शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

आता पुरुष आरक्षण

By admin | Updated: May 18, 2015 00:36 IST

केन्द्रातील भाजपा सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करणे हा आपला निसर्गदत्त अधिकार असल्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि

केन्द्रातील भाजपा सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करणे हा आपला निसर्गदत्त अधिकार असल्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि या सरकारचे प्रमुख सिद्धरामय्या मानीत असतील तर तो त्या दोहोतला प्रश्न आहे, असे मानून सोडून देता येईल. कदाचित त्यामुळेच मोदी सरकारने प्रत्येक खासदाराने त्याच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करावा, अशी जी योजना अंमलात आणली, ती राबविण्यास कर्नाटक सरकारने चक्क नकार दिला असूनही केन्द्राने कोणताही वाद अजून तरी निर्माण केलेला नाही. परंतु पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठीचे पन्नास टक्क्यांचे आरक्षण लागू करण्याची कल्पना वा योजना भाजपा किंवा रालोआची नाही. ती सुरू केली गेली काँग्रेसच्याच राजवटीत. उलट हे आरक्षण वाढवावे असा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आग्रह आहे. परंतु तितकेच नव्हे, तर आरक्षणाचा लाभ घेऊन निवडून आलेल्या महिलांची मुदत पाचऐवजी दहा वर्षांची केली जावी अशी जी सूचना काही राज्यांनी अलीकडेच केली, तिचा विद्यमान रालोआ सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. असे असताना सिद्धरामय्या सरकारने त्या राज्यातील पंचायतींमधील महिला आरक्षणाला छेद देण्याचा अजब निर्णय घेतला आहे. तो घेताना त्यांनी एकीकडे महिलांसाठी असलेले पन्नास टक्क्यांचे आरक्षण आता पुरुषांनाही बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, तशी दुरुस्ती कर्नाटक पंचायत राज कायद्यात केली गेली आहे व तसे आदेशदेखील जारी केले आहेत. चालू महिन्याच्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी ही नवी रचना लागू होईल. कायद्यात बदल करण्याचे समर्थन करताना त्या राज्याचे पंचायत राज मंत्री के. एच. पाटील यांनी म्हटले आहे की, पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊन तब्बल पंचाऐंशी टक्के महिला निवडून जाण्यापर्यंत मजल गाठली गेल्याने बिचाऱ्या पुरुषांवर ‘अन्याय’ होऊ लागला आहे ! परिणामी संबंधित कायद्यातील ‘किमान पन्नास टक्के महिला’ या विधानाच्या ऐवजी ‘कमाल पन्नास टक्के महिला’ अशी शब्दयोजना केली गेली आहे. जे मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत, तेथून केवळ महिलाच निवडणूक लढवू इच्छितात; पण सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर त्यांना बंदी नसते. आता ती कर्नाटकात लागू केली जाईल. पण त्यात महिलांच्या सक्षमीकरणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. महिला सक्षम व्हाव्यात आणि जोवर त्यांच्यासाठी आरक्षण दिले जात नाही, तोवर ते होणार नाही, हे ओळखूनच केन्द्राच्या सूचनेवरून सर्व राज्यांनी संबंधित कायदे केले. ते करतानाच, महिलांचा टक्का वाढला तर ते स्वागतार्ह असेल ही भूमिका अनुस्यूत होती. कर्नाटकात तसे झालेले दिसते. त्यामुळे खरे तर त्या राज्याचा खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणून गौरवच झाला पाहिजे. पण हाच गौरव सिद्धरामय्या यांना मात्र नकोसा झालेला दिसतो.