शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनिवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

वादातील लोकपाल

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

उच्चपदस्थांच्या गैरव्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निर्माण करावयाच्या ‘लोकपाल’ नावाच्या संस्थेचे

उच्चपदस्थांच्या गैरव्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निर्माण करावयाच्या ‘लोकपाल’ नावाच्या संस्थेचे आणि वादाचे जसे जवळचे नाते आहे तसेच तिच्या जन्माच्या अनिश्चिततेचेही अत्यंत निकटचे नाते आहे. अण्णा हजारे यांनी हा विषय लावून धरला आणि अनेक लोक त्यांच्या भोवती जमा झाले. हजारे यांना नुसता लोकपाल नको होता, तर जन लोकपाल हवा होता. त्यांच्या सभोवतालच्या लोकानी मग जनलोकपालाचे नारे देण्यास सुरुवात केली. त्यातून मोठे आंदोलन निर्माण झाले व या आंदोलनानेच आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्षाला आणि अरविंद केजरीवाल या नोकरशहाच्या राजकीय नेतृत्वाला जन्म दिला. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष स्वत:च्याच कारभारावर कोणी नियंत्रक येऊ देणार नाही हा ‘आप’च्या लोकांचा लाडका दावा असल्याने केजरीवाल यांच्या हाती दिल्ली शहराची सत्ता आल्यानंतर ते किमान त्यांच्या राज्यापुरता तरी जनलोकपाल नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा आता पूर्ण होण्याची चिन्हे केजरीवाल दाखवू लागले असले तरी त्यांंनी दिल्ली विधानसभेत मांडलेल्या विधेयकातील लोकपाल आणि अण्णांचा जनलोकपाल यात फार मोठे अंतर आहे. तितकेच नव्हे तर याआधी जेमतेम दोन महिने केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना व त्यांनी तडकाफडकी पदत्याग केला त्याआधी त्यांनीच जे विधेयक मांडले होते, त्या विधेयकात आणि आजच्या विधेयकातही भरीव अंतर आहे. त्यांच्या ताज्या विधेयकानुसार लोकपाल निवड समितीत केवळ चारच सदस्य राहणार असून त्यातील तिघे राजकीय क्षेत्रातले असतील व या तिघातली राजकीय क्षेत्रातील दोघे म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि स्वत: मुख्यमंत्री. याचा अर्थ केजरीवाल यांना जी व्यक्ती पसंत पडेल तीच लोकपाल होऊ शकेल. आधीच्या विधेयकात निवड समिती आठ सदस्यांची होती आणि त्यात ज्या केवळ दोनच राजकारण्यांचा समावेश होता त्यातील एक म्हणजे मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेता. एका अर्थाने ही रचना त्यातल्या त्यात अण्णांच्या जनलोकपालाच्या अधिक जवळ जाणारी. एखाद्या लोकपालास बडतर्फ करण्याचा अधिकार आधीच्या विधेयकात उच्च न्यायालयास बहाल केला गेला होता तर आता तो विधिमंडळातील दोन तृतीयांश सदस्यांच्या मर्जीवर ठेवला गेला आहे. विशेष म्हणजे हजारे यांच्या भोवती जी मंडळी जमा झाली होता त्यातील एक ज्येष्ठ विधिज्ञ शांतीभूषण यांनी केजरीवालांच्या लोकपालाचे ‘जोकपाल’ असे नामकरण केले असून केजरीवाल यांचे समर्थक व विरोधक यात लेखणी युद्ध सुरु झाल्याने शांतीभूषण यांनी केलेले नामकरण सार्थ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.