शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

भागवतांचा नुस्खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 03:55 IST

आरक्षणासाठी हरयाणात जाट समुदायाने सुरु केलेल्या हिंसक आंदोलनाने राजधानी दिल्लीलादेखील होरपळवून टाकल्यानंतर आणि सध्या त्या राज्यात संघ स्वयंसेवक मनोहरलाल

आरक्षणासाठी हरयाणात जाट समुदायाने सुरु केलेल्या हिंसक आंदोलनाने राजधानी दिल्लीलादेखील होरपळवून टाकल्यानंतर आणि सध्या त्या राज्यात संघ स्वयंसेवक मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची सत्ता असल्याने की काय सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर म्हणे एक अक्सीर इलाज शोधून काढला आहे. त्यांनी सुचविलेल्या नुस्ख्यानुसार देशपातळीवर एक अराजकीय अभ्यासगट स्थापन करायचा असून देशात आरक्षणासाठी कोण पात्र किंवा अपात्र आहे याचा निवाडा या अभ्यासगटाने करावयाचा आहे. अलीकडच्या काळात अनेक लोक आरक्षणाची मागणी करु लागले आहेत आणि त्यामुळे त्यावर सर्वसमावेशक विचार व्हावा व तो करणारे लोक कोणत्याही जाती-जमातीशी लागेबांधे नसणारे असावेत असेही भागवताना वाटते. बिहारच्या निवडणुकीच्या आधी भागवतांनी याच आरक्षण नीतीवर वक्तव्य करताना आरक्षणविषयक संपूर्ण धोरणाचा नव्याने विचार केला जावा असे म्हटले होते. त्यांचे ते वक्तव्य देशातून आरक्षणाचे उच्चाटन सूचित करणारे असल्याचा मन:पूत प्रचार लालूप्रसाद यादव यांनी त्यावेळी केला व त्यापायीच आपल्याला लज्जित करणाऱ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले असे भाजपाला आजही वाटते. भागवतांनी नव्याने या विषयावर बोलताना नि:संदिग्ध शब्दात जरी नाही तरी जो वर्ग किंवा ज्या जाती पुढारलेल्या मानल्या जातात त्यांनादेखील आरक्षणाचा लाभ मिळायला हवा असे सूचित केले आहे. एरवी ‘केवळ जन्म एखाद्या विशिष्ट जातीत झाला म्हणून संबंधितास संधी न मिळणे योग्य नाही’ या विधानाचा दुसरा अर्थ निघत नाही. पुढे ते म्हणतात, सर्वांना समान संधी मिळायला हवी. मध्यंतरी नागपुरात बोलताना, राज्यघटनेने ज्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण बहाल केले आहे त्यांना ते मिळतच राहिले पाहिजे असेही भागवत म्हणाले होते. कोणत्याही एखाद्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा असे म्हटले जाते तेव्हां सध्याचे धोरण मोडीत काढावे असेच त्यातून सूचित होते, अशी समाजाची धारणा बनत असते. त्यामुळे भागवतांच्या नव्या इलाजाविषयीदेखील तेच होऊ शकते. पण तरीही तो विषय बाजूला ठेऊन भागवतांनी शुद्ध हेतूने आपली भूमिका मांडली आहे असे गृहीत धरायचे झाल्यास पूर्णत: ^त्रयस्थपणे, अराजकीय आणि कोणत्याही प्रकारचे हितसंबंध न बाळगणारे लोक भागवत आणणार आहेत कोठून? आज सारे काही राजकारणग्रस्त झाले आहे व शैक्षणिक संस्थांचादेखील त्यात अपवाद नाही. पण तरीही भागवतांना त्रयस्थ लोक मिळाले, त्यांनी विचार केला, शिफारसी केल्या तर त्यांचा अंमल अखेर करणार कोण, राजकीय व्यवस्थाच ना? उलट या व्यवस्थेनेच वेळोवेळी आणि राजकीय हितासाठी आरक्षणाच्या धोरणाचा वापर करुन घेतला आहे. त्यातून कोणाला आरक्षणाची खरी गरज आहे आणि कोणाला नाही याचा निर्णय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींच्या आधीन राहूनच घ्यावा लागणार आहे. या तरतुदींना वळसा घालण्याचा हक्क आणि अधिकार कोणालाच नाही.