शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर मुंबई

By admin | Updated: January 7, 2015 22:40 IST

गेल्या शुक्रवारी नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावरील गोंधळानं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चांत चघळायला एक नवा विषय मिळवून दिला.

गेल्या शुक्रवारी नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावरील गोंधळानं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चांत चघळायला एक नवा विषय मिळवून दिला. मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईत रविवारी, ४ जानेवारी रोजी रात्री जे घडलं, त्यावर वृत्तवाहिन्यांनी भाष्य तर सोडाच, पण त्याची साधी बातमीही दिली नाही. आता रविवारनंतर तीन-चार दिवसांनी काय घडलं, कसं घडलं इत्यादी तपशील देणाऱ्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. वृत्तवाहिन्यांनी या विषयाला हातही लावलेला नाही.पहिल्या २ जानेवारीच्या घटनेनं मुंबईसारख्या महानगरातील वाहतूक व्यवस्था कशी अपुरी, कोलमडण्याच्या अवस्थेतील व बेभरवशाची झाली आहे आणि प्रशासन व पोलीस किती ढिसाळ आहेत, याचा प्रत्यय मुंबईकरांना आणून दिला. नागरिकांच्या संयमशीलतेचा अंत झाला की, मुंबई कशी पेटून उठते, हेही पहायला मिळालं. तसंच दुसऱ्या घटनेनं १९९२-९३ च्या दंगलीनंतर मुंबईत ‘ते व आम्ही’ अशी जी अदृश्य भिंत जनमानसात उभी राहिली आहे, त्याचा परिणाम म्हणून एखाद्या शुल्लक घटनेमुळंही वातावरण किती स्फोटक बनू शकतं, याचे प्रत्यंतर आले. केवळ पोलीस व प्रशासन या दोघांनी प्रसंगावधानता दाखवल्यामुळं मुंबई आणि देशही एका मोठ्या जातीयवादी दंगलीपासून वाचला.मुंबईत असंतोषाचा ज्वालामुखी कसा धगधगत आहे आणि त्याचा स्फोट कधीही, कोणत्याही कारणानं कसा होऊ शकतो, याची प्रचिती या दोन घटनांनी आणून दिली. देशात १०० नव्या ‘स्मार्ट सिटीज्’ उभ्या करण्याचा संकल्प आज सोडण्यात आला आहे. पण ‘शहर’ कसं चालवू नये, हे या दोन घटनांनी जे दाखवून दिलं, त्यापासून आपण या ‘स्मार्ट सिटीज’ वसवताना काही धडा घेणार आहोत की, नुसत्या ‘आधुनिक’तेच्या मागं लागून नवनवे ‘ज्वालामुखी’ निर्माण करणार आहोत, असा प्रश्न या दोन घटनांनी ऐरणीवर आणला आहे.मुंबईकर २ जानेवारीला रस्त्यावर का उतरले? कारण साधं होतं. ते म्हणजे उपनगरी गाड्या वेळेवर चालवा आणि काही बिघाड झाला, सेवा विस्कळीत झाली, तर त्याची योग्य माहिती प्रवाशांना देण्याची व्यवस्था करा, इतकीच मुंबईकरांची माफक अपेक्षा होती, आहे व असणार आहे. तीही पुरी होताना दिसत नाही आणि हातावर पोट असणाऱ्यांना आठवड्यातून तीनदा रोजगार बुडण्याची वेळ आली, तेव्हा असंतोषाचा कडेलोट झाला. ‘शहर’ कसं चालवायचं याविषयीचं पूर्ण अज्ञान आणि ‘शहर’ म्हणजे पैशाच्या थैल्या भरण्याचं एक चांगलं साधन अशी लोकप्रतिनिधींनी करून घेतलेली ठाम समजून या दोन गोष्टी मुंबईकरांची ही साधी अपेक्षाही पुरी करण्याच्या आड येत आहेत.