शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

आता पुरुष आरक्षण

By admin | Updated: May 18, 2015 00:36 IST

केन्द्रातील भाजपा सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करणे हा आपला निसर्गदत्त अधिकार असल्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि

केन्द्रातील भाजपा सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करणे हा आपला निसर्गदत्त अधिकार असल्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि या सरकारचे प्रमुख सिद्धरामय्या मानीत असतील तर तो त्या दोहोतला प्रश्न आहे, असे मानून सोडून देता येईल. कदाचित त्यामुळेच मोदी सरकारने प्रत्येक खासदाराने त्याच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करावा, अशी जी योजना अंमलात आणली, ती राबविण्यास कर्नाटक सरकारने चक्क नकार दिला असूनही केन्द्राने कोणताही वाद अजून तरी निर्माण केलेला नाही. परंतु पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठीचे पन्नास टक्क्यांचे आरक्षण लागू करण्याची कल्पना वा योजना भाजपा किंवा रालोआची नाही. ती सुरू केली गेली काँग्रेसच्याच राजवटीत. उलट हे आरक्षण वाढवावे असा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आग्रह आहे. परंतु तितकेच नव्हे, तर आरक्षणाचा लाभ घेऊन निवडून आलेल्या महिलांची मुदत पाचऐवजी दहा वर्षांची केली जावी अशी जी सूचना काही राज्यांनी अलीकडेच केली, तिचा विद्यमान रालोआ सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. असे असताना सिद्धरामय्या सरकारने त्या राज्यातील पंचायतींमधील महिला आरक्षणाला छेद देण्याचा अजब निर्णय घेतला आहे. तो घेताना त्यांनी एकीकडे महिलांसाठी असलेले पन्नास टक्क्यांचे आरक्षण आता पुरुषांनाही बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, तशी दुरुस्ती कर्नाटक पंचायत राज कायद्यात केली गेली आहे व तसे आदेशदेखील जारी केले आहेत. चालू महिन्याच्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी ही नवी रचना लागू होईल. कायद्यात बदल करण्याचे समर्थन करताना त्या राज्याचे पंचायत राज मंत्री के. एच. पाटील यांनी म्हटले आहे की, पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊन तब्बल पंचाऐंशी टक्के महिला निवडून जाण्यापर्यंत मजल गाठली गेल्याने बिचाऱ्या पुरुषांवर ‘अन्याय’ होऊ लागला आहे ! परिणामी संबंधित कायद्यातील ‘किमान पन्नास टक्के महिला’ या विधानाच्या ऐवजी ‘कमाल पन्नास टक्के महिला’ अशी शब्दयोजना केली गेली आहे. जे मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत, तेथून केवळ महिलाच निवडणूक लढवू इच्छितात; पण सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर त्यांना बंदी नसते. आता ती कर्नाटकात लागू केली जाईल. पण त्यात महिलांच्या सक्षमीकरणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. महिला सक्षम व्हाव्यात आणि जोवर त्यांच्यासाठी आरक्षण दिले जात नाही, तोवर ते होणार नाही, हे ओळखूनच केन्द्राच्या सूचनेवरून सर्व राज्यांनी संबंधित कायदे केले. ते करतानाच, महिलांचा टक्का वाढला तर ते स्वागतार्ह असेल ही भूमिका अनुस्यूत होती. कर्नाटकात तसे झालेले दिसते. त्यामुळे खरे तर त्या राज्याचा खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणून गौरवच झाला पाहिजे. पण हाच गौरव सिद्धरामय्या यांना मात्र नकोसा झालेला दिसतो.