शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

मोदींची ओढाताण

By admin | Updated: December 23, 2014 01:21 IST

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्म, धर्मांतर व धर्मातली घरवापसी यांसारखे प्रश्न खरे तर निर्माणच होऊ नयेत.

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्म, धर्मांतर व धर्मातली घरवापसी यांसारखे प्रश्न खरे तर निर्माणच होऊ नयेत. मात्र, ते प्रश्न नुसतेच धार्मिक नसतील आणि त्याचे सूत्रधार राजकारणी असतील, तर मात्र ते नुसते निर्माणच होणार नाहीत, तर त्यांच्यामुळे साऱ्या समाजात एक भयकंपित वाटावी अशी अस्वस्थताही निर्माण होईल. आज तशी स्थिती देशात निर्माण झाली आहे आणि ती रा. स्व. संघाने हाती घेतलेल्या धर्मांतराच्या मोहिमेमुळे निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात घाऊक पद्धतीने मुसलमानांचे व ख्रिश्चनांचे धर्मांतर घडवून आणण्याचा उद्योग संघाच्या उपशाखांनी हाती घेतला आहे. त्याची स्फोटक छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रकाशित केली. तशीच ती दूरचित्रवाहिन्यांनीही देशाला दाखविली. संघ ही जुन्या जनसंघाची व आताच्या सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची जननी आहे. या मातृसंस्थेने स्वत:च धर्मांतराची मोहीम उघडल्यामुळे तिने निर्माण केलेल्या सत्तारूढ भाजपासमोर राजकीय अडचणी उभ्या राहिल्या आहेत. भाजपासह देशातील सर्व राजकीय पक्षांच्या खासदार व आमदारांनी देशाच्या धर्मनिरपेक्ष घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे. ही स्थिती भाजपाच्या लोकप्रतिनिधींना धर्मांतराच्या प्रश्नावर आपल्याच मातृसंस्थेच्या विरोधात उभे करणारी आहे. संघातून भाजपात आलेल्या अनेकांना ही अडचण वाटण्याचे कारण नाही. कारण, त्यांची मानसिकता संघानेच घडविली आहे. मात्र, भाजपाचे जे सभासद राजकारणातून व लोककारणातून पक्षात आले आहेत, त्यांना ही स्थिती कमालीची ओढाताणीची वाटणारी आहे. संघातून आलेल्या, मात्र जनतेत वाढलेल्या लोकसेवकांनाही ही स्थिती अस्वस्थ करणारी आहे. भाजपाचे आजचे नेतृत्व अशा वर्गात विभागले असल्याचे देशाला दिसतही आहे. गिरिराज सिंग, आदित्यनाथ, निरंजन ज्योती, साक्षी महाराज इ.सारखे जास्तीचे आततायी लोक संघाच्या या मोहिमेत खऱ्याखुऱ्या संघवाल्यांपेक्षाही काही पावले पुढे आहेत आणि ते आपली संघनिष्ठा जास्तीच्या कडव्या भूमिकांसह पार पाडताना दिसत आहेत. दुसरीकडे लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे पक्षाचे जुने व ज्येष्ठ नेते या प्रश्नावर मौन बाळगून आहेत. या मंडळींच्या मौनाचा अर्थ उघड आहे. कडव्या लोकांनी चालविलेला उठवळपणा त्यांना न आवडणारा आहे. मात्र, त्याविषयी बोलून संघाचा रोष ओढवून घेणे त्यांना न परवडणारे आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा सक्तीच्या धर्मांतराविरुद्ध बोलणारे आहेत. मात्र, त्यांना धर्मांतरबंदीचा कायदा हवा आहे. भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला आपला धर्म स्वेच्छेने निवडण्याचा व त्याची उपासना करण्याचा अधिकार दिला आहे. अमित शहा यांच्या भूमिकेतील पहिला भाग घटनामान्य असला, तरी दुसरा घटनेच्या विरुद्ध जाणारा आहे. या साऱ्या प्रकारात खरी अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला आली आहे. त्यांना धर्म, धर्मांतर वा घरवापसीसारख्या गोष्टींची चर्चा होणेच मान्य नाही. त्यांच्या पक्षाला गेल्या दहा वर्षांच्या विजनवासानंतर सत्ता मिळाली आहे आणि अनेक वर्षे राजकारणात परिश्रम केल्यानंतर मोदींनी देशाचे पंतप्रधानपद एकहाती मिळवले आहे. ते मिळविण्यासाठी त्यांनी देशासमोर विकास व चांगले प्रशासन यांचे आश्वासन ठेवले. त्यांच्या निवडणूक भाषणांत कुठेही हिंदू धर्म वा धर्मांतर यांसारखे विषय आले नाहीत. निवडणुकीनंतरही त्यांनी या प्रश्नापासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि पक्षातली जी माणसे त्याविषयी बेजबाबदारपणे बोलताना त्यांना दिसली, त्यांना त्यांनी योग्य ती समजही दिल्याचे दिसले. आताचा त्यांच्या पुढला प्रश्न मोठा आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधींवर त्यांचे नियंत्रण आहे आणि त्या प्रतिनिधींनाही मोदींचे नेतृत्व शिरोधार्ह आहे. संघाची गोष्ट वेगळी आहे. तीच विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेचीही वस्तुस्थिती आहे. या संघटना मोदींच्या नियंत्रणात नाहीत आणि त्या मोदींना आपला नेताही मानत नाहीत. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना ते हिंदू राष्ट्र असल्याचे घटनाविरोधी भाषण प्रत्यक्ष सरसंघचालक मोहन भागवत करतात, तर येत्या काही वर्षांत या देशातील १०० टक्के लोक हिंदू होतील, अशी भाषा स्वत:ला विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया बोलतात. विश्व हिंदू परिषद काय, संघ काय आणि भाजपा काय, या तीनही संघ या एकाच मुळाच्या शाखा आहेत. मात्र, त्या स्वतंत्र असल्याचे संघाने आजवर साऱ्यांना सांगितले आहे. मात्र, त्या साऱ्यांनी संघाचा शब्द प्रमाण मानला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा आहे. आताची भाजपाची व नरेंद्र मोदींची फरफट त्यातून आली आहे.