शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

पाडवा

By admin | Updated: October 31, 2016 06:52 IST

सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी.

-किशोर पाठकसूर्ये अधिष्ठीली प्राची जगा राणीव दे प्रकाशाचीतैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी. श्रोता हा तेव्हाच अर्थपूर्ण होतो जेव्हा तो ज्ञानात अवगाहन करून आनंदात परिवर्तीत होतो. पण मुळात आपण ऐकत नाही. ऐकणे आणि श्रवण करणे यात फरक आहे. श्रवणात श्रुतींचा संबंध आहे.आज दिवाळीच्या पवित्र दिनी काय नवीन संकल्प करावयाचे ते ठरवले असेलच. पण झेपतील, करता येतील असेच संकल्प करा नाही तर आला पाडवा केला आडवा असे व्हायचे. बरेच जण बरेच काही ठरवीत असतात, पण ठरविणे आणि घडणे यात निश्चयाची अटळ रेषा असते. ती पुसट झाली की ठरविले जाते, पण ते घडत नाही.आजचा प्रमुख प्रश्न संवादाचा आहे. किमान संवादाचा नंतर सुसंवादाचा. तसे पाहिले तर माणूस मूलत: वाईट, भ्रष्ट, लोभी, संतापी, क्रूर वगैरे नसतोच. मूल जन्मताना कुठलेच गुण उधळीत नाही. त्याला समाज सांगत राहतो हे असे असते म्हणून तू असे कर. मग त्याला जात, धर्म, परंपरा, संस्कार चिकटविले जातात म्हणून या कोवळ्या गोळ्यावर काय संस्कार होतील त्यावर त्याचे भविष्य अवलंबून. आपण थोर व्यक्तींचे दाखले देताना त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आवर्जून उल्लेख करतो. एखादा सन्मार्गी असला किंवा कुमार्गी असला तरी त्याच्या खानदानाची चौकशी होते. माणूस एकाच वेळी प्रचंड संवेदनशील आणि बधिर दोन्ही असतो. कुठला काळ जास्त त्यावर त्याचे भवितव्य आकार घेते. म्हणूनच अशा सणासुदीला चांगले होण्याचे उपदेश हमखास मिळतात.अगदी पाच वर्षांचं मूल असेल वा पंचाहत्तरीचा वृद्ध प्रत्येकाला दिवाळीची पणती वेगळीच वाटते. लहान मूल ते कुतुहलाने, गंमतीने पाहते, वातीचा चटका बसतो हेही त्याला फारसे माहीत नसते, पण वयोवृद्ध माणूस पणतीकडे पाहताना त्याला आयुष्यातील कितीतरी त्या ज्योतीशी निगडीत असलेले प्रसंग आठवतात. सुखाचे, दु:खाचे, आधाराचे, एकटेपणाचे, वैराग्याचे, प्रेमाचे... पाडवा या सर्वांना सामावून घेतो. आजच्या या दिवाळीच्या शुभदिनी आहे ती नाती घट्ट जपण्याचे ठरवू या. झाला तेवढा ताटातुटीचा अनुभव खूप झाला. निदान माणूस म्हणून एकत्र येऊ या. विसरू या जो कुठून आला त्याचे मूळ काय, कूळ काय, ही धूळ खाली बसायलाच हवी. ठरवून एकमेकांच्या सुखदु:खांचा सन्मान करायला शिकूया हे वारंवार सांगण्याची, बोलण्याची गरज आहे. कारण विस्मृती हा माणसाला शाप आणि वरदानही आहे. शाप चांगले विसरतो हा आणि वरदानात नको तो गाळ जपतो आपण ! हे झाडूनपुसून साफ करायला हवे. असा पाडवा त्यातच गोडवा !