शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

पाडवा

By admin | Updated: October 31, 2016 06:52 IST

सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी.

-किशोर पाठकसूर्ये अधिष्ठीली प्राची जगा राणीव दे प्रकाशाचीतैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी. श्रोता हा तेव्हाच अर्थपूर्ण होतो जेव्हा तो ज्ञानात अवगाहन करून आनंदात परिवर्तीत होतो. पण मुळात आपण ऐकत नाही. ऐकणे आणि श्रवण करणे यात फरक आहे. श्रवणात श्रुतींचा संबंध आहे.आज दिवाळीच्या पवित्र दिनी काय नवीन संकल्प करावयाचे ते ठरवले असेलच. पण झेपतील, करता येतील असेच संकल्प करा नाही तर आला पाडवा केला आडवा असे व्हायचे. बरेच जण बरेच काही ठरवीत असतात, पण ठरविणे आणि घडणे यात निश्चयाची अटळ रेषा असते. ती पुसट झाली की ठरविले जाते, पण ते घडत नाही.आजचा प्रमुख प्रश्न संवादाचा आहे. किमान संवादाचा नंतर सुसंवादाचा. तसे पाहिले तर माणूस मूलत: वाईट, भ्रष्ट, लोभी, संतापी, क्रूर वगैरे नसतोच. मूल जन्मताना कुठलेच गुण उधळीत नाही. त्याला समाज सांगत राहतो हे असे असते म्हणून तू असे कर. मग त्याला जात, धर्म, परंपरा, संस्कार चिकटविले जातात म्हणून या कोवळ्या गोळ्यावर काय संस्कार होतील त्यावर त्याचे भविष्य अवलंबून. आपण थोर व्यक्तींचे दाखले देताना त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आवर्जून उल्लेख करतो. एखादा सन्मार्गी असला किंवा कुमार्गी असला तरी त्याच्या खानदानाची चौकशी होते. माणूस एकाच वेळी प्रचंड संवेदनशील आणि बधिर दोन्ही असतो. कुठला काळ जास्त त्यावर त्याचे भवितव्य आकार घेते. म्हणूनच अशा सणासुदीला चांगले होण्याचे उपदेश हमखास मिळतात.अगदी पाच वर्षांचं मूल असेल वा पंचाहत्तरीचा वृद्ध प्रत्येकाला दिवाळीची पणती वेगळीच वाटते. लहान मूल ते कुतुहलाने, गंमतीने पाहते, वातीचा चटका बसतो हेही त्याला फारसे माहीत नसते, पण वयोवृद्ध माणूस पणतीकडे पाहताना त्याला आयुष्यातील कितीतरी त्या ज्योतीशी निगडीत असलेले प्रसंग आठवतात. सुखाचे, दु:खाचे, आधाराचे, एकटेपणाचे, वैराग्याचे, प्रेमाचे... पाडवा या सर्वांना सामावून घेतो. आजच्या या दिवाळीच्या शुभदिनी आहे ती नाती घट्ट जपण्याचे ठरवू या. झाला तेवढा ताटातुटीचा अनुभव खूप झाला. निदान माणूस म्हणून एकत्र येऊ या. विसरू या जो कुठून आला त्याचे मूळ काय, कूळ काय, ही धूळ खाली बसायलाच हवी. ठरवून एकमेकांच्या सुखदु:खांचा सन्मान करायला शिकूया हे वारंवार सांगण्याची, बोलण्याची गरज आहे. कारण विस्मृती हा माणसाला शाप आणि वरदानही आहे. शाप चांगले विसरतो हा आणि वरदानात नको तो गाळ जपतो आपण ! हे झाडूनपुसून साफ करायला हवे. असा पाडवा त्यातच गोडवा !