शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

मीमांसा की खदखद

By admin | Updated: October 26, 2015 22:56 IST

श्रीमती इंदिरा गांधी खऱ्या अर्थाने देशातील सर्वशक्तिमान सत्ताकारणी होत्या, त्याच काळात ‘किचन कॅबिनेट’ किंवा ‘कोटरी’ हे शब्द रुढ झाले होते.

श्रीमती इंदिरा गांधी खऱ्या अर्थाने देशातील सर्वशक्तिमान सत्ताकारणी होत्या, त्याच काळात ‘किचन कॅबिनेट’ किंवा ‘कोटरी’ हे शब्द रुढ झाले होते. श्रीमती गांधी यांच्या सत्तेच्या आंतरवर्तुळात ज्यांचा समावेश होता किंवा ज्यांना तिथे प्रवेश करण्याची अनुमती होती, त्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जाई. इंदिरा गांधींच्या पडत्या काळात याचेच मग मराठीत ‘चांडाळ चौकडी’ असे नामकरण झाले. अशा चौकडीतील लोक श्रीमती गांधींचे अत्यंत विश्वासू सल्लागार म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची पक्षावर तसेच सरकारवरदेखील जबर पकड होती. माखनलाल फोतेदार हे नाव याच चौकडीत समाविष्ट झालेले. इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर सत्तेवर आलेल्या राजीव गांधी यांनी आवर्जून अशा लोकाना दूर सारले आणि स्वत:चे वेगळे सल्लागार नियुक्त केले. याचा एक अर्थ असा की, इंदिरा गांधींच्या विश्वासातल्या लोकाना त्यांनी खड्यासारखे दूर सारले. (कारण इंदिरा गांधींची बदनामी होण्यात त्यांचा मोठा वाटा होता) त्याचा तेव्हां आलेला रागच बहुधा या फोतेदारांनी आपल्या आत्मचरित्रात काढला असावा असे दिसते. ज्यांनी देशाच्या मध्यवर्ती सत्तावर्तुळात दीर्घकाळ घालविला आणि तो काळ जवळून बघितला त्यांच्या आत्मचरित्रांना जिज्ञासू वाचकांच्या आणि इतिहासकारांच्या दृष्टीने निश्चितच महत्व असते. त्यादृष्टीने फोतेदार यांच्या ‘चिनार लिव्ह्ज’ (ते काश्मिरी असल्याने) या आगामी आत्मचरित्राकडेही तितक्याच उत्सुकतेने बघितले जाईल यात शंका नाही. अर्थात अशा आत्मचरित्रांमधून बऱ्याचदा आत्मप्रौढी आणि सत्यापलापही केलेला आढळून येत असतो. फोतेदार यांच्या आगामी आत्मचरित्राचे जे अंश प्रसिद्ध झाले आहेत, त्यातून दिसते ते असे की फोतेदार विद्यमान राजकारण आणि विशेषत: काँग्रेसची वाटचाल याची मीमांसा करीत आहेत. पण त्यात मीमांसा कमी आणि खदखद अधिक असल्याचे जाणवते. मुळात सोनिया गांधी म्हणजे इंदिरा गांधी नव्हेत आणि राहुल गांधी म्हणजे संजय गांधी नव्हेत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. पण ते सांगतानाच राजीव जसे राजकारणात येण्यास अनुत्सुक होते तसेच राहुल गांधीदेखील राजकारणाबाबत अनुत्सुक असून सोनिया त्यांना बळेच राजकारणात ओढत आहेत असे फोतेदार म्हणतात. राजीवना इंदिराजींनी राजकारणासाठी जसे तयार केले तसे सोनियांनी राहुलबाबत केलेले नाही, त्यामुळे आज ना उद्या दोहोंच्या नेतृत्वाला पक्षात आव्हान दिले जाईल हा माखनलाल यांचा होरा किंवा दावा ( की आशावाद?) आहे. सोनियांचा उमेदीचा काळ सरला आहे आणि राहुल यांचे नेतृत्व देश कदापि स्वीकारणार नाही, असेही फोतेदार यांना वाटते. फोतेदारांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर भविष्यकाळाच्या उदरात दडलेले असणारच. पण त्यांच्या या आगामी आत्मचरित्राचे आज सत्तावर्तुळात वावरणाऱ्यांना मोठे अप्रूप वाटेल व त्याचे सहर्ष स्वागत केले जाईल याबाबत मात्र शंका नाही.