शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राष्ट्रीय अनासक्तीयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:43 IST

डोकलाममधील समोरासमोरच्या तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला प्रथमच परवा भेट दिली. गेल्या चार वर्षांत त्या दोघांच्या दहा भेटी झाल्या

डोकलाममधील समोरासमोरच्या तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला प्रथमच परवा भेट दिली. गेल्या चार वर्षांत त्या दोघांच्या दहा भेटी झाल्या. त्यातील बहुतेक औपचारिक व निश्चित कार्यक्रमपत्रिका समोर ठेवून झाल्या. आताची भेट कार्यक्रमपत्रिकेवाचून झाली व तिचे स्वरूपही अनौपचारिक असल्याचे सांगितले गेले. या भेटीचे फलित कुणी सांगितले नाही व ते सांगितलेही जाणार नाही. मोदी आणि झिनपिंग यांच्यात या दौऱ्याच्या काळात सहा भेटी झाल्या. त्यातल्या काही त्या दोघांतच, कोणत्याही अधिकाºयाच्या उपस्थितीवाचून झाल्या. त्यामुळे परस्परांची मते व मने समजून घेण्याखेरीज त्यातून काही निष्पन्न होण्याजोगेही नव्हते. त्याचमुळे भाजपचे एक पुढारी राममाधव यांनी या भेटीचे ‘फळाची आशा न बाळगता झालेली भेट’ असे वर्णन करून तिच्याबाबत साºयांनी अनासक्तीयोग बाळगावा असा सल्ला देशाला दिला. परदेशाला दिलेली प्रत्येकच भेट फार यशस्वी होते असे नाही. नेत्यांची भेट हा त्यांच्यातील सलोखा दाखविण्याचाही एक भाग असतो. त्यातून चीन हा कमालीचा अविश्वसनीय देश आहे. त्याने नेहरूंना मित्र म्हटले व पुढे त्यांचा विश्वासघातही केला. १९७९ मध्ये तेव्हाचे परराष्ट्रमंत्री वाजपेयी हे चीनच्या दौºयावर असतानाच त्याने व्हिएतनाममध्ये आपले लष्कर घुसवून वाजपेयींना तो दौरा अर्ध्यावर सोडायला आणि चीनचा निषेध करून भारतात परतायला भाग पाडले. १९८८ मध्ये राजीव गांधींनी चीनला भेट दिली तेव्हा त्याने त्यांचे प्रचंड स्वागत केले. चर्चेची व दोन देशांमधील प्रश्नांची सोडवणूक करण्याची आश्वासनेही त्यावेळी चीनने दिली. प्रत्यक्षात ते प्रश्न तसेच राहिले. सीमेचा तंटा कायम राहिला आणि पुढल्या काळात चीनने अरुणाचल प्रदेशावर आपला हक्कच सांगितला. पाकव्याप्त काश्मिरातून, भारताचा निषेध डावलून त्याने औद्योगिक कॉरिडॉरचे बांधकाम सुरू केले. पुढल्या काळात व विशेषत: गेल्या तीन वर्षात त्याने नेपाळ, बांगलादेश, म्यानमार व श्रीलंकेसह मॉरिशस हे भारताचे शेजारी देश आपल्या बाजूने वळविले. पाकिस्तान तर त्याच्या सल्ल्यावाचून काहीएक करीत नाही. याच काळात चीनने भारताची फार मोठी बाजारपेठ काबीज केली. चिनी मालाची भारतातील आयात फार मोठी आहे. शिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा डोळा चुकवून ती थायलंड व अन्य मार्गानेही भारतात होत आहे. याउलट भारतीय मालाला चीनमध्ये उठाव नाही. व्यापारातले हे असंतुलन घालविण्याएवढे आपले अर्थबळ व औद्योगिक क्षेत्र विकसितही नाही. तसाही आरमारी सामर्थ्य, अर्थबळ आणि अण्वस्त्रे या साºयांच बाबतीत चीन भारताच्या फार पुढे आहे. चिनी मालावर बहिष्कार घालून त्याची कोंडी करण्याची भाषा मध्यंतरी काहीजणांनी करून पाहिली. तिचा काहीएक उपयोग झाला नाही. उलट आंतरराष्ट्रीय राजकारणातला तो हास्यास्पद प्रकारच तेवढा ठरला. एक गोष्ट मात्र महत्त्वाची. फलनिष्पत्ती होवो वा न होवो, हाती काही लागो वा न लागो आणि दोन देशांदरम्यानचे प्रश्न मार्गीर् लागो वा न लागो, नेत्यांच्या भेटी होत राहणे महत्त्वाचे आहे. कारण त्यातून निष्पन्न फारसे काही होणार नसले तरी त्यामुळे फारसे नुकसान होत नाही. केनेडी म्हणायचे, ‘भिऊन चर्चा करू नका. पण चर्चा करायलाही भिऊ नका’ बोलणी सुरू राहिली तर प्रश्न कायम असले तरी संवाद व सलोखा टिकत असतो. गेल्या ६० वर्षांत निर्माण झालेले प्रश्न व तणाव अशा एखाददुसºया भेटीने निवळतील असेही कुणी समजण्याचे कारण नाही. फळाची आशा न धरता काम करीत राहण्याचा, कर्मयोगाचा राममाधवांनी केलेला उपदेशच अशावेळी लक्षात घ्यायचा. चीनला अडसर घालता येत नाही, त्याला थोपविता येत नाही आणि त्याची बरोबरीही करता येत नाही. अशावेळी कर्मयोगाचा मार्ग स्वीकारण्याखेरीज दुसरा पर्यायही उरत नाही. सबब, भेटी होत रहाव्या आणि त्यातून कधीतरी काही हाती लागेल अशी अपेक्षाही कायम ठेवायची हेच अशावेळी म्हणायचे.