शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

वेध - झंडा उँचा रहे हमारा...!

By admin | Updated: May 4, 2017 00:11 IST

कोल्हापूरच्या माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचे सर्वांत उत्तम वर्णन ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच करीत असतात. ते म्हणायचे की, कोल्हापूरचा

 कोल्हापूरकर जनतेच्या वतीने  राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आणि एका नव्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. कोल्हापूरच्या माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचे सर्वांत उत्तम वर्णन ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच करीत असतात. ते म्हणायचे की, कोल्हापूरचा माणूस हा कोल्हापुरी गुळाप्रमाणे गोड आहे. तो एकदा कौतुक करू लागला की, डोक्यावर घेऊन नाचू लागेल. जर का, कोणी त्याच्याबरोबर पंगा घेतला, तर त्याला केव्हा फेकून देतील हेदेखील कळणार नाही. हे अनेक अर्थाने खरे आहे. प्रचंड हौशी, अमाप उत्साही आणि उत्सवप्रिय माणूस म्हणजे कोल्हापूरकर. कोणतीही गोष्ट करायची, तर ती मन लावून करायची, त्याच्यावर जिवापाड प्रेम करायचे. प्रत्येक गोष्ट करताना ती नंबर एकच असली पाहिजे आणि त्याचा कोल्हापूरकर म्हणून सतत सार्थ अभिमानही बाळगण्यात तो हयगय करीत नाही. हा सर्व कोल्हापूरकर असल्याचा गुणधर्म सांगण्याचे कारण की, चार दिवसांपूर्वी साजरा झालेल्या महाराष्ट्र दिना दिवशी कोल्हापुरात हजारो लोकांच्या साक्षीने एक ऐतिहासिक क्षण उजाडला. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पोलीस मुख्यालयासमोर देशातील सर्वात उंचीचा, द्वितीय क्रमांकाचा ध्वज उभा करण्यात आला आहे. हा ध्वज तीनशे तीन फुटांवर १ मे रोजी ५ वाजून ५८व्या मिनिटाला सूर्योदयासमयी फडकविण्यात आला. त्याचे औपचारिक उद्घाटन दुपारी झालेल्या भव्य-दिव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.कोल्हापूरला अनेक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आहेत. ते कलेचे माहेरघर आहे. मराठी चित्रपटसृष्टीची नगरी आहे. कुस्तीची पंढरी आहे. उद्योगाची जननी आहे. निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील उत्तम हवामान आहे. सर्वात महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीच्या इतिहासाची पाशर््वभूमी लाभली आहे. महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाची भूमी आहे. महाराष्ट्राला सामाजिक क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. ही सर्व परंपरा आणि या सर्व कला दैनंदिन जगण्यामध्ये मनापासून अभिमान म्हणून जपण्याचा प्रयत्न कोल्हापूरकर माणूस करतो. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. कर्तबगारी करणाऱ्यांवर मनापासून प्रेम करणारा आणि दगाबाज भेटला, तर त्याला फेकून देणारा कोल्हापूरकर आहे. याच परंपरेत कोल्हापूरकर जनतेच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेतला आणि एका नव्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली.यापूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवर वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकतो आहे. त्यानंतरचा हा द्वितीय क्रमांकाचा ध्वज राहणार आहे. ही संकल्पना काही महिन्यांपूर्वीच मांडण्यात आली आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वाढते शहर आहे. पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे या शहरामध्ये अनेक जुन्या आठवणी आणि आकर्षणाबरोबरच नवीन काही तरी उभे करावे, जेणेकरून देशभरात कोल्हापूरचे नाव अभिमानाने घेतले जाईल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा असाच हा निर्णय होता. चित्रनगरीची उभारणी ही वेगाने चालू आहे. कोल्हापूर हे कोकणला रेल्वेने जोडले जाणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होत आहे. विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. एका दृष्टीने कोल्हापूरचा झेंडा अधिक उंच उंच फडकावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावर कोल्हापूरच्या जनतेचेसुद्धा मनापासून प्रेम आहे.- वसंत भोसले