शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आगीमध्ये तेल

By admin | Updated: February 24, 2016 03:54 IST

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सुमारे दोन आठवड्यांपासून भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न काश्मीरातील हुरियतच्या नेत्यांनी केला असून या संघटनेने जेएनयु

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सुमारे दोन आठवड्यांपासून भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न काश्मीरातील हुरियतच्या नेत्यांनी केला असून या संघटनेने जेएनयु प्रकरणी येत्या शनिवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बंद पाळण्याचे तर शुक्रवारच्या नमाज पठणानंतर निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. हुरियतचे नेते सैय्यद अलि शाह गिलानी यांनी जेएनयु प्रकरण तापण्याच्या आधीच या विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याचे आव्हान भारत सरकारला दिले होते, हे विशेष. हुरियतचे सरचिटणीस शब्बीर शाह यांनी शुक्रवार आणि शनिवारचे आवाहन करताना केन्द्र सरकारवर ब्राह्मणवादाचे, दमनशाहीचे, दहशतवादाचे जे आरोप केले आहेत ते करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनाच त्यांना देते, जरी ते भारत सरकार आणि भारताच्या राज्यघटनेला कवडीचीही किंमत देत नसले तरी! संसदेवरील अतिरेकी हल्ला प्रकरणी ज्यांच्यावर आरोप होता पण ज्यांची निर्दोष मुक्तता केली गेली होती त्या प्रा.एसएआर गिलानी यांच्यावर आता ठेवण्यात आलेल्या आरोपाबद्दल हुरियतने गळे काढणेही योग्यच म्हणायचे. पण ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला आहे त्या कन्हैयाकुमारविषयी सहानुभूती व्यक्त करताना शब्बीर शाह यांनी त्याला अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. आपण ज्या घोषणा दिल्या त्यात काश्मीरचा कोणताही उल्लेख नव्हता असा दावा कन्हैयाकुमारने केला आहे व ते सिद्ध करणारे काही पुरावेही उपलब्ध झाले आहेत. असे असताना ‘जेएनयुमधील बुद्धिमान विद्यार्थ्यांना सत्य आणि वास्तवाचे भान आहे व म्हणून त्यांनी काश्मीर प्रश्नाशी एकनिष्ठता व्यक्त केली आहे’ असे जे विधान शब्बीर शाह यांनी केले आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो?