शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मानसिक प्रदूषण

By admin | Updated: September 23, 2016 00:52 IST

राजधानी दिल्लीतील वर्दळीच्या मार्गावर भरदिवसा एका असहाय्य तरुणीवर एक माथेफिरु चाकूने सपासप वार करतो, त्याच्या हल्ल्यात सापडलेली तरुणी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारते

राजधानी दिल्लीतील वर्दळीच्या मार्गावर भरदिवसा एका असहाय्य तरुणीवर एक माथेफिरु चाकूने सपासप वार करतो, त्याच्या हल्ल्यात सापडलेली तरुणी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारते, पण त्या नराधमाचा रौद्र अवतार बघून जाणायेणाऱ्यांपैकी कुणीही पुढे येण्यास धजावत नाही व बघता बघता अवघ्या काही सेकंदात तब्बल ३२ वार करुन तो माथेफिरु त्या २१ वर्षीय तरुणीचा अंत करतो व पुन्हा तिला लाथेने तुडवतो, हे सारे कशाचे लक्षण मानायचे? परंतु इतके सारे करुन झाल्यानंतरही त्याचा संताप शांत झाला नाही म्हणून की काय तो तिच्या कलेवराचे डोळे काढण्याचाही प्रयत्न करतो. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना बघून समाजमन ढवळून निघाले. तरुणीचा नकार सहन न झाल्याने त्याने तिला आयुष्यातूनच संपवून टाकले. मन विचलित करणारी आणखी एक घटना बेंगळुरातही घडली. २२ वर्षीय तरुणीने केवळ १०० रुपये आणि मटण बिर्याणीसाठी एकदोन नव्हे तर चक्क ४२ बसेस जाळल्या. कावेरी तंट्यावरुन सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान घडलेल्या या प्रकाराची या तरुणीने स्वत: पोलिसात कबुली दिली आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरातही ती डिझेल ओतून बसेस पेटविताना स्पष्ट दिसते आहे. इकडे पुण्यात तर एका तरुणाने वडिलांच्या रागावरून स्वत:च्या दुचाकीसह परिसरातील अनेक वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. कामधंदा न करता रिकामटेकडा का फिरतोय, अशी विचारणा वडिलांनी केल्याने त्याचा राग अनावर झाला होता. या तीनही घटनांचा मागोवा घेताना एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता आजच्या तरुण पिढीत कशी निर्माण झाली हा प्रश्न मनाला भेडसावतो. एवढी अस्वस्थता का आहे? अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होत आहेत त्यामुळे जगण्यातील सहजता आम्ही गमावून बसलो आहोत. परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. नकारात्मकता वाढली असून असहिष्णुतेने कळस गाठला आहे. ही बिघडती परिस्थिती बघता विकासाच्या शर्यतीत घोडदौड करणाऱ्या या देशात समाजाच्या आणि प्रामुख्याने तरुण पिढीच्या मानसिक स्वास्थ्याचीही तेवढीच काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. पर्यावरणातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण हे सामाजिक आणि मानसिक प्रदूषण कसे थोपवायचे, याचाही विचार आता तातडीने करावा लागणार आहे.