शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

भागवतांचा नुस्खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 03:55 IST

आरक्षणासाठी हरयाणात जाट समुदायाने सुरु केलेल्या हिंसक आंदोलनाने राजधानी दिल्लीलादेखील होरपळवून टाकल्यानंतर आणि सध्या त्या राज्यात संघ स्वयंसेवक मनोहरलाल

आरक्षणासाठी हरयाणात जाट समुदायाने सुरु केलेल्या हिंसक आंदोलनाने राजधानी दिल्लीलादेखील होरपळवून टाकल्यानंतर आणि सध्या त्या राज्यात संघ स्वयंसेवक मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची सत्ता असल्याने की काय सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर म्हणे एक अक्सीर इलाज शोधून काढला आहे. त्यांनी सुचविलेल्या नुस्ख्यानुसार देशपातळीवर एक अराजकीय अभ्यासगट स्थापन करायचा असून देशात आरक्षणासाठी कोण पात्र किंवा अपात्र आहे याचा निवाडा या अभ्यासगटाने करावयाचा आहे. अलीकडच्या काळात अनेक लोक आरक्षणाची मागणी करु लागले आहेत आणि त्यामुळे त्यावर सर्वसमावेशक विचार व्हावा व तो करणारे लोक कोणत्याही जाती-जमातीशी लागेबांधे नसणारे असावेत असेही भागवताना वाटते. बिहारच्या निवडणुकीच्या आधी भागवतांनी याच आरक्षण नीतीवर वक्तव्य करताना आरक्षणविषयक संपूर्ण धोरणाचा नव्याने विचार केला जावा असे म्हटले होते. त्यांचे ते वक्तव्य देशातून आरक्षणाचे उच्चाटन सूचित करणारे असल्याचा मन:पूत प्रचार लालूप्रसाद यादव यांनी त्यावेळी केला व त्यापायीच आपल्याला लज्जित करणाऱ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले असे भाजपाला आजही वाटते. भागवतांनी नव्याने या विषयावर बोलताना नि:संदिग्ध शब्दात जरी नाही तरी जो वर्ग किंवा ज्या जाती पुढारलेल्या मानल्या जातात त्यांनादेखील आरक्षणाचा लाभ मिळायला हवा असे सूचित केले आहे. एरवी ‘केवळ जन्म एखाद्या विशिष्ट जातीत झाला म्हणून संबंधितास संधी न मिळणे योग्य नाही’ या विधानाचा दुसरा अर्थ निघत नाही. पुढे ते म्हणतात, सर्वांना समान संधी मिळायला हवी. मध्यंतरी नागपुरात बोलताना, राज्यघटनेने ज्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण बहाल केले आहे त्यांना ते मिळतच राहिले पाहिजे असेही भागवत म्हणाले होते. कोणत्याही एखाद्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा असे म्हटले जाते तेव्हां सध्याचे धोरण मोडीत काढावे असेच त्यातून सूचित होते, अशी समाजाची धारणा बनत असते. त्यामुळे भागवतांच्या नव्या इलाजाविषयीदेखील तेच होऊ शकते. पण तरीही तो विषय बाजूला ठेऊन भागवतांनी शुद्ध हेतूने आपली भूमिका मांडली आहे असे गृहीत धरायचे झाल्यास पूर्णत: ^त्रयस्थपणे, अराजकीय आणि कोणत्याही प्रकारचे हितसंबंध न बाळगणारे लोक भागवत आणणार आहेत कोठून? आज सारे काही राजकारणग्रस्त झाले आहे व शैक्षणिक संस्थांचादेखील त्यात अपवाद नाही. पण तरीही भागवतांना त्रयस्थ लोक मिळाले, त्यांनी विचार केला, शिफारसी केल्या तर त्यांचा अंमल अखेर करणार कोण, राजकीय व्यवस्थाच ना? उलट या व्यवस्थेनेच वेळोवेळी आणि राजकीय हितासाठी आरक्षणाच्या धोरणाचा वापर करुन घेतला आहे. त्यातून कोणाला आरक्षणाची खरी गरज आहे आणि कोणाला नाही याचा निर्णय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींच्या आधीन राहूनच घ्यावा लागणार आहे. या तरतुदींना वळसा घालण्याचा हक्क आणि अधिकार कोणालाच नाही.