शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे अन् पुढचा प्रवास प्रशस्त करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:34 IST

ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्याचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही.

ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्याचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही. त्या पवारांवर अशी पाळी यावी हे त्यांचे दुर्दैव. ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ हा शरद पवारांनी त्यांच्या अनुयायांना दिलेला संदेश उत्साहवर्धक असला तरी त्यात फारसा दम शिल्लक राहिलेला नाही. गेली अनेक वर्षे ते सारखा पराभव पाहात आहेत. त्यांच्या पक्षाचीही पिछेहाटच होत राहिली आहे. त्यांचे एकेकाळचे स्नेही विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव रणजीत मोहिते पाटील त्यांच्यापासून दूर भाजपत गेले आहेत. ज्यांचे नेतृत्व केले, त्यांच्यावर भरवसा ठेवला आणि ज्यांना आपले मानले तेच लोक ‘तुमच्यामुळे आम्ही मागे राहिलो’ असे त्यांना ऐकवू लागले आहेत. ही स्थिती खरेतर ‘आता तुम्ही जा’ असे सांगणारी आहे. मात्र पवार चिवट आहेत आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या अजून संपायच्या आहेत. वय साथ देत नाही आणि पूर्वीचे जिवलगही दूर गेले आहेत. परंतु ज्यांना वाचवायचे त्यांच्या मागे उभे राहणे त्यांना गरजेचे आहे. त्यामुळे पवारांना निवृत्ती नाही! तशी राजकारणातील कुणासही निवृत्ती नसते.

ते अडवाणी आणि जोशी ही राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी पक्षातील उदाहरणे. मुलायमसिंगांना बसून राहवत नाही, ताज्या दमाची नवी माणसे आली, पण त्यांच्याविषयी विश्वास या बड्यांना वाटत नाही. खरेतर ही स्थिती दयनीय म्हणावी अशी आहे. ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्यांचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही. त्या नेत्यावर आत्ताची अशी पाळी यावी हे त्यांचे व राज्याचेही दुर्दैव आहे. पवारांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत आणि त्या जिवंत व टवटवीत आहेत. त्यांच्यावर त्यांच्या वयाचा परिणाम नाही. पण राजकारण हा जनमताच्या पाठिंब्यावर चालणारा व्यवहार आहे आणि तो आता सुस्त आहे. जातीचे पाठिंबे गेले आहेत आणि जुन्या नावावर चालता यावे असेही फारसे शिल्लक राहिले नाहीत. त्यातून त्यांचा विश्वास आता कुणासही वाटेनासा झाला आहे. ते राहुल गांधींना भोजनाचे निमंत्रण देतात आणि मोदींनाही सल्ला देतात. त्यांच्या पक्षातील अनेकांना त्यांच्या या वागण्याचा अर्थ लागत नाही. ‘निदान आता तरी त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे व आमचा पुढचा प्रवास प्रशस्त करावा,’ असे त्यांचे अनेक सहकारी खासगीत सांगतात. तसे सांगणाºयात जुने मंत्रीही आहेत. पण पवारांचा आत्मविश्वासवा त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांना तसे करू देत नाही. घरातल्या अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. घरातली माणसे राजकारणातल्या खुर्च्यांवर बसवायची राहिली आहेत, एवढी वर्षे साथ दिलेले अनुयायी आहेत आणि त्यातले काही त्यांच्यातले व मोदींमधले दुवे आहेत. तसे दुवे त्यांनी राहुलसोबतचेही सांभाळले आहेत. त्यामुळे ते केव्हा कोणती भूमिका घेतील व त्यामागे त्यांचा हेतू कोणता असेल हे कुणासही अखेरच्या क्षणापर्यंत कळत नाही. महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिका कोणत्या तेही समजत नाही. पण त्यांना लोकांसमोर राहायचे आहे. मध्यंतरी त्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करून त्याविषयी फडणवीसांना मार्गदर्शन केले. जणूकाही मराठवाड्यातील स्थिती त्यांना सांगणारे अधिकारी त्यांच्या सरकारात व कार्यकर्ते पक्षात नाहीतच.
मग पवार हे का करतात? स्वस्थ बसवत नाही म्हणून की आपण अजून कार्यक्षम आहोत हे जनतेला दिसावे म्हणून? देशात कडबोळ्यांचे राज्य येईल आणि त्यांचे पंतप्रधानपद आपल्याकडे येईल असे त्यांना अनेकदा वाटले. मोदींचे नवे सरकार पाच वर्षे राहील आणि त्यानंतर येणारे सरकारही कडबोळ्यांचे असणार नाही. निवडणूक जिंकायला राष्ट्रीय चेहरा व राष्ट्रीय मान्यताच यापुढे लागेल. त्यामुळे आपला पक्ष राष्ट्रीय पक्षात सामील करणे व पुन: एकवार राजीव गांधींना भेटावे तसे राहुल गांधींना भेटणे ही त्यांच्यासाठी सरळ व सोपी वाट आहे. ती त्यांच्या अनुयायांना हवी आहे. बहुधा ती घरच्यांनाही हवी असावी. अशावेळी अहंता उपयोगाची नाही, येथे वास्तवाची दखलच तेवढी महत्त्वाची आहे. पवार स्वत:खेरीज कुणाचे ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना हे सांगणेही रुचणारे नाही. पण त्यांच्याविषयीची सदिच्छा असणा-यांचे मत त्यांना कळावे, यासाठी हा प्रपंच!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार