शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

गंभीर विचार होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:48 IST

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणांमध्ये तक्रारींबाबत असलेल्या संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याची कडक तरतूद सौम्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

- अ‍ॅड. असीम सरोदेअ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणांमध्ये तक्रारींबाबत असलेल्या संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याची कडक तरतूद सौम्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी पुढे आली आहे.अ‍ॅट्रॉसिटीतील अटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ‘सर्वसामान्य’ स्वरूपाचे आहेत, असे समजून दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. जर कोणत्याही कायद्यामध्ये जर संशयितांना अटक करण्यापूर्वी चौकशी करण्याचे अधिकार पोलिसांना आहेतच, तर मग अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबतच असे आदेश देण्याची काय गरज होती? ‘सर्वोच्च न्यायालयातील उच्च जातीच्या दोन न्यायाधीशांनी एसटीएस्सी अ‍ॅक्ट उलटा करून, दलित व अनुसूचित जमातीच्या लोकांना संरक्षण देण्याची तरतूद काढून टाकली आहे आणि आता उच्च जातीयांना संरक्षण देण्याची प्रक्रि या कायद्यात आणली आहे,’ असा थेट आरोप ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. इंदिरा जयसिंग यांनी टिष्ट्वटरवरून केला आहे. कुणीही न्यायाधीशांची व न्यायव्यवस्थेची बेअब्रू करू नये, परंतु अशा टीकांमधून आपण न्यायनिवाड्यांचे तटस्थ परीक्षण करावे, ही गरज मात्र नक्कीच महत्त्वाची मानली पाहिजे.जर एखादी गुन्हेगारी स्वरूपाची तक्र ार चुकीची किंवा खोटी असेल, तर अशा व्यक्तींविरुद्ध खटला दाखल करण्याचे हक्क पोलिसांना तर आहेतच. शिवाय अशा खोट्या तक्र ारींची ‘न्यायिक दखल’ घेऊन, खोटारड्या तक्रारदाराविरुद्ध फौजदारी खटला दाखल कराव्या, अशा सूचना देण्याचे अधिकार न्यायाधीशांनाही आहेत, तर मग सर्वोच्च न्यायालयाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील कडक अंमलबजावणीत अतिशिथिलता आणण्याची गरज का वाटली? अनेक सामाजिक संदर्भ, विषमतांचे वास्तव, भेदभावाची प्रक्रिया, सातत्याने जातीआधारित, लिंगाधारित होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी जर काही कायद्यांमधील तरतुदींमध्ये गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र केले असतील, तर मग त्यांचे स्वरूप ‘अदखलपात्र’ करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाला का वाटली? याची उत्तरे न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल झाली, तर द्यावी लागणार आहेत. कायद्यातील अनेक गुन्ह्यांचे स्वरूप दखलपात्र/ अदखलपत्र, जामीनपात्र/ अजामीनपात्र, तडजोडपात्र/ बिनातडजोडपात्र असे आहे. ही मूलभूत रचनाच जर बदलण्याचा उद्योग सर्वोच्च न्यायालय करीत असेल, तर गंभीर विचार व्हायला हवाच.अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या तरतुदींचा गैरवापर झाला नाही का? याचे उत्तर होय, गैरवापर झाला असेच आहे, पण मग तो कुणी केला आणि गैरवापर होत नाही, असा कोणता कायदा जगात आहे, या प्रश्नांची उत्तरेसुद्धा द्यावी लागतील. दलित समाजातील व्यक्तींना न्याय मिळविण्यासाठी गाव पातळीवरील प्रस्थापित, पोलीस यंत्रणा, न्याययंत्रणा, आर्थिक अडचणींशी सामना करावा लागतो.कडक तरतुदी असतानाच दलितांवरील अत्याचारात देशभर वाढ झाल्याची नोंद एनसीआरबीने घेतली. कायदा प्रभावी करण्यासाठी २०१५मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविणारे व अन्यायग्रस्त, तसेच साक्षीदार यांना संरक्षण देणारे प्रावधान करण्यात आले. या कायद्याचा गैरवापर राजकीय कारणांसाठी राजकारणात ताकदवान असणाऱ्यांनी देशभर केला. दलित समाजातील मूठभर लोकांनी स्वत:चा वापर या कायद्याचा गैरवापर करण्यासाठी करू दिला, हे वास्तव असले, तरीही अनेकांपर्यंत कायद्याच्या मदतीचे हात पोहोचले नाहीत, हे लक्षात घ्यावे लागेल.

टॅग्स :Courtन्यायालय