शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

अन्वयार्थ >> जोशीमठ खचला, पश्चिम घाटावर तीच वेळ येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 08:14 IST

पश्चिम घाटातील ३८८ गावे पर्यावरणीय संवेदनशील यादीतून वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवला आहे. हे थांबले पाहिजे!

केंद्रीय पर्यावरण विभागाने जुलै २०२२ मध्ये आपल्या अधिसूचनेत महाराष्ट्रातील १७,३४० चौ.कि.मी. क्षेत्र  आणि यातील २१३३ गावे ही  पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. मात्र, विकास  योजनांसाठी यापैकी पश्चिम घाटातील ३८८ गावे पर्यावरणीय संवेदनशील यादीतून वगळण्यात यावीत असा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवला आहे. त्यांची ही भूमिका   अत्यंत चुकीची व घातक ठरणार असून पश्चिम घाट सुरक्षित राखण्याचा इशारा जोशी मठची दुर्घटना देत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने केंद्राला दिलेल्या या प्रस्तावामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात  ऱ्हास होणार असल्याने ही गावे संवेदनशील यादीतून वगळू नयेत अशी मागणी  ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर पर्यावरण अभ्यासकांनी केंद्र सरकारच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये. उलट त्यात आणखी काही नवीन गावे समाविष्ट   करावीत, अशी मागणी केली आहे.

संवेदनशील यादीतील ३८८ गावांमध्ये रायगड जिल्ह्यातील १२१ गावे, रत्नागिरी-९८, सिंधुदुर्ग-८९, ठाणे-१४ आणि पालघर-१ अशी ३२३ गावे कोकणातील आहेत. याशिवाय कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, धुळे या जिल्ह्यांतील काही गावांचा समावेश आहे. यादीतून जी  ३८८ गावे वगळण्यात येणार आहेत त्यातील ५५ गावांत औद्योगिक वसाहत, तर २५ गावांत स्पेशल झोन उभारला जाणार आहे. काही १९ गावांत मायनिंग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी  सुरुवातीला संवेदनशील यादीतील किमान ९९ गावांचा बळी दिला जाईल. यातील ७५ गावे ही खुद्द कोकणातील असतील. मिळालेल्या माहितीनुसार रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे २३ स्पेशल झोन उभे केले जाणार आहेत.

एकदा का हे प्रकल्प सुरू झाले की मग आधुनिक  बंदर उभारण्याची गरज सांगितली जाईल. मग पाठोपाठ रिफायनरी, वीज प्रकल्प, उंची हॉटेल्स, विमानतळ आणि सागरी महामार्ग उभे राहतील. विकासाच्या नावाखाली आधुनिक बंदर उभारणी सुरू होईल व त्यामुळे प्रवाळ नष्ट होतील, विविध स्थानिक माश्यांच्या प्रजननासाठी आवश्यक असे अधिवास नष्ट होतील. प्रवासी व मालवाहू जहाजांची ये-जा सुरू होईल व त्यामुळे समुद्रात तेल व वंगण गळती होऊन माशांना श्वास घेणे मुश्कील होईल.

औद्योगिक वसाहतींसाठी सपाटीकरण करावे लागेल. त्यामुळे जंगलतोड होऊन मोठ्या प्रमाणात मातीची धूप होऊन, जांभा दगड उघडा पडून हिरव्या गालिचा असलेले पठारांचे वाळवंटीकरण होण्याचा धोका आहे. सदाहरित जंगल तुटल्याने प्रदेशनिष्ठ अशा पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जाती लुप्त होतील. भात, आंबा, काजू, फणस, मसाले, औषधी वनस्पती नष्ट होतील, आदिवासी, शेतकरी, मच्छीमार देशोधडीला   लागेल/ त्यांची वाताहत होईल.

लोह, बॉक्साइटच्या खाणीमुळे गंभीर समस्या निर्माण होतात. गोवा, सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील खाणीमुळे त्या भागातील झाडे, बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. खाणीतील टाकाऊ माल शेतात, ओढ्यात फेकला जाऊन  ओढे बुजत आहेत. वाहतुकीचा धुरळा झाडांच्या मोहरांवर, फुलांवर पडून ती गळत असल्याचा अनुभव आहे. तलाव, ओढे, विहिरीत हा चिकट धुरळा पडून त्यातील काही झरे बंद पडले आहेत. त्यामुळे तलाव, ओढे, विहिरी कोरड्या पडत आहेत. याचा परिणाम मासे व भात उत्पादनावर होत आहे. पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे की गाडगीळ समितीचा सल्ला नाकारून, पर्यावरणाचे सर्व नियम   डावलून पश्चिम घाटात जो विकास करण्यात आला त्याच्यामुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने धुमाकूळ घातला. महाड व कोल्हापुरात दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले व जमिनीला तडे गेले. याचा अर्थ विकास नकोच असा नाही; पण जर मिश्रा समितीचा अहवाल नाकारून विकासाच्या नावाखाली फक्त नफा हे उद्दिष्ट ठेवले तर पुढे काय होते ते हे उत्तराखंडमधील जोशी मठ दुर्घटनेत  आपण बघत आहोत. त्यामुळेच संवेदनशील यादीतून ३८८ गावे वगळण्यास आपला विरोध असल्याचे सर्वांनी ठणकावून सांगितले पाहिजे व पश्चिम घाटाची जोशी मठाकडे  सुरू असलेली वाटचाल रोखली पाहिजे.

- राजेंद्र गाडगीळ, पर्यावरण कार्यकर्तेgadgilrajendra@yahoo.com

टॅग्स :environmentपर्यावरण