शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वादातील लोकपाल

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

उच्चपदस्थांच्या गैरव्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निर्माण करावयाच्या ‘लोकपाल’ नावाच्या संस्थेचे

उच्चपदस्थांच्या गैरव्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निर्माण करावयाच्या ‘लोकपाल’ नावाच्या संस्थेचे आणि वादाचे जसे जवळचे नाते आहे तसेच तिच्या जन्माच्या अनिश्चिततेचेही अत्यंत निकटचे नाते आहे. अण्णा हजारे यांनी हा विषय लावून धरला आणि अनेक लोक त्यांच्या भोवती जमा झाले. हजारे यांना नुसता लोकपाल नको होता, तर जन लोकपाल हवा होता. त्यांच्या सभोवतालच्या लोकानी मग जनलोकपालाचे नारे देण्यास सुरुवात केली. त्यातून मोठे आंदोलन निर्माण झाले व या आंदोलनानेच आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्षाला आणि अरविंद केजरीवाल या नोकरशहाच्या राजकीय नेतृत्वाला जन्म दिला. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष स्वत:च्याच कारभारावर कोणी नियंत्रक येऊ देणार नाही हा ‘आप’च्या लोकांचा लाडका दावा असल्याने केजरीवाल यांच्या हाती दिल्ली शहराची सत्ता आल्यानंतर ते किमान त्यांच्या राज्यापुरता तरी जनलोकपाल नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा आता पूर्ण होण्याची चिन्हे केजरीवाल दाखवू लागले असले तरी त्यांंनी दिल्ली विधानसभेत मांडलेल्या विधेयकातील लोकपाल आणि अण्णांचा जनलोकपाल यात फार मोठे अंतर आहे. तितकेच नव्हे तर याआधी जेमतेम दोन महिने केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना व त्यांनी तडकाफडकी पदत्याग केला त्याआधी त्यांनीच जे विधेयक मांडले होते, त्या विधेयकात आणि आजच्या विधेयकातही भरीव अंतर आहे. त्यांच्या ताज्या विधेयकानुसार लोकपाल निवड समितीत केवळ चारच सदस्य राहणार असून त्यातील तिघे राजकीय क्षेत्रातले असतील व या तिघातली राजकीय क्षेत्रातील दोघे म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि स्वत: मुख्यमंत्री. याचा अर्थ केजरीवाल यांना जी व्यक्ती पसंत पडेल तीच लोकपाल होऊ शकेल. आधीच्या विधेयकात निवड समिती आठ सदस्यांची होती आणि त्यात ज्या केवळ दोनच राजकारण्यांचा समावेश होता त्यातील एक म्हणजे मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेता. एका अर्थाने ही रचना त्यातल्या त्यात अण्णांच्या जनलोकपालाच्या अधिक जवळ जाणारी. एखाद्या लोकपालास बडतर्फ करण्याचा अधिकार आधीच्या विधेयकात उच्च न्यायालयास बहाल केला गेला होता तर आता तो विधिमंडळातील दोन तृतीयांश सदस्यांच्या मर्जीवर ठेवला गेला आहे. विशेष म्हणजे हजारे यांच्या भोवती जी मंडळी जमा झाली होता त्यातील एक ज्येष्ठ विधिज्ञ शांतीभूषण यांनी केजरीवालांच्या लोकपालाचे ‘जोकपाल’ असे नामकरण केले असून केजरीवाल यांचे समर्थक व विरोधक यात लेखणी युद्ध सुरु झाल्याने शांतीभूषण यांनी केलेले नामकरण सार्थ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.