषयीचा भ्रमाचा भोपळाही फुटला आहे. हायकोर्ट न्यायाधीशांनी अधिकारांच्या मर्यादेचे भान ठेवून वागायला हवे व गरज नसताना पूर्णत: प्रशासकीय आणि धोरणात्मक बाबींमध्ये सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. लोक न्यायालयीन निकालांची आब राखतात ती ते नि:पक्षतेने दिले जातात म्हणून व ते देताना न्यायाधीश संयमित वृत्ती दाखवतात म्हणून. हे भान न्यायाधीशांनी ठेवले नाही, तर न्यायालयीन निकालांना कोणीही भीक घालणार नाही व त्याने न्यायव्यवस्थेची लोकाधिष्ठता लयाला जाईल, याचीही जाणीव सर्वोच्च न्यायालयाने करून दिली. अशा प्रकारच्या निकालांनी ते जमिनीवर येतील अशी अपेक्षा आहे.जयपूरच्या सांगानेर विमानतळावर मुंबईच्या एका पिस्तूलधारी प्रवाशास सुरक्षा तपासणीच्या वेळी विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडविले. तरीही तो त्यांना चकवा देऊन विमानात पोहोचला. याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्राने छापले. त्याची दखल राजस्थान उच्च न्यायालयाने घेतली. त्या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना व न्यायाधीशांना सुरक्षा तपासणीतून वगळण्यात आलेले नाही, हे समोर आले. न्यायालय प्रशासनाने केंद्रीय गृह मंत्रालयास पत्र पाठवून निदान मुख्य न्यायाधीशांना तरी वगळावे, कारण त्यांचे पद घटनात्मक आहे, असे सूचविले. ते मान्य झाले नाही तेव्हा न्यायालयाने मुख्य न्यायाधीश व न्यायाधीशांना सुरक्षा तपासणीतून वगळण्याचा आदेश दिला. प्रकरण अपिलात आले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या अतिउत्साहावर नाराजी व्यक्त केली. सुरक्षा आणि एखाद्या व्यक्तीला असलेला संभाव्य धोका याचे आकलन करून धोरणात्मक निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे. त्यासाठी लागणारे विशेष ज्ञान न्यायालयांकडे नसल्याने अशा विषयांत उच्च न्यायालयाने नाक खुपसायला नको होते, असे नमूद केले गेले. शिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना अष्टौप्रहर पोलिसांची सुरक्षा नसल्याने त्यांची तुलना सुरक्षा चाचणीतून वगळलेल्या इतरांशी करता येणार नाही. त्यामुळे या न्यायाधीशांनी स्वत:च्या पदाविषयी डोक्यात विनाकारण हवा भरून घेऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. योगेंद्र कुमार सभरवाल यांचे चिरंजीव दिल्लीत बांधकाम व्यवसायात आहेत. दिल्ली विकास प्राधिकरणाशी संबंधित एका प्रकरणात न्या. सभरवाल यांनी आपल्या मुलाला व एकूणच बांधकाम व्यावसायिकांना लाभ होईल, असा निकाल देऊन पदाचा दुरूपयोग केला, असे आरोप ते निवृत्त झाल्यावर झाले. एका वृत्तपत्राने याची बातमीही छापली. स्वत: न्या. सभरवाल यांनी या आरोपांना कधी जाहीरपणे उत्तर दिले नाही. पण दिल्ली उच्च न्यायालयाने या वृत्तपत्रीय बातमीची स्वत:हून दखल घेतली व संबंधित वृत्तपत्रावर ‘कन्टेप्ट’ची कारवाई सुरू केली. प्रकरण अपिलात आले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयास त्यांच्या ‘कन्टेम्प्ट’च्या अधिकारकक्षेच्या मर्यादेचे भान करून दिले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, न्या. सभरवाल यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या नात्याने आरोप केले गेले. त्यामुळे त्यामुळे ‘कन्टेम्प्ट’ होत असेल तर त्याची दखल फक्त सर्वोच्च न्यायालयच घेऊ शकते. उच्च न्यायालयास तो अधिकार नाही व उच्च न्यायालयाने आपल्याहून श्रेष्ठ असलेल्या न्यायालयाच्या ‘कन्टेम्प्ट’ची काळजी घेण्याचे कारण नाही. उच्च न्यायालयांनी फक्त स्वत:च्या आणि त्यांच्या अधिनस्थ असलेल्या न्यायालयांची प्रतिष्ठा व समाजमनातील प्रतिमा जपण्याची काळजी करावी. सर्वोच्च न्यायालयाचे शीलरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयांनी धावून येण्याची गरज नाही व तसे करण्याचा त्यांना अधिकारही नाही. - अजित गोगटे