शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निमंत्रण नव्हे, हा तर समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:09 IST

भारत आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी एकत्र बोलविण्याचा घेतलेला पवित्रा आंतरराष्ट्रीय राजकारणातील सारे संकेत धुडकावणारा आणि अन्य देशांहून आपण अधिक वरचढ आहोत

चीनचे परराष्टÑमंत्री वांग यी यांनी भारत आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी एकत्र बोलविण्याचा घेतलेला पवित्रा आंतरराष्ट्रीय राजकारणातील सारे संकेत धुडकावणारा आणि अन्य देशांहून आपण अधिक वरचढ आहोत हे दर्शविणारा आहे. अशी त्रिराष्टÑीय परिषद बोलवायची तर ती त्या तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वा त्यांच्या पंतप्रधानांनी बोलवायची. किमान त्या देशात अशा बैठकीसाठी पूर्वचर्चा व त्यांची सहमती आवश्यक समजली जाते. १९६५ च्या भारत-चीन युद्धानंतर रशियाने अशी बैठक बोलविली होती. मात्र ती घेण्याआधी त्या देशाने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आरंभी चर्चा करून त्या बैठकीसाठी त्या देशांची संमती मिळविली होती. आताचा चीनचा या बैठकीविषयीचा फतवा आदेशवजा किंवा समन्सवजा आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने तो भारत आणि पाकिस्तानला पाठविला आहे. या तथाकथित आदेशाचा अर्थ व त्यामागील हेतू साऱ्यांच्या लक्षात येणारा आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने आपल्या जागतिक स्तरावरील औद्योगिक कॉरिडॉरच्या उभारणीसाठी एक आंतरराष्ट्रीय बैठक संबंधित देशांना विश्वासात घेऊन बोलविली होती. ज्या देशातून हा कॉरिडॉर जाईल ते सारे देश या बैठकीला उपस्थित होते. त्या देशांनी त्या कॉरिडॉरला मान्यताही दिली. एकट्या भारताने त्याला आक्षेप घेऊन आपली संमती द्यायला नकार दिला. कारण चीनचा हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मिरातून जाणारा आहे. त्यासाठी तो प्रदेश चीनला वापरू द्यायला पाकिस्तान राजी आहे. मात्र तो त्या देशाने भारताच्या भूमीबाबत केलेला आगाऊपणा आहे. वास्तविक सारे काश्मीरच भारताचा अविभाज्य भाग आहे ही भूमिका भारताने थेट १९४७ पासून घेतली आहे व त्या भूमिकेसाठी भारताने काश्मीरमध्ये व थेट पाकिस्तानच्या सीमेवर त्या देशाशी युद्धेही केली आहे. या स्थितीत काश्मीरचा जो भाग आपल्या ताब्यात आहे तो चीनला वापरू देण्याचा पाकिस्तानचा पवित्रा केवळ भारतविरोधीच नाही तर आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात जाणारा आहे. आमचा देश काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानला वा अन्य कोणत्याही देशाला वापरू देणार नाही ही भारताची भूमिका आहे. त्याचमुळे चीनच्या कॉरिडॉरला अन्य देशांनी संमती दिली असली तरी भारताने ती नाकारली आहे. चीनचा आताचा त्रिराष्टÑीय बैठकीचा फतवा या पार्श्वभूमीवरचा आहे. तो काढण्याआधी चीनचे अध्यक्ष झी शिनपिंग यांनी ‘पुन्हा एकवार डोकलामसारखी स्थिती भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण होऊ नये’ अशी सूचक धमकी दिली आहे. त्या देशाच्या परराष्टÑमंत्र्याने काढलेल्या या फतव्याला त्या धमकीची पार्श्वभूमी आहे. पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश आम्हाला बºया बोलाने कॉरिडॉरसाठी द्या ही या धमकीमागची खरी सूचना आहे. या बैठकीचे निमंत्रण भारताने अद्याप स्वीकारले नाही व ते तो स्वीकारणारही नाही. कारण उघड आहे. हे निमंत्रण स्वीकारणे हा चीनच्या आक्रमक धोरणापुढे नमते घेण्याचा प्रकार ठरणार आहे. कोणताही सार्वभौम देश असे पाऊल कधी उचलणार नाही. पाकिस्तानला तो प्रदेश चीनला देण्यात कसलीही अडचण नाही. एकतर तो त्याचा नाही आणि त्यावरील त्याचा ताबा बेकायदेशीरही आहे. याउलट तो प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने त्यावर बेकायदेशीर कब्जा केला आहे असे भारताचे म्हणणे आहे. चीन आणि पाकिस्तान यांचे सख्य एवढे घनिष्ट की चीन सांगेल ते पाकिस्तान ऐकेल अशी त्यांची सध्याची मैत्री आहे. मात्र आपली मैत्री निभविण्यासाठी पाकिस्तान आपल्या ताब्यात असलेला भारताचा प्रदेश चीनच्या स्वाधीन करीत असेल तर त्याला भारत कधीच मान्यता देणार नाही. कारण तसे करणे हा भारताच्या भौगोलिक सार्वभौमत्वाचा भंग ठरेल. हा सारा प्रकार नीट ठाऊक असतानाही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशा बैठकीचा फतवा काढला असेल तर तो भारतावर धमकीवजा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे हे उघड आहे. चीन हा सामर्थ्यशाली देश असला तरी भारताला आपले सार्वभौमत्व जपणे आवश्यक आहे व ते आपल्या आंतरराष्टÑीय संबंधांच्या बळावर कायम राखणे त्याला आवश्यक आहे.