शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

वेध - विमानसेवेच्या स्वप्नांना लाभले पंख!

By admin | Updated: February 20, 2017 00:13 IST

एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले विमानतळ विना वापराचे पडून आहेत आणि दुसरीकडे पैसा मोजण्याची तयारी असलेल्या प्रवाशांना जलद प्रवासाचे साधन उपलब्ध नाही, हे चित्र दुर्दैवी आहे.

 अकोला विमान वाहतुकीच्या नकाशावर येण्याचे अकोलेकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न येत्या सहा महिन्यांत साकार होण्याची आशा, नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी पल्लवित केली आहे. गोव्यात संपन्न झालेल्या जागतिक विमान वाहतूक कार्यशाळेत बोलताना, अकोल्यासोबतच अमरावती, नांदेड व सोलापूर या महाराष्ट्रातील इतर तीन शहरांमधील छोटी विमानतळेही सहा महिन्यांत देशातील मुख्य ७२ विमानतळांना जोडण्याचा मनोदय राजू यांनी बोलून दाखविला. अकोल्यातील विमानतळ ब्रिटिशकालीन आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाद्वारा संचलित हा विमानतळ राज्यातील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या लांब अंतरावरील शहरांपर्यंत जलद पोहोचता यावे, यासाठी या विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, ही अकोलेकरांची अनेक वर्षांपासूनची मनिषा आहे. पूर्वी वायुदूत व स्पॅन एव्हिएशन या कंपन्यांनी कमी आसन क्षमतेच्या विमानांनिशी अकोल्याहून मुंबईसाठी विमानसेवा सुरूही केली होती; मात्र रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा नसल्याने त्या विमानसेवांच्या वेळा प्रवाशांसाठी सोयीच्या नव्हत्या आणि परिणामी त्या थोड्याच दिवसात बंद पडल्या. आता अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय रात्रीच्या वेळी विमाने उतरविण्याची सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे तुलनेत जादा आसन क्षमतेच्या विमानांसह प्रवाशांच्या दृष्टीने सोयीच्या वेळा असलेली विमानसेवा सुरू करणे शक्य होईल. अकोला येथून मुंबई व पुण्याला जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या रेल्वेगाड्यांमधील प्रतीक्षा यादी बघता, रेल्वेच्या वातानुकूलित वर्गाच्या प्रवासी भाड्यापेक्षा थोडे जास्त दर असलेली विमानसेवाही नक्कीच यशस्वी होऊ शकते. खरे म्हटले तर भारतासारख्या खंडप्राय देशात यापूर्वीच विमान वाहतुकीचे जाळे निर्माण व्हायला हवे होते. भारतात अकोला विमानतळासारखे वापरात नसलेले सुमारे ४०० विमानतळ आहेत. या विमानतळांचा वापर प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या आवागमनापुरताच होतो. सर्वसामान्यांना त्यांचा काहीही फायदा होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने गतवर्षी नवे विमान वाहतूक धोरण आखले आणि त्या अंतर्गत ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ सुरू केली आहे. याच योजनेंतर्गत अकोल्याहून विमानसेवा सुरू करण्याचे सूतोवाच नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी केले आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले विमानतळ विना वापराचे पडून आहेत आणि दुसरीकडे पैसा मोजण्याची तयारी असलेल्या प्रवाशांना जलद प्रवासाचे साधन उपलब्ध नाही, हे चित्र दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी त्यासाठी विमान वाहतूक कंपन्यांना जबाबदार ठरविले होते. विमानतळे तयार आहेत; पण एअरलाइन्स तेथून सेवा सुरू करण्यास इच्छुक नाहीत, असा त्यांचा एकंदर सूर होता. एअरलाइन्सच्या अनुत्साहामागे निश्चितच काही ठोस कारणे असतील. ती कारणे दूर झाल्यास आणि उत्पन्नाची हमी असल्यास, एअरलाइन्स छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडणाऱ्या सेवा का सुरू करणार नाहीत? आतापर्यंत ते झाले नाही याचा अर्थ सरकारी धोरणामध्ये कुठे तरी, काही तरी कमतरता होती. आता सरकारने त्या उणिवा दूर केल्या असतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. जलद दळणवळण हाच यापुढे जगाचा मूलमंत्र असणार आहे. त्यासाठी अकोल्यासारख्या अनेक छोट्या शहरांमधील नागरिक विमानसेवेची स्वप्नं बघत आहेत. त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. - रवि टाले