शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आधुनिक ‘विज्ञान’ सामान्यांना तुच्छ मानते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2023 08:07 IST

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले मत बदलू शकते, या वैज्ञानिक वृत्तीवर हल्ला करणारे तीन गट तयार झालेले आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे!

डॉ. अतिश दाभोलकर, संचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स, इटली

शब्दांकन : राहुल विद्या माने

युरोपमधील प्रबोधन काळाने विज्ञानाच्या मार्गाने ज्ञान संपादन, ज्ञानाची उपासना आणि त्यामार्गाने आपण वैश्विक किंवा सार्वकालिक सत्य शोधू शकतो असा विश्वास दिला. धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे, पोथीनिष्ठपणा सोडून देणे, व्यक्तीचे स्वातंत्र्य व त्यावर आधारित लोकशाही व्यवस्थांची उभारणी  या सर्व गोष्टी युरोपमधील प्रबोधन काळात साध्य झाल्या. हे सारे बदल आपल्याकडे झाल्याशिवाय ही प्रबोधन मूल्ये आपण साध्य करू शकणार नाही.

विज्ञानाची तत्त्वे एवढी सोपी, स्वाभाविक आहेत की जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे; पण लोकांना याप्रमाणे वागणे अवघड जाते. याची उदाहरणे आपण कोविडकाळात पाहिली. प्रारंभी लसीबद्दल लोकांना खात्री नव्हती; पण जसजसे पुरावे उपलब्ध होत गेले, तसतसा औषधांवरचा विश्वास आणि वापर वाढत गेला.   

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले  मत बदलू शकते. या वैज्ञानिक वृत्तीवर (scientific temper) हल्ला करणारे तीन गट सध्या तयार झालेले आहेत. तुम्ही युरोप -अमेरिकेतील विद्यापीठात गेलात, तर उत्तर-आधुनिकतावाद विचारसरणी  असे मानते की विज्ञानाच्या संकल्पना  “सामाजिकदृष्ट्या निर्मित” आहेत. १९८० च्या काळात नवगांधीवादी विचारसरणीच्या लोकांनी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही संशोधकांनी Statement on Scientific Temper हे एक निवेदन प्रसिद्ध केले होते. भारताच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन  मानवतावादी असल्याचे सांगितले आहे; पण १९८० च्या दशकात आशिष नंदी यांच्यासारख्या काही तत्त्वज्ञ व्यक्तींनी मांडले की वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादी नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये सामान्य माणसाबद्दल एक अर्वाच्य असा तुच्छतेचा भाव असतो, असे या गटाचे म्हणणे असते. 

एका बाजूला उत्तर-आधुनिकतावाद हा पाश्चिमात्य विज्ञानाच्या विरुद्ध केला गेलेला आक्रोश आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विज्ञान हे भारताच्या परंपरेशी जोडलेले नाही, असे मानणाराही एक गट आहे. सामाजिक न्यायासाठी विवेकवाद वापरला जाणे आणि त्याचा नागरिकांमध्ये प्रसार करणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांचे काम आहे. या कामाबद्दलच शंका निर्माण करणारे अति-डावे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही पददलितांच्या बाजूने उभे आहोत असा अभिनिवेश असलेले पारंपरिक ज्ञानवादी विचारवंत सहभागी आहेत.

तिसरे आक्रमण विज्ञानावर होत आहे ते “स्वदेशी आणि हिंदुत्ववादी” लोकांकडून! काही वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी  सायन्स काँग्रेसमध्ये “गणपतीचे डोके व तोंड म्हणजे भारतात प्लास्टिक सर्जरी आधीपासून होती याचा पुरावा आहे” अशा प्रकारचे विधान केले होते. अशा प्रकारचे विधान सायन्स काँग्रेसमध्ये करण्यामागची भूमिका काय आहे? तसे पाहता आशिष नंदी यांच्यासारख्या अभ्यासकांचा गट आणि हिंदुत्ववादी यांच्यात वैचारिक अंतर आहे; पण ‘स्वदेशीवाद’ या नावाखाली त्यांच्यात अभद्र युती आहे. वसाहतवादी आक्रमणाला गांधींनी विरोध केला होता.  ‘आमच्याकडे  पूर्वी विज्ञान होते तेच खरे’  या अभिनिवेशाखाली आधुनिक विज्ञानाला नाकारण्याचे प्रयत्न सामान्य माणसांनी करणे हा पश्चिमी आक्रमणाला (गांधींप्रमाणेच) केलेला विरोध आहे ही आक्रमक भूमिका सध्या समोर येत आहे. आपण सर्वांनी यात तथ्य काय आहे आणि मिथ्य काय आहे ते समजावून घेतले पाहिजे. 

विज्ञानावर होणाऱ्या या तीन हल्ल्यांमागे  वसाहतवादाला विरोध ही एक समान प्रेरणा आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे.  युरोपकेंद्रित इतिहास लिहिला गेल्यामुळे विज्ञान ही केवळ युरोपची देणगी आहे असे मानणाऱ्या आणि भारत व इतर पौर्वात्य देशांच्या मान-सन्मानावर हल्ला करणाऱ्या भूमिकेचा आपण निषेधच केला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी  बिहारमध्ये भूकंप झाल्यावर गांधीजी म्हणाले होते, “आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात असल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली.” त्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घेतला होता, हे विसरता कामा नये!

विज्ञान हा सगळ्यांचा हक्क व वारसा आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत, अशी अंनिसची भूमिका आहे. त्यामुळे मी उत्तर-आधुनिकतावाद आणि आशिष नंदीसदृश्य तत्त्वज्ञांच्या विचारामागची प्रेरणा समजू शकलो तरी त्याच्यातील तथ्य एवढेच आहे की विज्ञानाची ओळख ही केवळ ‘अभिजन’ म्हणून नाही.  विज्ञानाची  सत्ये केवळ उच्चभ्रू आणि अभिजन वर्गासाठी/ वर्गासमान आहेत या विधानाला/आक्षेपाला आता आधार राहिलेला नाही.

“प्रत्यक्षात वैज्ञानिक सत्य अस्तित्वात नाही, ती केवळ एक सामाजिक संरचना आहे”, या विधानालाही आधार नाही. भारतीय विज्ञानाच्या इतिहासात ब्रह्मगुप्त आणि माधवाचार्य यांनी अतिशय मूलभूत योगदान दिले आहे. त्यासारख्या योगदानाबद्दल आपण जरूर बोलत राहिले पाहिजे; पण त्याचवेळी आपल्याकडच्या प्राचीन इतिहासात सर्वच क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती झालेली होती, या तर्कालाही आपण विरोध केला पाहिजे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांक प्रकाशनप्रसंगी केलेल्या भाषणाचा सारांश. 

 

टॅग्स :scienceविज्ञान