शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

खमक्या नेतृत्वाची सैरभैर फौज

By admin | Updated: October 28, 2016 04:50 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार?

- राजा मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार?सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे तसे जुने जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे राजकीय नाते! ७० च्या दशकात कृषी राज्यमंत्री असलेल्या पवारांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळताना या नात्याची बांधणी केली. त्यामुळे राजकारणात ते जसजसे मोठे होत गेले तसतसे ते नातेही घट्ट होत गेल्याचा अनुभव सर्वांना आला. त्याच कारणाने सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही पद त्यांनी पाठविलेल्या बंद पाकिटातील नावावरून निश्चित व्हायचे. पण गेल्या दशकात परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यांचा संपर्क मर्यादित नेत्यांपुरताच राहू लागला आणि जिल्ह्याचे आणि त्यांचे राजकीय नाते ठिसूळ बनले. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात तब्बल चार दिवस जिल्ह्यात घेतलेल्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या राजकीय नात्याची आठवण सर्वांनाच झाली असावी. शरद पवार आणि अजित पवार या दोघांची राजकीय कार्यपद्धती तशी भिन्न जातकुळीचीच! काका कुणालाही तळ शोधू न देणारे तर पुतणे अजितदादा रोखठोक बोलून ‘आत एक - बाहेर दुसरेच’ तत्त्वाला हद्दपार करणारे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना कार्यकर्त्यांच्या दोन स्वतंत्र फळ्या नैसर्गिकरीत्या तयार झाल्या. त्या फळ्यांनी थोरले पवार व धाकले पवार यांच्या कार्यपद्धतीशी सोयीने जुळवून घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा आभास निर्माण झाला. त्याच आभासाने पक्ष आणि नेते यांचा वापर आपले ‘सवतेसुभे’ मजबूत करण्यासाठी केला. परिणामी सवतेसुभे मजबूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेतेही जनतेपासून कधी दूर गेले हे कोणाला कळले नाही. आपल्या सुभ्यातील सत्ताकारणाला मदत करणारा सोयीचा नेता हे सूत्र गेल्या १०-१५ वर्षांत जिल्ह्यात रूढ झाले. देशात सर्वाधिक साखर कारखाने असणारा ३८ कारखान्यांचा जिल्हा म्हणून ख्याती निर्माण झाली. ते निर्माण करणारा राष्ट्रवादी पक्ष मात्र कागदावरच राहिला. निवडणुकीत सोयीचा आणि उमेदवारी देणारा तो आपला पक्ष अशीच काहीशी गणिते राष्ट्रवादी पक्षाची फौज मांडू लागली. ही पार्श्वभूमी घेऊन जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोर्चेबांधणीसाठी अजित पवार गतिमान झाल्याचे दिसले. यावेळी त्यांच्या गतिमानतेतील वेगळा दृष्टिकोन मात्र दिसला. परंपरेने चालत आलेल्या तथाकथित गाजावाजा करणाऱ्या मेळाव्यात न गुंतता थेट लोकांमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ७० हजार कोटी रुपयांच्या जलसंपदा विभागातील घोटाळ्याचा बनाव विरोधकांनी कशा पद्धतीने केला आहे हे ते आकडेवारीसह स्पष्ट करताना दिसले. आपला स्वभाव फटकळ नसून स्पष्टवक्तेपणाचा असल्याचे देखील ते कृतीने पटवून देताना दिसले. चितळे समितीने दिलेल्या दाखल्याच्या हवाल्याने राज्यात सहा टक्के सिंचन क्षेत्र वाढल्याचे ठासून सांगताना ते दिसले. उजनी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय त्यांनीच घेतला व धरणाची पाणी साठवण क्षमता ११४ टक्क्यांवर गेली हे देखील ते पहिल्यांदाच बोलताना दिसले. उजनी धरणासह कृष्णा खोऱ्यात त्यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पाची माहिती देताना सोलापूर जिल्हा रब्बी हंगामाचा होता तो बागायती कसा झाला? हेही ३८ साखर कारखान्यांचा पुरावा देत बोलताना दिसले. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात त्यांना विश्वासाने सोबत घेण्याची निती त्यांनी अवलंबिली. ते करतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क राहावा यासाठी आता ते जाहीर भाषणातच आपला मोबाईल क्रमांक कार्यकर्त्यांना देताना दिसले.कार्यकर्त्यांचा तोंडदेखलेपणा, फुका बडेजाव आणि पुढे पुढे करण्याच्या वृत्तीवर अजित पवार तुटून पडताना दिसले. एक आक्रमक आणि दूरदृष्टी असलेला स्पष्टवक्ता नेता अशी प्रतिमा नव्याने निर्माण करू पाहणाऱ्या अजित पवारांकडे ‘खमक्या’ नेता म्हणून पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या महापालिका-नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य मात्र त्यांच्या जिल्ह्याजिल्ह्यांत सैरभैर झालेल्या फौजेच्या बांधणीवरच अवलंबून आहे.