शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

नाही निर्मळ मन...

By admin | Updated: December 2, 2015 03:40 IST

केन्द्रामध्ये आलेल्या नव्या सरकारने महत्त्वाकांक्षी म्हणून जे काही प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यातील ‘स्वच्छ भारत’ या प्रकल्पाची रास्त व्याख्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

केन्द्रामध्ये आलेल्या नव्या सरकारने महत्त्वाकांक्षी म्हणून जे काही प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यातील ‘स्वच्छ भारत’ या प्रकल्पाची रास्त व्याख्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केली आहे आणि तीदेखील महात्मा गांधी यांचा आधार घेऊन. गांधीजींच्या व्याख्येतील स्वच्छतेमध्ये केवळ वातावरणीय आणि भोवतालीय स्वच्छतेचाच समावेश नसून मनाच्या स्वच्छतेचाही त्यात समावेश होतो, असे त्यांनी म्हटले आहे. भोवतालचे वातावरण स्वच्छ करतानाच मनदेखील स्वच्छ केले पाहिजे आणि या मनाला शांतता, सौहार्द आणि भ्रातृभावाची शिकवण देणे तितकेच अगत्याचे असले पाहिजे असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. गुजरात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बापूंच्या राज्यात जाऊन तिथेच त्यांनी हा उपदेश करण्याला एक वेगळे महत्व आहे. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात साराच देश आज सहभागी झाला आहे. कुठेच काहीही घडत नसताना आज कुठेतरी काहीतरी नक्कीच घडते आहे. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात हे काम चुटकीसरशी होण्यासारखे नाही, हे कोणीही समजू शकते. परंतु प्रयत्न होत राहणे महत्वाचे. पण राष्ट्रपतींचा रोख वेगळाच आहे. विद्यमान पंतप्रधान मूळ गुजरातचे आणि त्या राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले. महात्मा गांधीदेखील त्याच राज्याचे. परंतु आज मोदींच्या नावावर निवडून आलेले आणि त्यांच्या सत्तेत असण्याने चेकाळलेले अनेकजण आपल्या अस्वच्छ मनाचे दर्शन वारंवार घडवीत आहेत. समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम नेटाने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांनी त्यांचे सारे आयुष्य समाजातील सलोखा अबाधित राहण्यासाठीच खर्च केले, असे राष्ट्रपतींनी सांगणे याला वेगळे महत्व आहे. आपण एका विद्यापीठाच्या समारंभात बोलत आहोत याची विशेष नोंद घेताना, विद्यापीठ आणि अन्य शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मनात अहिंसेचे व परस्पर सामंंजस्याचे संस्कार केले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज संपूर्ण देशातील समाजजीवन एकप्रकारे विषयुक्त झाल्यासारखे असल्याने त्यावर कोणीतरी स्पष्टपणाने बोलणे गरजेचेच होते. राष्ट्रपती मुखर्जी यांनी ही गरज पूर्ण केली आहे.