शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवा कॅप्टन, नवी आशा! : ‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवतो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 09:47 IST

‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवितो’ अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे; परंतु तो महत्त्वाचा एक टाका घालायची वेळ टळल्यास, नऊच काय नऊशे टाके घालूनही उपयोग होत नाही!

स्व. इंदिरा गांधी काँग्रेसच्या सर्वेसर्वा असताना, धक्कादायक निर्णय हे त्या पक्षाचे वैशिष्ट्य होते. कालौघात काँग्रेस पक्षाची घसरण सुरू झाली आणि ते वैशिष्ट्य लयास गेले. अलीकडील काळात तर तातडीने हातावेगळे करण्याची गरज असलेले विषय प्रलंबित ठेवणे, निर्णय टाळणे, हेच काँग्रेसचे वैशिष्ट्य बनले होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा विषय हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण! आता मात्र काँग्रेस नेतृत्वाने कार्यशैलीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. गत सप्ताहाच्या शेवटी काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या ‘हेवी वेट’ मुख्यमंत्र्याचा अचानक राजीनामा घेतला आणि धक्कादायक निर्णय ही केवळ भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी नसल्याचे दाखवून दिले. महत्त्वाचे म्हणजे तो निर्णय अपवादात्मक नसल्याचेदेखील, चरणजित सिंग चन्नी यांच्यासारख्या चर्चेत नाव नसलेल्या नेत्याच्या हाती पंजाब सरकारची ‘कॅप्टनशिप’ सोपवून काँग्रेस नेतृत्वाने सिद्ध केले. चन्नी हे राज्याच्या पुनर्रचनेनंतरचे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघा चार महिन्यांचा अवकाश असताना, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणि चर्चेत नसलेल्या चन्नी यांच्यावर डाव खेळून काँग्रेस पक्षाने एकाच दगडाने अनेक शिकार साधण्याचा प्रयत्न केला आहे.

पंजाबमध्ये दलित मतदारांची संख्या मोठी आहे. स्वाभाविकपणे पंजाबमध्ये प्रत्येक पक्षाची नजर दलित मतदारांवर असते. स्वातंत्र्यानंतरची काही दशके देशभरातील दलित मतदार काँग्रेसशी एकनिष्ठ होता. पुढे मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. काँग्रेस कमकुवत होण्यामागे दलित मतदार पक्षापासून दुरावणे हेदेखील एक प्रमुख कारण आहे. पंजाबमध्ये प्रारंभी बहुजन समाज पक्षाने आणि अलीकडील काळात आम आदमी पक्षाने दलित मतदारांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. अकाली दलाने नुकतीच बहुजन समाज पक्षासोबत युती केली आहे आणि सत्तेत आल्यास दलित नेत्यास उपमुख्यमंत्रीपद देण्याची घोषणा केली आहे. अकाली दल-भाजप सरकारच्या राजवटीत संपन्न पंजाबची ‘उडता पंजाब’ अशी ओळख निर्माण होणे आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या जनतेवर पकड असलेल्या नेत्याकडे काँग्रेसचे नेतृत्व असणे, या कारणांमुळे गत विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला भरघोस कौल दिला. आताची परिस्थिती मात्र निराळी आहे.

एक तर अमली पदार्थांना आळा घालण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अमरिंदर सिंग सरकारला म्हणावे तसे यश मिळाले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अमरिंदर सिंग यांना पायउतार करूनही पंजाब काँग्रेसला लागलेले गटबाजीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच स्वतः अमरिंदर सिंग बंडाचा झेंडा हाती घेतील, असे संकेत मिळत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसला गटबाजीने पोखरले असले तरी, चन्नी मात्र त्यापासून दूर आहेत. एका महिला आयएएस अधिकाऱ्याने २०१८ मध्ये त्यांच्या विरोधात केलेली अनुचित संदेश धाडल्याची तक्रार वगळता, चन्नी यांचे नाव कोणत्याही विवादात कधी झळकले नाही. अशा रीतीने एक स्वच्छ प्रतिमेचा, दलित समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा आणि गटबाजीपासून दूर असलेला तरुण मुख्यमंत्री देऊन काँग्रेस नेतृत्वाने पंजाबमधील मतदारांना चांगला संदेश दिला आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून असलेले नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील जाखड हे दोन्ही प्रमुख नेते नाराज तर चांगलेच झाले असतील; पण त्यांच्यासमोर मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नाही. त्या दोघांपैकी कुणालाही मुखमंत्रीपदावर बसविणे काँग्रेसला परवडण्यासारखे नव्हते. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे अमरिंदर सिंग यांना आणखी डिवचणे ठरले असते.

जाखड शीख नसल्यामुळे त्यांच्या स्वीकारार्हतेचा प्रश्न होता आणि शिवाय त्यामुळे अकाली दलाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत उत्तम राजकीय खेळी काँग्रेसने केली आहे, यात वादच नाही; अलीकडेच भाजपनेदेखील अशाच प्रकारे काही राज्यांमधील मुख्यमंत्री बदलून संभाव्य ‘अँटी इन्कम्बसी’ला तोंड देण्याची तयारी केली. मात्र, तसे करताना नव्या मुख्यमंत्र्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, याचीही काळजी घेतली. ‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवितो’ अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे; परंतु तो महत्त्वाचा एक टाका घालायची वेळ टळल्यास, नऊच काय नऊशे टाके घालूनही उपयोग होत नाही! पंजाबमधील निवडणुकीला आता जेमतेम चारच महिने बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने टाका वेळेत घातला की नाही, या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी निवडणूक निकालाची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही!

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस