शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरुन आत का आतून बाहेर?

By admin | Updated: July 22, 2016 04:41 IST

माणूस सकाळी उठला की यांत्रिकपणे कामाला लागतो. आपण कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहोत

माणूस सकाळी उठला की यांत्रिकपणे कामाला लागतो. आपण कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहोत, आपल्याशिवाय हे जग चालू शकत नाही, असा त्याचा समज असतो. स्वत:च निर्माण केलेल्या या पिंजऱ्यात तो स्वत:च नकळतपणे अडकतो आणि नव्या दिवसाचे जोखड खांद्यावर घेऊन गैरसमजाची बरड जमीन नांगरायला सुरूवात करतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्याची हमाली सुरू होते. आपण कोणीतरी महान व्यक्ती आहोत सिद्ध करण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मानगुटीवर बसलेली असते आणि त्याला पुढे पुढे हाकलत नेत असते. तो पळू लागतो, तडफडू लागतो, स्वत:ला सिद्ध करण्याच्या ईर्षेने आंधळा होऊन जातो. पण आपण एका भ्रामक पिकातून दुसरे भ्रामक पीक काढण्याचा उद्योग करत आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. गैरसमजाच्या एका क्षेत्रातून गैरसमजाच्या दुसऱ्या क्षेत्रात जात आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. निरर्थकाकडून निरर्थकाकडे चाललो आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही आणि मग या अज्ञानातच त्याने आयुष्यातील आणखी एक सुंदर दिवस वाया घालवलेला असतो.हे असे का होते, तर माणूस जगाच्या नजरेने स्वत:कडे बघत असतो. लोक काय म्हणतील, हा प्रश्न त्याला छळत असतो. समाज काय म्हणेल या चिंतेने त्याला पछाडलेले असते, आपल्याशिवाय जग पुढे निघून जाईल अशी भीती त्याला वाटत असते. त्याने तो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न केलेला असतो. आपली दखल घेतली न जाणे म्हणजे आपला जणू मृत्यू असे त्याला वाटते. मग आपणच निर्माण केलेल्या भ्रमांच्या या जंगलात त्याची वाट चुकते ती कायमची ! तुम्ही जगाचा विचार करता पण स्वत:चा कधी करणार? आयुष्यभर बाहेर बघत राहाता पण आत कधी बघणार? ताओ तत्वज्ञानाचा निर्माता लाओत्सी म्हणतो की, तुम्ही बाहेर शोध घेण्याऐवजी स्वत:च्या आत डोकावून बघा. जगावर राज्य करण्याची स्वप्ने जे पाहातात ते त्यासाठी अपात्र असतात. ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणारे दररोज त्यांचे शारीरिक क्लेश आणि मानसिक यातना वाढवून घेत असतात. फूल जसे निरुद्देशपणे उमलते आणि जितक्या निरुद्देशपणे एकेक पाकळी आत मिटून घेत विलय पावते तसे माणसाला जगता आले पाहिजे. फुलाप्रमाणे आपल्या मूलस्थानी निर्मळपणे विलय पावणे, याला लाओत्सी शांती म्हणतो. ती जर मिळवायची असेल तर महत्वाकांक्षारहित आणि वखवखशून्य कसे जगावे याचे धडे माणसाला जाणीवपूर्वक गिरवावे लागतील. बाहेरून आत घेण्याऐवजी आतून बाहेर पडायला शिकणे हा त्यातला सर्वात महत्वाचा धडा!-प्रल्हाद जाधव