शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आधुनिक ‘विज्ञान’ सामान्यांना तुच्छ मानते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2023 08:07 IST

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले मत बदलू शकते, या वैज्ञानिक वृत्तीवर हल्ला करणारे तीन गट तयार झालेले आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे!

डॉ. अतिश दाभोलकर, संचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स, इटली

शब्दांकन : राहुल विद्या माने

युरोपमधील प्रबोधन काळाने विज्ञानाच्या मार्गाने ज्ञान संपादन, ज्ञानाची उपासना आणि त्यामार्गाने आपण वैश्विक किंवा सार्वकालिक सत्य शोधू शकतो असा विश्वास दिला. धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे, पोथीनिष्ठपणा सोडून देणे, व्यक्तीचे स्वातंत्र्य व त्यावर आधारित लोकशाही व्यवस्थांची उभारणी  या सर्व गोष्टी युरोपमधील प्रबोधन काळात साध्य झाल्या. हे सारे बदल आपल्याकडे झाल्याशिवाय ही प्रबोधन मूल्ये आपण साध्य करू शकणार नाही.

विज्ञानाची तत्त्वे एवढी सोपी, स्वाभाविक आहेत की जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे; पण लोकांना याप्रमाणे वागणे अवघड जाते. याची उदाहरणे आपण कोविडकाळात पाहिली. प्रारंभी लसीबद्दल लोकांना खात्री नव्हती; पण जसजसे पुरावे उपलब्ध होत गेले, तसतसा औषधांवरचा विश्वास आणि वापर वाढत गेला.   

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले  मत बदलू शकते. या वैज्ञानिक वृत्तीवर (scientific temper) हल्ला करणारे तीन गट सध्या तयार झालेले आहेत. तुम्ही युरोप -अमेरिकेतील विद्यापीठात गेलात, तर उत्तर-आधुनिकतावाद विचारसरणी  असे मानते की विज्ञानाच्या संकल्पना  “सामाजिकदृष्ट्या निर्मित” आहेत. १९८० च्या काळात नवगांधीवादी विचारसरणीच्या लोकांनी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही संशोधकांनी Statement on Scientific Temper हे एक निवेदन प्रसिद्ध केले होते. भारताच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन  मानवतावादी असल्याचे सांगितले आहे; पण १९८० च्या दशकात आशिष नंदी यांच्यासारख्या काही तत्त्वज्ञ व्यक्तींनी मांडले की वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादी नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये सामान्य माणसाबद्दल एक अर्वाच्य असा तुच्छतेचा भाव असतो, असे या गटाचे म्हणणे असते. 

एका बाजूला उत्तर-आधुनिकतावाद हा पाश्चिमात्य विज्ञानाच्या विरुद्ध केला गेलेला आक्रोश आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विज्ञान हे भारताच्या परंपरेशी जोडलेले नाही, असे मानणाराही एक गट आहे. सामाजिक न्यायासाठी विवेकवाद वापरला जाणे आणि त्याचा नागरिकांमध्ये प्रसार करणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांचे काम आहे. या कामाबद्दलच शंका निर्माण करणारे अति-डावे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही पददलितांच्या बाजूने उभे आहोत असा अभिनिवेश असलेले पारंपरिक ज्ञानवादी विचारवंत सहभागी आहेत.

तिसरे आक्रमण विज्ञानावर होत आहे ते “स्वदेशी आणि हिंदुत्ववादी” लोकांकडून! काही वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी  सायन्स काँग्रेसमध्ये “गणपतीचे डोके व तोंड म्हणजे भारतात प्लास्टिक सर्जरी आधीपासून होती याचा पुरावा आहे” अशा प्रकारचे विधान केले होते. अशा प्रकारचे विधान सायन्स काँग्रेसमध्ये करण्यामागची भूमिका काय आहे? तसे पाहता आशिष नंदी यांच्यासारख्या अभ्यासकांचा गट आणि हिंदुत्ववादी यांच्यात वैचारिक अंतर आहे; पण ‘स्वदेशीवाद’ या नावाखाली त्यांच्यात अभद्र युती आहे. वसाहतवादी आक्रमणाला गांधींनी विरोध केला होता.  ‘आमच्याकडे  पूर्वी विज्ञान होते तेच खरे’  या अभिनिवेशाखाली आधुनिक विज्ञानाला नाकारण्याचे प्रयत्न सामान्य माणसांनी करणे हा पश्चिमी आक्रमणाला (गांधींप्रमाणेच) केलेला विरोध आहे ही आक्रमक भूमिका सध्या समोर येत आहे. आपण सर्वांनी यात तथ्य काय आहे आणि मिथ्य काय आहे ते समजावून घेतले पाहिजे. 

विज्ञानावर होणाऱ्या या तीन हल्ल्यांमागे  वसाहतवादाला विरोध ही एक समान प्रेरणा आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे.  युरोपकेंद्रित इतिहास लिहिला गेल्यामुळे विज्ञान ही केवळ युरोपची देणगी आहे असे मानणाऱ्या आणि भारत व इतर पौर्वात्य देशांच्या मान-सन्मानावर हल्ला करणाऱ्या भूमिकेचा आपण निषेधच केला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी  बिहारमध्ये भूकंप झाल्यावर गांधीजी म्हणाले होते, “आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात असल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली.” त्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घेतला होता, हे विसरता कामा नये!

विज्ञान हा सगळ्यांचा हक्क व वारसा आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत, अशी अंनिसची भूमिका आहे. त्यामुळे मी उत्तर-आधुनिकतावाद आणि आशिष नंदीसदृश्य तत्त्वज्ञांच्या विचारामागची प्रेरणा समजू शकलो तरी त्याच्यातील तथ्य एवढेच आहे की विज्ञानाची ओळख ही केवळ ‘अभिजन’ म्हणून नाही.  विज्ञानाची  सत्ये केवळ उच्चभ्रू आणि अभिजन वर्गासाठी/ वर्गासमान आहेत या विधानाला/आक्षेपाला आता आधार राहिलेला नाही.

“प्रत्यक्षात वैज्ञानिक सत्य अस्तित्वात नाही, ती केवळ एक सामाजिक संरचना आहे”, या विधानालाही आधार नाही. भारतीय विज्ञानाच्या इतिहासात ब्रह्मगुप्त आणि माधवाचार्य यांनी अतिशय मूलभूत योगदान दिले आहे. त्यासारख्या योगदानाबद्दल आपण जरूर बोलत राहिले पाहिजे; पण त्याचवेळी आपल्याकडच्या प्राचीन इतिहासात सर्वच क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती झालेली होती, या तर्कालाही आपण विरोध केला पाहिजे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांक प्रकाशनप्रसंगी केलेल्या भाषणाचा सारांश. 

 

टॅग्स :scienceविज्ञान