शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे ‘पद्म’

By admin | Updated: September 16, 2016 01:42 IST

केंद्र शासनाने पद्म पुरस्कारांमध्ये देशातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रथमच नागरिकांना या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नामांकन करण्याचा अधिकार दिला आहे

केंद्र शासनाने पद्म पुरस्कारांमध्ये देशातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रथमच नागरिकांना या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नामांकन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आता देशातील कुठलीही व्यक्ती स्वत:ची अथवा अन्य मान्यवरांची या सन्मानासाठी शिफारस करु शकणार आहे. शासनाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक कार्य, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना तो प्रदान केला जात असतो. परंतु दुर्दैवाने अलीकडील काही वर्षात या पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पद्मसाठी जोरदार लॉबिंग केली जाते, अशा प्रकारचे गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळेच पद्म पुरस्कारांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणून ती सर्वांसाठी खुली करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय सन्मानाला लोक सन्मानाचे स्वरूप प्राप्त करुन देण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे स्वागतार्ह पाऊल आहे. यापुढे हे सन्मान विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित असणार नाहीत. शिवाय ही नामांकन प्रक्रिया खुली झाल्याने सामाजिक जीवनात अमूल्य योगदान दिल्यावरही कधीच प्रकाशझोतात न राहिलेल्या पण या पुरस्कारास पात्र असणाऱ्या लोकांचीही नावे समोर येतील, अशी अपेक्षा आहे. नामांकन प्रक्रियेत बदलामागील मुख्य हेतूच हा असावा. नामांकनाच्या नव्या पद्धतीनुसार पुढील वर्षीच्या पुरस्कारांकरिता आॅनलाईन नामांकने मागविण्यात आली असून नामांकनासाठी शिफारसकर्त्यास आपला आधारक्रमांक देणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे पद्म पुरस्कारांसाठीच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.पद्म अवॉर्ड.गव्ह.इन या नव्या वेबसाईटवर शासनाने १९५४ पासून २०१६ पर्यंत पद्म पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांची तपशीलवार माहिती उपलब्ध करून दिली आहे. कुठल्या वर्षी, कुणाला कुठला पुरस्कार मिळाला आहे. कुठल्या योगदानासाठी तो देण्यात आला आहे हे सर्व आता या वेबसाईटवर कळणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारे, केंद्रीय मंत्रालये, मंत्री, विभाग प्रमुख, खासदार यांच्यामार्फत पद्मसाठी शिफारशी केल्या जात होत्या. त्यामुळे या पुरस्कारांवर राजकीय नेत्यांचे वर्चस्व वाढले असल्याची टीका होऊ लागली होती. आता मात्र ही प्रक्रिया पारदर्शक झाल्याने पद्म पुरस्कारांमधील लॉबिंग संस्कृतीला निश्चितच पूर्णविराम मिळेल आणि या सन्मानांना पुनश्च पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.