शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

एकप्रकारे दयामरण नव्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 03:47 IST

विशेष बाब म्हणून आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेले अभिप्राय लक्षात घेऊन एका मरणाशी दुसरे मरण ताडून पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक ‘न भूतो’ निवाडा

विशेष बाब म्हणून आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेले अभिप्राय लक्षात घेऊन एका मरणाशी दुसरे मरण ताडून पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक ‘न भूतो’ निवाडा जाहीर करताना तब्बल सहा महिन्यांच्या गर्भाचा पात करण्याची जी अनुमती दिली आहे ती म्हणजे एकप्रकारे न्यायव्यवस्थेने दिलेले दयामरणच नव्हे तर अन्य काय? कायदेशीर म्हणजे वैद्यकीय गर्भपातास (एमटीपी) देशामध्ये मान्यता असली तरी वीस महिन्यांचा म्हणजे पाच महिन्यांच्या वाढीचा गर्भ कायद्याने पाडता येत नाही. तो गुन्हा ठरतो. अर्थात त्यामागे वैद्यकीय कारण आहे. फलधारणेनंतर स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारा अंकुर म्हणजे गर्भ पाच महिन्यांचा झाला की त्याचे अर्भकात रुपांतर होण्यास प्रारंभ झालेला असतो. याचा अर्थ एक सजीव मनुष्य प्राणी आकार घेऊ लागतो. तो काढून टाकणे ही जशी एकप्रकारची हत्त्या असते त्याचबरोबर इतकी वाढ झालेला गर्भ किंवा अर्भक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून का होईना काढून टाकण्यात या अर्भकाच्या मातेच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि कायद्याचे रक्षण करणारी न्यायालये अशा गर्भपातास कधीही मान्यता देऊ शकत नाहीत. परंतु तरीही एका अज्ञात महिलेने तिच्या गर्भाशयातील सहा महिन्यांची वाढ झालेला गर्भ पाडून टाकण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली पण ती फेटाळली गेली. अर्थात त्याआधी या महिलेने काही वैद्यकीय व्यावसायिकांना विनंती करुन पाहिली होती. पण कायद्यातील कठोर तरतुदीमुळे साऱ्यांनी गर्भपात करण्यास नकारच दिला होता. दोन्ही मार्ग खुंटल्यानंतर सदर महिला सर्वोच्च न्यायालयात गेली. तिची याचिका दोन मुद्यांवर आधारित होती. एक म्हणजे तिला लग्नाचे वचन देऊन गरोदर केल्यानंतर दुसऱ्याच महिलेशी लग्न करुन मोकळा झालेल्या एका पुरुषाने केलेली तिची फसवणूक. स्वाभाविकच याला तिने बलात्कार म्हटले. आणि बलात्कारातून जन्मास येणारे मूल तिला नको होते. दुसरे कारण म्हणजे तिच्या पोटात वाढणारा गर्भ वैद्यकीयदृष्ट्या निरोगी नसल्याने व त्यात व्यंग असल्याने त्याला जन्मास येऊ देणे यात त्या महिलेच्या जीवाला तर धोका होताच पण ते अर्भक निरोगी जीवन जगण्याच्या दृष्टीने अक्षम होते. न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतल्यानंतर सर्व संबंधितांचे म्हणणे तर पाचारण केलेच शिवाय मुंबईतील महापालिका रुग्णालयातील सात डॉक्टरांच्या पथकाला त्या महिलेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले. हा अहवाल सादर झाल्यानंतर मगच न्यायालयाने या महिलेस गर्भपात करुन घेण्याची अनुमती दिली. त्यासाठी संबंधित कायद्यातीलच एका तरतुदीचा आधार घेतला गेला. या तरतुदीनुसार गर्भामुळे मातेच्या जीवास धोका असल्याचे निदान झाले तरच गर्भपात कायदेशीर ठरु शकतो. अर्थात कायद्यातच अशी तरतूद असतानाही याच महिलेचा गर्भपात करण्यास काही डॉक्टरांनी नकार दिला होता. याचा अर्थ कायद्यात तरतूद असली तरी ती सर्रास वापरता येत नसावी असे दिसते. अशाच स्वरुपाचे एक प्रकरण आठ वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. निकिता मेहता नावाच्या महिलेच्या उदरातील अर्भक निरोगी नसल्याचे आढळून आल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर गर्भपाताची परवानगी मागितली होती. तोवर तिचा गर्भ सव्वीस आठवड्यांचा म्हणजे कायदेशीर वीस आठवड्यांच्या मर्यादेपेक्षा जास्तीच्या वाढीचा झाला होता. तथापि त्या गर्भाच्या जीवास धोका असल्याचे निर्विवाद मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी दिले नव्हते. परिणामी न्यायालयाने तिला परवानगी तर नाकारलीच पण वीस आठवड्यांच्या कायदामान्य मुदतीच्या आत तिने अर्भकाच्या अनारोग्याचे कारण पुढे करुन गर्भपाताची परवानगी मागितली असती तरी आपण ती दिली नसती असे म्हटले. सदर महिला आणि तिचे डॉक्टर निखिल दातार यांनी केलेली रदबदली न्यायालयाने ऐकून घेतली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार गर्भाच्या नव्हे तर मातेच्या जीवाला धोका असल्याचे निर्विवाद मत वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर न्यायालयासमोर आले तरच न्यायालय तशी अनुमती देऊ शकते असेही त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. अर्थात आजदेखील हे प्रकरण अनिर्णावस्थेत न्यायालयासमोर प्रलंबित आहे. ज्या अज्ञात महिलेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चोवीस आठवड्यानंतरदेखील गर्भपाताची परवानगी दिली आहे त्या प्रकरणात तिच्या जीवाला धोका असल्याचे निर्विवाद मत न्यायालयासमोर मांडले गेले असावे असे दिसते. पण ते कितीही खरे असले तरी आणि त्या महिलेचे मरण आणि जन्मास येणाऱ्या अर्भकाचे मरण परस्परांशी ताडून बघितल्यानंतर न्यायालयाने महिलेचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिले हेही खरे असले तरी गर्भाचे अर्भकात रुपांतर होण्यास प्रारंभ झाल्यानंतर ज्याच्या हत्त्येस कायद्याने प्रतिबंध आहे त्याचीच हत्त्या करण्यास जेव्हां न्यायालय अनुमती देते तेव्हां तार्किकदृष्ट्या ते दयामरणच ठरते.