शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

सार्थक झाले जन्माचे

By admin | Updated: February 9, 2015 01:33 IST

सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वत: रंगवून घेण्याची भूल पडावी ! तशी माणसाला ‘सार्थक झाले जन्माचे’ असे स्वत:च स्वत:ला सांगता यावे! अशी आस सतत भूलभुलय्यात अडकवत असते.

डॉ. कुमुद गोसावी -सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वत: रंगवून घेण्याची भूल पडावी ! तशी माणसाला ‘सार्थक झाले जन्माचे’ असे स्वत:च स्वत:ला सांगता यावे! अशी आस सतत भूलभुलय्यात अडकवत असते. वास्तविक आपल्या जीवनध्येयाशी आपले तादात्म्य कमी पडलेले असते. त्यामुळे अपेक्षित यश माणसाला मिळालेले नसते.प्राचीन काळी बुधकौशिक ऋषींना ‘रामरक्षा स्तोत्र’ भगवान शिवाकडून स्वप्नात सांगितले गेले नि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते लिहून काढताच त्यांना जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटल्यास नवल ते काय? औरंगाबाद जिल्ह्यातील चापानेरच्या बाबासाहेब रिठ्ठे या ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या कल्पकतेने हाताने वाजवले जाणारे वाद्य ‘कॅसियो’ चक्क डोक्याने वाजवण्याचा चंग बांधला. ज्या क्षणी तो पूर्णत्व पावला, त्यावेळी आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचा या कलावंताचा आनंद म्हणजे ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी अनुभूती देणारा. पद्मपुराणाच्या पातालखंडातील इच्छामरणी ‘जनका’च्या कथेत तो पुण्यात्मा स्वर्गाकडे निघाला. मात्र, त्याच्या अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शानेही वाटेतील यातनाग्रस्तांना दु:खमुक्तीचे समाधान लाभू लागले. ते जनकाच्या ध्यानी येताच त्याने यमराजाला ‘आपल्याला या दु:खी लोकांतच राहून माझे पुण्य त्यांच्या पापमुक्तीसाठी वाटायचेय, त्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे,’ असे आवर्जून सांगितले नि त्याने त्या दु:खी-पीडितांना पापमुक्त केले! स्वत: नरकात राहून. स्वर्गातील ऐषआरामाचे जीवन न स्वीकारता जनकाने स्वेच्छेने दु:खीजनांच्या वेदनामुक्तीसाठी नरकात म्हणजे दु:खसंकटात राहण्यात जीवनाचे सार्थक मानावे, हे विलक्षणच! स्वामी विवेकानंदांनी तर कालिमातेकडे स्वत:च्या बहिणीच्या विवाहाची इच्छा पूर्ण व्हावी असे मागणे मागितले, ‘माते! मला ज्ञान दे! भक्ती दे! विवेक दे!’ स्वत:च्या आईच्या, लहान भावंडांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी शिरावर असताना विवेकानंदांनी योग्य वेळी योग्य गोष्ट करण्यातच जीवनाचे सार्थक आहे, हे जाणले नि त्यानुसार आराध्य दैवतांकडे योग्य तेच मागून घेतले.एकदा विश्वामित्रांनी वसिष्ठ ऋषींना आपल्या एक हजार वर्षांची तपस्या दान केली नि बदल्यात एक क्षण सत्संगाचे फळ दिले तेव्हा विश्वामित्रांना तो अपमान वाटला. मात्र, विश्वामित्रांना घेऊन शेषाकडे गेले. आपल्या वस्तुबळाने माझ्यावरील भार जो उचलू शकेल तो श्रेष्ठ ठरेल, अशी शेषाने जेव्हा परीक्षा घेतली, तेव्हा वसिष्ठांचे सत्संगाच्या एका क्षणाचे बळच श्रेष्ठ ठरले! जीवनाचे सार्थक सत्संग आहे हेसिद्ध झाले.