शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता अधिक धोका

By admin | Updated: October 1, 2016 02:11 IST

दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सेनेने त्यांना उपलब्ध करुन दिलेले तळ भारतीय सेनेने उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची कबुली देणे

दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सेनेने त्यांना उपलब्ध करुन दिलेले तळ भारतीय सेनेने उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची कबुली देणे म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्वत:च स्वत:ला नागवे करुन घेण्यासारखे असल्याने प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही, नियंत्रण रेषेनजीक थोडी चकमक झाली व तसे नेहमीच होत असते, असे पाकी सरकार व या सरकारचे बोलके पोपट असणाऱ्या माध्यमांनी म्हणत राहाणे ही त्यांची मजबुरी आहे. भारतीय सेनेने जो पराक्रम गाजविला तो एकीकडे अमान्य करायचा आणि दुसरीकडे पाकी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवायचे, युनोकडे गाऱ्हाणे मांडायचे, सीमेनजीकच्या प्रांतात अतिदक्षतेचा इशारा द्यायचा या साऱ्या घटना लक्षात घेता पाकिस्तानला सत्य लपविणे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे खोटे बोलणेही किती अवघड होत चालले आहे याची प्रचिती येते. बुधवारी रात्री भारतीय सेनेने पाक बळकावून बसलेल्या काश्मीर प्रांतात तीन किलोमीटर आत घुसून जी कारवाई केली, त्यानंतर आता अशा प्रकारची कोणतीही कारवाई नजीकच्या काळात करण्याचा भारताचा इरादा नसल्याचे लष्कराने अधिकृतरीत्या जाहीर केले असले तरी पिसाळलेला पाक गप्प बसेल असे नाही. याचा अर्थ भारताला अधिकच सावधान राहावे लागेल. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि तेथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी दिलेला इशारा लक्षणीय ठरतो. याच आठवड्यात पाकी संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी भारताविरुद्ध त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करण्याचा जो इशारा दिला त्याला अनुलक्षून हिलरी यांनी चिंता व्यक्त करातानाच अशी भीती व्यक्त केली आहे की, पाकिस्तान अणुबॉम्बचा थेट मारा करण्याऐवजी आत्मघातकी अणुबॉम्ब वाहकांचा वापर करु शकतो. तसेही पाकिस्तानने अतिभयानक संहार क्षमता असलेले अणुबॉम्ब तयार करण्याचा सपाटाच लावला आहे. अशा परिस्थितीत त्या देशात लष्करी वा जिहादी उठाव होऊ शकतो अशीही भीती हिलरी यांना वाटते आहे. तसे झाले आणि जिहादींच्या हाती अणुबॉम्ब लागले तर फार मोठा विनाश घडून येऊ शकतो. अर्थात अमोरिकेने ख्वाजा यांच्या वक्तव्याची अत्यंत गंभीर दखल अगोदरच घेतली आहे. अमेरिकेचेच संरक्षण मंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी अलीकडेच अणुशक्तीच्या संदर्भात भारत अत्यंत जबाबदार राष्ट्र आहे पण त्याचवेळी पाकिस्तानातील अणुबॉम्ब त्या देशातील कायमस्वरुपी संघर्षमय वातावरणात अडकून पडल्याचे म्हटले होते. त्यांनीच शुक्रवारी आणखी एक वक्तव्य करुन संरक्षणाच्या क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा सर्वात जवळचा सहकारी असल्याचेही म्हटले आहे. अर्थात हे सर्व कितीही खरे असले तरी या सर्व घटना सभ्य जगातल्या आहेत आणि सभ्यतेचे व पाकिस्तानचे दूरवरचेही नाते नाही. त्यामुळे भारतातील धोका अधिकत वाढला आहे आणि म्हणूनच अधिक दक्ष राहाण्याची गरजही वाढली आहे. पण त्यातील अत्यंत समाधानाची बाब म्हणजे जेव्हां देश आणि देशाच्या सार्वभौमत्वास कुणी आव्हान दिले तर मग आम्ही आपासतील राजकीय मतभेद बाजूला सारुन सरकारच्या पूर्ण पाठीशी राहू असे जे देशातील विरोधी पक्षांकडून वारंवार सांगितले जात होते, त्याची प्रचिती घुरुवारच्या दिवसभराच्या घटनाक्रमाने आणून दिली आहे. व ते निश्चितच स्वागतार्ह आहे.