शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अनासक्तीयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:43 IST

डोकलाममधील समोरासमोरच्या तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला प्रथमच परवा भेट दिली. गेल्या चार वर्षांत त्या दोघांच्या दहा भेटी झाल्या

डोकलाममधील समोरासमोरच्या तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला प्रथमच परवा भेट दिली. गेल्या चार वर्षांत त्या दोघांच्या दहा भेटी झाल्या. त्यातील बहुतेक औपचारिक व निश्चित कार्यक्रमपत्रिका समोर ठेवून झाल्या. आताची भेट कार्यक्रमपत्रिकेवाचून झाली व तिचे स्वरूपही अनौपचारिक असल्याचे सांगितले गेले. या भेटीचे फलित कुणी सांगितले नाही व ते सांगितलेही जाणार नाही. मोदी आणि झिनपिंग यांच्यात या दौऱ्याच्या काळात सहा भेटी झाल्या. त्यातल्या काही त्या दोघांतच, कोणत्याही अधिकाºयाच्या उपस्थितीवाचून झाल्या. त्यामुळे परस्परांची मते व मने समजून घेण्याखेरीज त्यातून काही निष्पन्न होण्याजोगेही नव्हते. त्याचमुळे भाजपचे एक पुढारी राममाधव यांनी या भेटीचे ‘फळाची आशा न बाळगता झालेली भेट’ असे वर्णन करून तिच्याबाबत साºयांनी अनासक्तीयोग बाळगावा असा सल्ला देशाला दिला. परदेशाला दिलेली प्रत्येकच भेट फार यशस्वी होते असे नाही. नेत्यांची भेट हा त्यांच्यातील सलोखा दाखविण्याचाही एक भाग असतो. त्यातून चीन हा कमालीचा अविश्वसनीय देश आहे. त्याने नेहरूंना मित्र म्हटले व पुढे त्यांचा विश्वासघातही केला. १९७९ मध्ये तेव्हाचे परराष्ट्रमंत्री वाजपेयी हे चीनच्या दौºयावर असतानाच त्याने व्हिएतनाममध्ये आपले लष्कर घुसवून वाजपेयींना तो दौरा अर्ध्यावर सोडायला आणि चीनचा निषेध करून भारतात परतायला भाग पाडले. १९८८ मध्ये राजीव गांधींनी चीनला भेट दिली तेव्हा त्याने त्यांचे प्रचंड स्वागत केले. चर्चेची व दोन देशांमधील प्रश्नांची सोडवणूक करण्याची आश्वासनेही त्यावेळी चीनने दिली. प्रत्यक्षात ते प्रश्न तसेच राहिले. सीमेचा तंटा कायम राहिला आणि पुढल्या काळात चीनने अरुणाचल प्रदेशावर आपला हक्कच सांगितला. पाकव्याप्त काश्मिरातून, भारताचा निषेध डावलून त्याने औद्योगिक कॉरिडॉरचे बांधकाम सुरू केले. पुढल्या काळात व विशेषत: गेल्या तीन वर्षात त्याने नेपाळ, बांगलादेश, म्यानमार व श्रीलंकेसह मॉरिशस हे भारताचे शेजारी देश आपल्या बाजूने वळविले. पाकिस्तान तर त्याच्या सल्ल्यावाचून काहीएक करीत नाही. याच काळात चीनने भारताची फार मोठी बाजारपेठ काबीज केली. चिनी मालाची भारतातील आयात फार मोठी आहे. शिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा डोळा चुकवून ती थायलंड व अन्य मार्गानेही भारतात होत आहे. याउलट भारतीय मालाला चीनमध्ये उठाव नाही. व्यापारातले हे असंतुलन घालविण्याएवढे आपले अर्थबळ व औद्योगिक क्षेत्र विकसितही नाही. तसाही आरमारी सामर्थ्य, अर्थबळ आणि अण्वस्त्रे या साºयांच बाबतीत चीन भारताच्या फार पुढे आहे. चिनी मालावर बहिष्कार घालून त्याची कोंडी करण्याची भाषा मध्यंतरी काहीजणांनी करून पाहिली. तिचा काहीएक उपयोग झाला नाही. उलट आंतरराष्ट्रीय राजकारणातला तो हास्यास्पद प्रकारच तेवढा ठरला. एक गोष्ट मात्र महत्त्वाची. फलनिष्पत्ती होवो वा न होवो, हाती काही लागो वा न लागो आणि दोन देशांदरम्यानचे प्रश्न मार्गीर् लागो वा न लागो, नेत्यांच्या भेटी होत राहणे महत्त्वाचे आहे. कारण त्यातून निष्पन्न फारसे काही होणार नसले तरी त्यामुळे फारसे नुकसान होत नाही. केनेडी म्हणायचे, ‘भिऊन चर्चा करू नका. पण चर्चा करायलाही भिऊ नका’ बोलणी सुरू राहिली तर प्रश्न कायम असले तरी संवाद व सलोखा टिकत असतो. गेल्या ६० वर्षांत निर्माण झालेले प्रश्न व तणाव अशा एखाददुसºया भेटीने निवळतील असेही कुणी समजण्याचे कारण नाही. फळाची आशा न धरता काम करीत राहण्याचा, कर्मयोगाचा राममाधवांनी केलेला उपदेशच अशावेळी लक्षात घ्यायचा. चीनला अडसर घालता येत नाही, त्याला थोपविता येत नाही आणि त्याची बरोबरीही करता येत नाही. अशावेळी कर्मयोगाचा मार्ग स्वीकारण्याखेरीज दुसरा पर्यायही उरत नाही. सबब, भेटी होत रहाव्या आणि त्यातून कधीतरी काही हाती लागेल अशी अपेक्षाही कायम ठेवायची हेच अशावेळी म्हणायचे.