शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अरेरे, केवढा हा अपमान... रामशास्त्र्यांच्या भाषेत अखेरच्या प्रायश्चित्ताखेरीज दुसरी शिक्षा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:20 IST

पक्षाचा मोठा मेळावा भरला असताना व त्यात पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांसह भाजपचे सारे मुख्यमंत्री, मंत्री, पुढारी व नवे आशाळभूत हजर असताना तो पक्ष आपल्याला स्वानंद प्रवेश देईल या आशेने राणे दिल्लीत आले होते.

नारायण राण्यांना दिल्लीत नेऊन भाजपवाल्यांनी त्यांचे जे केले त्याला रामशास्त्र्यांच्या भाषेत अखेरच्या प्रायश्चित्ताखेरीज दुसरी शिक्षा नाही. पक्षाचा मोठा मेळावा भरला असताना व त्यात पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांसह भाजपचे सारे मुख्यमंत्री, मंत्री, पुढारी व नवे आशाळभूत हजर असताना तो पक्ष आपल्याला स्वानंद प्रवेश देईल या आशेने राणे दिल्लीत आले होते. हॉटेलातला मुक्काम टाकून ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या त्यांना बºयाच ज्युनियर असलेल्या पुढाºयाच्या घरी दाखल झाले. मात्र दुपारी अडीच वाजता तेथे पोहचलेले राणे रात्री साडेनऊपर्यंत अमित शहा यांची वाट पाहत ताटकळत राहिले. दानवे आणि चंद्रकांत पाटील साथीला होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यांची काही मिनिटे दखल घेण्याचे अगत्य दाखविले. मात्र आश्वासनाचा शब्द नाही की पक्षाचा साधा निरोप नाही. राणे बसून राहिले. तिकडे शहा आमदार-खासदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत रममाण होते. त्या संपवून ते राण्यांकडे जाण्याऐवजी ते कोणाचे तरी गाणे ऐकायला सरळ रवाना झाले. राणे बसूनच राहिले. पाटील आणि दानवेही एव्हाना वैतागले असणार. सात तासांचा जीवघेणा वेळ नुसतीच वाट पाहिल्यानंतर शहा एकदाचे आले आणि त्यांनी प्रथम एक इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले. मग काहीतरी खात त्यांनी राण्यांची विचारपूस केली. त्यांचे म्हणणे वा मागणे ऐकून घेण्याएवढा त्यांच्याकडे वेळ नव्हता. होता तो वेळ त्यांनी राण्यांना भाजपची शिस्त व संघाची विचारसरणी ऐकविली. पुढे विमान गाठायचे म्हणून ते निघूनही गेले. दारात जमलेल्या पत्रकारांना सांगण्यासारखे काही नव्हते म्हणून राणे भुयारी मार्गाने घराबाहेर पडले. माजी मुख्यमंत्री, सेनेचे नेते आणि कोकणचे सम्राट म्हणून ज्ञात असलेल्या राण्यांचा सात तास असा अपमान करणाºया शहा यांना महाराष्ट्र कधी क्षमा करणार नाही. तसाही दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राविषयीचा आकस आहे. दिल्लीला अटीवाचूनच्या संपूर्ण शरणागतीची सवय आहे. मागणे घेऊन येणाºयांची गणना तेथे वर्गणी मागायला येणाºया दयनीयात केली जाते. त्यातून राण्यांजवळ पद नाही, पक्ष नाही, माणसे नाहीत आणि कोकणचे साम्राज्यही त्यांनी गमावल्यागतच आहे. प. महाराष्ट्रात पवार त्यांना शिरू देत नाहीत. खान्देश व मराठवाड्यातही त्यांना येता येईल अशी फारशी स्थिती नाही आणि विदर्भ? ती तर फडणवीस आणि गडकºयांची संघभूमीच आहे. अशी तोकडी ओळख आणि तुटपुंजी कमाई असणाºया राण्यांना शाह यांनी इन्सुलिन घेत वीस मिनिटात कटवले असेल तर ते त्यांच्या मग्रुरीला साजेसे पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविणारे आहे. त्या बिचाºयाने तुमच्यासाठी काँग्रेस सोडली, तुमच्याचसाठी त्यांनी सेनेचा त्याग करून बाळासाहेब ठाकºयांचे वैर पत्करले. त्यांच्या दोन मुलांखेरीज त्यांच्या पाठीशी आता फारसे कोणी नाही. कधीकाळी सारे राज्य गाजविणाºया पुढाºयाच्या वाट्याला आजचे मागायचे दिवस आले म्हणून त्याची अशी उपेक्षा करायची काय? थांबा, महाराष्ट्राला जमले नाही तरी कोकण आणि त्यातला सिंधूदुर्ग तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. मोदी व शहांना वेळ नव्हता तरी त्या पक्षात इतरही पुढारी होते. त्यांनीही राण्यांना भेटण्याचे सौजन्य दाखविले नाही. आता सेना विरोधात, पवार विरोधात, काँग्रेस नव्याने विरोधात आणि भाजप आतून बंद. एका महत्त्वाकांक्षी माणसाची राजकारणाने केलेली ही कोंडी आहे. पण राणे साधा माणूस नाही. त्याची राजकीय ताकद ओसरली असली तरी आर्थिक शक्ती मोठी आहे. शहा यांचा बुलडोझर राण्यांकडून एक दिवस मोडला जाईल. तसे झाले नाही तर महाराष्ट्राच्या वाट्याला त्याची परंपरागत नाचक्की पुन्हा येईल, एवढेच.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे