शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नागपुरी माणसाची नजर मुंबईवर

By admin | Updated: April 4, 2016 02:31 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नागपूरकर व्यक्तीने मुंबईचा विकास केल्याचे मी दाखवून देईन’, असे विरोधी पक्षासह मित्रपक्ष शिवसेनेलादेखील विधानसभेत सुनावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नागपूरकर व्यक्तीने मुंबईचा विकास केल्याचे मी दाखवून देईन’, असे विरोधी पक्षासह मित्रपक्ष शिवसेनेलादेखील विधानसभेत सुनावले. नागपूरचे असून मुंबईच्या विकासाची कळकळ बाळगणारे फडणवीस हे नितीन गडकरींनंतरचे दुसरे भाजपा नेते आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना राजधानी मुंबईत उभारलेले ५५ उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ही गडकरींची देण. मंत्री होण्यापूर्वी गडकरी पक्के विदर्भवादी होते. नंतर ते बदलले. विकासाची भाषा बोलू लागले. आता फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचे धनुष्य उचलले आहे. मुळात मेट्रो असो की वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास, कोस्टल रोड असो की नवी मुंबई विमानतळ या सर्वच बाबतीत पारदर्शकतेची आवश्यकता आहे. फडणवीस ती आणू शकतात. वांद्रे वसाहतीच्या पुनर्विकासात दर्जेदार काम होणे आणि त्याचवेळी हा पुनर्विकास कंत्राटदारधार्जिणा न होता शासनाला त्याचा फायदा कसा होईल, हे लक्ष्य ठेवले तर या एकाच प्रकल्पात शासनाच्या तिजोरीत ८० हजार कोटी रुपयांची भर घालण्याची क्षमता आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकासासारखे आणखी चारदोन प्रकल्प मिळून राज्यावरील कर्ज फेडू शकतात. मात्र, त्यासाठी खंबीर निर्णयांची आवश्यकता आहे. फडणवीस घेणार असलेल्या प्रत्येक निर्णयाला पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाचा ‘सामना’ करावा लागणार आहे. मुंबईच्या विकासाचे राजकारण न करण्याचा सुज्ञपणा प्रत्येकच पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याने दाखविणे राज्याच्या हिताचे ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने एक मात्र स्पष्ट झाले आहे की, भाजपाला स्वतंत्र विदर्भ राज्याची घाई नाही. प्राधान्य विकासाला असेल. सत्तेत गेलेले विदर्भवादी नेते नंतर विकासाची भाषा बोलू लागतात हे नवीन नाही. काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांनी सत्तासुंदरीच्या पाशामध्ये जाताच हेच केले. त्यांनी विदर्भाचा मुळीच विकास केला नाही असे म्हणणे अन्यायकारक आहे. पण विदर्भाचे नेमके दुखणे लक्षात घेऊन त्यावरील उपाय असलेले प्रकल्प फारच कमी आले. विकासाबाबत पश्चिम महाराष्ट्राची नक्कल करणे (साखर कारखाने आदि) अव्यवहार्य होते.गडकरी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आज त्यामुळेच जाणवत आहे. आधी केंद्र सरकारला विकासकामांसाठी नागपुरातून शेकडो पत्रे जायची, त्याला पत्राने उत्तर यायचे. त्याच्याच जाहिराती केल्या जात. आज निधी येतोय हा मूलभूत फरक आहे. दीड वर्षाच्या काळात एम्स, आयआयएम, नॅशनल लॉ स्कूल, नॅशनल फार्मसी रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या नामवंत संस्था नागपुरात आल्या वा येण्याच्या मार्गावर आहेत. मेट्रो रेल्वेला साडेतीन हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. स्पोटर््स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे केंद्र नागपुरात आले. नागपूर विमानतळाचा विस्तार होणार आहे. संत्रा प्रक्रिया उद्योग येतोय. कोराडीमध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येतेय. सगळे काही विदर्भातच नेताय का, अशा तक्रारी सुरू होण्याइतपत हालचाली सुरू आहेत. श्रीहरी अणेंपासून सर्व विदर्भवादी नेत्यांसमोर आज नेमके हेच आव्हान आहे. गडकरी-फडणवीस यांनी दिलेल्या विकासाच्या पर्यायावर फुली मारून वैदर्भीय जनतेला विदर्भ राज्याच्या आंदोलनात खेचून आणण्याचे हे आव्हान आहे. आपापल्या कंपूंमध्ये असलेले विदर्भवादी नेते टिकतील असे वाटत नाही. दिवसा विदर्भ अन् रात्री वाडा/बंगला हेही बंद झाले पाहिजे. विदर्भात उपप्रादेशिक वाददेखील आहे. नागपूरहून विदर्भ राज्यासाठी निघालेली ललकारी अमरावतीत क्षीण होते आणि अकोला, बुलडाण्यात तर पार विरून जाते. विदर्भवादी नेत्यांनी विमानाने वा दुरंतोने मुंबईत येण्याऐवजी ‘विदर्भ‘ने बडनेरा, मूर्तिजापूर, नांदुरा, मलकापूर गाठले तर बरे होईल. हे जसे विदर्भवादी नेत्यांना लागू पडते तसेच ते गडकरी-फडणवीसांबाबतही आहेच. सगळा विकास नागपूर-चंद्रपूर केंद्रित होत असल्याची नाराजीची भावना लवकर दूर होणे विदर्भाच्या आणि नेतृत्वाच्याही हिताचे असेल. जाता जाता : मुख्यमंत्री बनायला निघालेले काँग्रसचे नेते रणजित देशमुख यांनी एका विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात, विदर्भ राज्याच्या मुद्द्याचे काँग्रेस समर्थन करीत नाही तोवर प्रचार करणार नाही, असे सांगून घोळ घातला आणि पराभूत झाले. आता त्यांचे पुत्र आशिष हे विदर्भाच्या मुद्द्यावर शहीद व्हायला चालले आहेत. इतिहासातील चुकांपासून काही शिकायचे असते हे देशमुखांना कोण सांगणार?- यदू जोशी