शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

पीडितांमध्ये स्त्रियाच जास्त

By admin | Updated: January 3, 2015 22:51 IST

नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना ही ऊठसूठ पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला एक खणखणीत चपराक आहे.

नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना ही ऊठसूठ पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला एक खणखणीत चपराक आहे. ही एक प्रतिनिधिक घटना म्हणता येईल. या एका वर्षात असे किमान १५ बळी अंधश्रद्धेतून गेल्याची माहिती अंनिसला मिळाली आहे. बहुतांश बळी हे स्त्रियांचे आहेत. हे प्रकार वेदनादायी व अस्वस्थ करणारे आहेत. एखादी व्यक्ती करणी, भानामती, जादूटोणा करते; डाकीण आहे असे समजून आजारपणावरील उपचार, सुखशांती किंवा गुप्तधनासाठी नरबळी घेतले गेले. महिलांना भूत उतरविण्याच्या बहाण्याने अमानुष मारहाण करण्याच्या तेवढ्याच घटना समोर आल्या आहेत. याशिवाय वेगळ््या २५ गुन्ह्यांत डाकीण, करणीच्या संशयावरून अमानुष मारहाण, बलात्कार अथवा अघोरी उपाय करण्यात आले. यातील जवळपास सर्वच महिला आहेत. इतकेच नव्हे तर आजपर्यंत दाखल झालेल्या ११0 पेक्षा जास्त गुन्ह्यांत पुरुषांपेक्षा शोषित स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. डझनभर गुन्ह्यांत स्त्रियांचे शारीरिक शोषण झाले आहे. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉ़ नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेली १८ वर्षे संघर्ष करून यासाठीच जादूटोणाविरोधी कायद्याची लढाई मोठ्या चिकाटीने लढली. राज्यात असे प्रकार होतात, म्हणूनच जादूटोणाविरोधी कायद्याची गरज अधोरेखित होते. मात्र अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. परंतु सध्या याबाबत सरकारचे प्रयत्न फारसे आश्वासक वाटत नाहीत. अंनिसच्या वतीने विविध मोहिमांतून कायद्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी क्षमतेनुसार प्रयत्न चालू आहेत. परंतु हा कायदा सरकारचा आहे याचीच सरकारला आठवण नसावी, अशी स्थिती आहे. कायद्याच्या मसुद्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात दक्षता अधिकारी नेमण्यात येणे आवश्यक होते, मात्र अपवाद वगळता तशा नेमणुका झाल्या नाहीत. पोलिसांना अजून कायदा समजलेला नाही; त्यांचेच प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. (लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिकचे कार्याध्यक्ष आहेत.)ग्रामीण आदिवासी भागात कायद्याबद्दल माहितीच नसणे, हे सरकारच्या अंमलबजावणीच्या धोरणाचे अपयश आहे. शाळा-महाविद्यालयापासून यात्रा कायद्याची माहितीसाठी सरकारच्या पुढाकाराची गरज आहे. यंत्रणा असल्याने सरकारला ते शक्य आहे. -कृष्णा चांदगुडे