शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

पाडवा

By admin | Updated: October 31, 2016 06:52 IST

सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी.

-किशोर पाठकसूर्ये अधिष्ठीली प्राची जगा राणीव दे प्रकाशाचीतैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी. श्रोता हा तेव्हाच अर्थपूर्ण होतो जेव्हा तो ज्ञानात अवगाहन करून आनंदात परिवर्तीत होतो. पण मुळात आपण ऐकत नाही. ऐकणे आणि श्रवण करणे यात फरक आहे. श्रवणात श्रुतींचा संबंध आहे.आज दिवाळीच्या पवित्र दिनी काय नवीन संकल्प करावयाचे ते ठरवले असेलच. पण झेपतील, करता येतील असेच संकल्प करा नाही तर आला पाडवा केला आडवा असे व्हायचे. बरेच जण बरेच काही ठरवीत असतात, पण ठरविणे आणि घडणे यात निश्चयाची अटळ रेषा असते. ती पुसट झाली की ठरविले जाते, पण ते घडत नाही.आजचा प्रमुख प्रश्न संवादाचा आहे. किमान संवादाचा नंतर सुसंवादाचा. तसे पाहिले तर माणूस मूलत: वाईट, भ्रष्ट, लोभी, संतापी, क्रूर वगैरे नसतोच. मूल जन्मताना कुठलेच गुण उधळीत नाही. त्याला समाज सांगत राहतो हे असे असते म्हणून तू असे कर. मग त्याला जात, धर्म, परंपरा, संस्कार चिकटविले जातात म्हणून या कोवळ्या गोळ्यावर काय संस्कार होतील त्यावर त्याचे भविष्य अवलंबून. आपण थोर व्यक्तींचे दाखले देताना त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आवर्जून उल्लेख करतो. एखादा सन्मार्गी असला किंवा कुमार्गी असला तरी त्याच्या खानदानाची चौकशी होते. माणूस एकाच वेळी प्रचंड संवेदनशील आणि बधिर दोन्ही असतो. कुठला काळ जास्त त्यावर त्याचे भवितव्य आकार घेते. म्हणूनच अशा सणासुदीला चांगले होण्याचे उपदेश हमखास मिळतात.अगदी पाच वर्षांचं मूल असेल वा पंचाहत्तरीचा वृद्ध प्रत्येकाला दिवाळीची पणती वेगळीच वाटते. लहान मूल ते कुतुहलाने, गंमतीने पाहते, वातीचा चटका बसतो हेही त्याला फारसे माहीत नसते, पण वयोवृद्ध माणूस पणतीकडे पाहताना त्याला आयुष्यातील कितीतरी त्या ज्योतीशी निगडीत असलेले प्रसंग आठवतात. सुखाचे, दु:खाचे, आधाराचे, एकटेपणाचे, वैराग्याचे, प्रेमाचे... पाडवा या सर्वांना सामावून घेतो. आजच्या या दिवाळीच्या शुभदिनी आहे ती नाती घट्ट जपण्याचे ठरवू या. झाला तेवढा ताटातुटीचा अनुभव खूप झाला. निदान माणूस म्हणून एकत्र येऊ या. विसरू या जो कुठून आला त्याचे मूळ काय, कूळ काय, ही धूळ खाली बसायलाच हवी. ठरवून एकमेकांच्या सुखदु:खांचा सन्मान करायला शिकूया हे वारंवार सांगण्याची, बोलण्याची गरज आहे. कारण विस्मृती हा माणसाला शाप आणि वरदानही आहे. शाप चांगले विसरतो हा आणि वरदानात नको तो गाळ जपतो आपण ! हे झाडूनपुसून साफ करायला हवे. असा पाडवा त्यातच गोडवा !