शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

पीडितांमध्ये स्त्रियाच जास्त

By admin | Updated: January 3, 2015 22:51 IST

नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना ही ऊठसूठ पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला एक खणखणीत चपराक आहे.

नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना ही ऊठसूठ पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला एक खणखणीत चपराक आहे. ही एक प्रतिनिधिक घटना म्हणता येईल. या एका वर्षात असे किमान १५ बळी अंधश्रद्धेतून गेल्याची माहिती अंनिसला मिळाली आहे. बहुतांश बळी हे स्त्रियांचे आहेत. हे प्रकार वेदनादायी व अस्वस्थ करणारे आहेत. एखादी व्यक्ती करणी, भानामती, जादूटोणा करते; डाकीण आहे असे समजून आजारपणावरील उपचार, सुखशांती किंवा गुप्तधनासाठी नरबळी घेतले गेले. महिलांना भूत उतरविण्याच्या बहाण्याने अमानुष मारहाण करण्याच्या तेवढ्याच घटना समोर आल्या आहेत. याशिवाय वेगळ््या २५ गुन्ह्यांत डाकीण, करणीच्या संशयावरून अमानुष मारहाण, बलात्कार अथवा अघोरी उपाय करण्यात आले. यातील जवळपास सर्वच महिला आहेत. इतकेच नव्हे तर आजपर्यंत दाखल झालेल्या ११0 पेक्षा जास्त गुन्ह्यांत पुरुषांपेक्षा शोषित स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. डझनभर गुन्ह्यांत स्त्रियांचे शारीरिक शोषण झाले आहे. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉ़ नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेली १८ वर्षे संघर्ष करून यासाठीच जादूटोणाविरोधी कायद्याची लढाई मोठ्या चिकाटीने लढली. राज्यात असे प्रकार होतात, म्हणूनच जादूटोणाविरोधी कायद्याची गरज अधोरेखित होते. मात्र अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. परंतु सध्या याबाबत सरकारचे प्रयत्न फारसे आश्वासक वाटत नाहीत. अंनिसच्या वतीने विविध मोहिमांतून कायद्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी क्षमतेनुसार प्रयत्न चालू आहेत. परंतु हा कायदा सरकारचा आहे याचीच सरकारला आठवण नसावी, अशी स्थिती आहे. कायद्याच्या मसुद्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात दक्षता अधिकारी नेमण्यात येणे आवश्यक होते, मात्र अपवाद वगळता तशा नेमणुका झाल्या नाहीत. पोलिसांना अजून कायदा समजलेला नाही; त्यांचेच प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. (लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिकचे कार्याध्यक्ष आहेत.)ग्रामीण आदिवासी भागात कायद्याबद्दल माहितीच नसणे, हे सरकारच्या अंमलबजावणीच्या धोरणाचे अपयश आहे. शाळा-महाविद्यालयापासून यात्रा कायद्याची माहितीसाठी सरकारच्या पुढाकाराची गरज आहे. यंत्रणा असल्याने सरकारला ते शक्य आहे. -कृष्णा चांदगुडे