शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इथले आभाळ त्याच्या मालकीचे...

By गजानन जानभोर | Updated: February 20, 2018 04:00 IST

‘काय म्हणते, काय म्हणते...मिलोची भाकर खाय म्हणते’ हे गाणे अनिरुद्ध तळमळीने गातो. आदिवासींच्या दु:खाची सनातन कारणे या गाण्यातून मांडताना तो संतापतो आणि कधीकधी निराशही होतो.

‘काय म्हणते, काय म्हणते...मिलोची भाकर खाय म्हणते’ हे गाणे अनिरुद्ध तळमळीने गातो. आदिवासींच्या दु:खाची सनातन कारणे या गाण्यातून मांडताना तो संतापतो आणि कधीकधी निराशही होतो. डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील चित्रपटात हे गाणे आधी चित्रबद्ध करण्यात आले. ते अनिरुद्धनेच लिहिले, त्यानेच संगीतबद्ध केले व गायलेदेखील त्यानेच. प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित झाला, त्यात मात्र हे गाणे पुसटसे दाखविण्यात आले. ‘ ते या सिनेमात पूर्ण का नाही? ’ अनिरुद्ध बोलत नाही, ‘दिग्दर्शकाचा अधिकार’ एवढेच तो सांगतो. हा सिनेमा लोकप्रिय झाला. डॉ. आमटेंच्या सेवाभावाची कीर्ती साºया जगात पोहोचली. परंतु ज्यांच्यासाठी डॉ. आमटेंनी आपले सर्वस्व दिले त्या आदिवासींच्या दुर्दैवाचे दशावतार मात्र अलक्षितच राहिले. दिग्दर्शकाला कदाचित डॉ. आमटेंच्या कार्यावरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने मूळनिवासींच्या हालअपेष्टा दुय्यम ठरल्या. आदिवासींचे पिढ्यान्पिढ्यांचे दु:खहरण करण्यासाठी नक्षलवादी ज्या भागात आले तिथेच डॉ. प्रकाश आमटेही गेले. पण, दोघांचीही साधने वेगळी होती. एकाचा मार्ग हिंसेचा, तर दुसºयाचा सेवेचा. नक्षलवाद्यांना त्या भागातील लोकांनी असहाय्यतेतून स्वीकारले तर डॉ. आमटेंना देवदूत म्हणून. अनिरुद्धला या गाण्यातून हेच सांगायचे होते, पण राहून गेले...त्याला ती सल सतत बोचत असते. आंबेडकरी जलशात मग तो पेटून उठतो, ‘‘भीम कोठे पाहू , माझा भीम कोठे पाहू’’...ऐकताना रोमांच उभे राहतात.अनिरुद्ध वनकर...आंबेडकरी जलशामुळे त्याला आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तसा तो झाडीपट्टीतील प्रतिभावंत कलावंत. गायक, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, निर्माता... सब कुछ अनिरुद्ध. तो रंगमंचावर आला की सर्वत्र व्यापून जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात बोरगाव या खेड्यातील तो राहणारा. वडील कोंबड्यांची कावड घेऊन रोज २५ कि़ मी. पायपीट करायचे, आई मजुरीवर जायची. गावशिवारातील कार्यक्रमांत तो गायचा. हळूहळू चळवळीत सक्रिय झाला. ‘द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता’ हे अनिरुद्धचे गाजलेले नाटक़ ‘कशी दारुड्याची धुरा मायच्या अंगावर आली...हे खेमराज भोयरचे गाणे ऐकताना बाया-बापड्यांच्या डोळयातून अश्रू वाहत असतात. सात-आठ सिनेमांतही त्याने काम केले आहे. ‘मी वादळवारा’ हा त्याचा आणखी एक कार्यक्रम. ३५ पोरांना घेऊन हा फिरस्ता वर्षभर हिंडत राहतो. काहीसा भणंग आणि बराचसा अवलिया...तो तब्बल चार विषयात एम. ए. आहे. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये त्याने काही वर्ष प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून नोकरीही केली. मुलाखतीच्यावेळी नसिरुद्दीन शहाने वन्समोअर म्हटले आणि ओमपुरींनी शाबासकी दिली. पण, तिथेही तो रमला नाही. पुन्हा झाडीपट्टीत परतला. नाटक सुरू असतानाच वडील वारले. पण प्रयोग थांबविला नाही, सकाळी बापावर अंत्यसंस्कार करून तो रंगमंचावर परतला. परभणीच्या कार्यक्रमात बहीण वारल्याचे कळले. पण त्याचे गाणे थांबले नाही. वैयक्तिक आयुष्यातील असे अनेक आघात अनिरुद्ध पचवत असतो. पण, आपल्यातील कलावंताला, कार्यकर्त्याला तो मरू देत नाही. ‘बाबासाहेबांना आम्ही कव्वालीपुरते मर्यादित केले’, ही अनिरुद्धची खंत. या कळकळीतूनच त्याने ‘मी वादळवारा’ सुरु केला आहे.एखाद्या सिनेमातून राहून गेलेल्या गोष्टी त्याला इथे सांगायच्या आहेत. कुणाची सेंसॉरशिप नाही, दिग्दर्शकाचे बंधन नाही, सिनेमातील नायकाच्या आवडीनिवडीही इथे आड येत नाहीत. त्यामुळे इथले आभाळ त्याच्याच मालकीचे आहे...- गजानन जानभोर (gajanan.janbhor@lokmat.com)