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून हे महानगर म्हणजे राजकारण्यांच्या दृष्टीनं सोन्याची अंडी देणारे एक कोंबडी बनलं आहे. हाव सुटल्यासारखं राजकारणी मंडळी या शहराला ओरपून खात आहेत. त्यापायी मुंबईकरांचं जीवन निकृष्ट व भरड बनत गेल्याची पुसटशीही पर्वा या मंडळीना नाही. मग सरकार कोणाचंही असो. मुंबईकरांच्या जीवनात फरक काहीच पडलेला नाही.या बेपर्वाईबद्दलची चीड गेल्या शुक्रवारी मध्य रेल्वेची उपनगरी सेवा विस्कळीत होण्याच्या निमित्तानं उफाळून आली.बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईत डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये ज्या दंगली झाल्या, त्यामुळं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील समाजजीवन किती ठिसूळ पायावर उभं आहे, हे दिसून आलं होतं. या महानगराची ‘हिंदू’ व ‘मुस्लीम’ अशी विभागणीच या घटनांनी घडवून आणली. विविध जाती, जमाती, धार्मिक व वांशिक गट यांची सरमिसळ हे महानगरीय जीवनाचं वैशिष्ट्य असतं. तेच या दंगलींमुळे नष्ट झाले. त्यात पुढे ‘मराठी’ व ‘भय्ये’ अशी आणखी एक उपविभागणीय कौटुंबिक व राजकारणातील वर्चस्वासाठी गेल्या १०-१५ वर्षांत घडवून आणण्यात आली. आता गेल्या वर्षीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर ‘मराठी’ व ‘गुजराती’ असा एक सुप्त संघर्ष मुंबईत सुरू झाला आहे. या साऱ्या घटनांमुळे मुंबईतील जनजीवनाची जी एक घट्ठ वीण होती, या जनजीवनाचा जो सशक्त पोत होता तो आता पार विस्कटून गेला आहे. मुंबईत वरकरणी जरी सारं आलबेल दिसत असंल, घड्याळाच्या काट्यानुसार मुंबर्स २४ चालत असली, तरी थोडं बारकाईनं बघितलं, तर मुंबईकरांच्या मनात एक अवस्वस्थता, अनिश्चितता, एक भयगंड असल्याचं जाणवत राहतं. या सगळ्या मनोव्यापाराची तीव्रता महाराष्ट्रातील व एकूणच देशातील राजकारण जसं वळणं घेतं, तशी कमी जास्त होत असते; कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं त्यावर ताबा मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत चढाओढ लागलेली असते. त्यापायी या महानगरातील जनजीवन विस्कटलं, समाजमनातील अदृश्य भिंती आणखी उंचावत जाऊन भक्कम होत गेल्या, लोकांचे बळी पडले, तरी त्याची या राजकारण्यांना पर्वा नसते. गेल्या दोन तीन दशकांतील हा अनुभव मुंबईकरांच्या गाठीला आहे.मुंबईत रविवारी, ४ जानेवारीला जी ‘दंगल’ झाली नाही, त्यास राज्यातील व देशातील हे विधिनिषेशून्य राजकारण पूर्णत: जबाबदार आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या राजकारणाचा फायदा उठवून पाकच्या ‘आयएसआय’नं दाऊद इब्राहिमच्या माफिया टोळीच्या मदतीनं मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून आणले. आता २४ वर्षांनी भारत व पाक यांच्यात ‘जशास तसं’ उत्तर देण्याची स्पर्धा लागलेली आहे. अशावेळी जर पाकनं येथील गुड टोळ्या व जहालांच्या मदतीनं मुंबईच्या समाजजीवनात उभ्या राहिलेल्या अदृश्य भितींच्या आडून काडी टाकली, तर या धगधगत्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन काय घडेल?ज्या मुंबईकरांनी १९९२-९३ अनुभवलं, त्यांच्या अंगावर या नुसत्या कल्पनेनंही काटा येईल. प्रकाश बाळ