शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

अन्वयार्थ >> जोशीमठ खचला, पश्चिम घाटावर तीच वेळ येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 08:14 IST

पश्चिम घाटातील ३८८ गावे पर्यावरणीय संवेदनशील यादीतून वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवला आहे. हे थांबले पाहिजे!

केंद्रीय पर्यावरण विभागाने जुलै २०२२ मध्ये आपल्या अधिसूचनेत महाराष्ट्रातील १७,३४० चौ.कि.मी. क्षेत्र  आणि यातील २१३३ गावे ही  पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. मात्र, विकास  योजनांसाठी यापैकी पश्चिम घाटातील ३८८ गावे पर्यावरणीय संवेदनशील यादीतून वगळण्यात यावीत असा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवला आहे. त्यांची ही भूमिका   अत्यंत चुकीची व घातक ठरणार असून पश्चिम घाट सुरक्षित राखण्याचा इशारा जोशी मठची दुर्घटना देत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने केंद्राला दिलेल्या या प्रस्तावामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात  ऱ्हास होणार असल्याने ही गावे संवेदनशील यादीतून वगळू नयेत अशी मागणी  ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर पर्यावरण अभ्यासकांनी केंद्र सरकारच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये. उलट त्यात आणखी काही नवीन गावे समाविष्ट   करावीत, अशी मागणी केली आहे.

संवेदनशील यादीतील ३८८ गावांमध्ये रायगड जिल्ह्यातील १२१ गावे, रत्नागिरी-९८, सिंधुदुर्ग-८९, ठाणे-१४ आणि पालघर-१ अशी ३२३ गावे कोकणातील आहेत. याशिवाय कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, धुळे या जिल्ह्यांतील काही गावांचा समावेश आहे. यादीतून जी  ३८८ गावे वगळण्यात येणार आहेत त्यातील ५५ गावांत औद्योगिक वसाहत, तर २५ गावांत स्पेशल झोन उभारला जाणार आहे. काही १९ गावांत मायनिंग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी  सुरुवातीला संवेदनशील यादीतील किमान ९९ गावांचा बळी दिला जाईल. यातील ७५ गावे ही खुद्द कोकणातील असतील. मिळालेल्या माहितीनुसार रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे २३ स्पेशल झोन उभे केले जाणार आहेत.

एकदा का हे प्रकल्प सुरू झाले की मग आधुनिक  बंदर उभारण्याची गरज सांगितली जाईल. मग पाठोपाठ रिफायनरी, वीज प्रकल्प, उंची हॉटेल्स, विमानतळ आणि सागरी महामार्ग उभे राहतील. विकासाच्या नावाखाली आधुनिक बंदर उभारणी सुरू होईल व त्यामुळे प्रवाळ नष्ट होतील, विविध स्थानिक माश्यांच्या प्रजननासाठी आवश्यक असे अधिवास नष्ट होतील. प्रवासी व मालवाहू जहाजांची ये-जा सुरू होईल व त्यामुळे समुद्रात तेल व वंगण गळती होऊन माशांना श्वास घेणे मुश्कील होईल.

औद्योगिक वसाहतींसाठी सपाटीकरण करावे लागेल. त्यामुळे जंगलतोड होऊन मोठ्या प्रमाणात मातीची धूप होऊन, जांभा दगड उघडा पडून हिरव्या गालिचा असलेले पठारांचे वाळवंटीकरण होण्याचा धोका आहे. सदाहरित जंगल तुटल्याने प्रदेशनिष्ठ अशा पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जाती लुप्त होतील. भात, आंबा, काजू, फणस, मसाले, औषधी वनस्पती नष्ट होतील, आदिवासी, शेतकरी, मच्छीमार देशोधडीला   लागेल/ त्यांची वाताहत होईल.

लोह, बॉक्साइटच्या खाणीमुळे गंभीर समस्या निर्माण होतात. गोवा, सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील खाणीमुळे त्या भागातील झाडे, बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. खाणीतील टाकाऊ माल शेतात, ओढ्यात फेकला जाऊन  ओढे बुजत आहेत. वाहतुकीचा धुरळा झाडांच्या मोहरांवर, फुलांवर पडून ती गळत असल्याचा अनुभव आहे. तलाव, ओढे, विहिरीत हा चिकट धुरळा पडून त्यातील काही झरे बंद पडले आहेत. त्यामुळे तलाव, ओढे, विहिरी कोरड्या पडत आहेत. याचा परिणाम मासे व भात उत्पादनावर होत आहे. पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे की गाडगीळ समितीचा सल्ला नाकारून, पर्यावरणाचे सर्व नियम   डावलून पश्चिम घाटात जो विकास करण्यात आला त्याच्यामुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने धुमाकूळ घातला. महाड व कोल्हापुरात दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले व जमिनीला तडे गेले. याचा अर्थ विकास नकोच असा नाही; पण जर मिश्रा समितीचा अहवाल नाकारून विकासाच्या नावाखाली फक्त नफा हे उद्दिष्ट ठेवले तर पुढे काय होते ते हे उत्तराखंडमधील जोशी मठ दुर्घटनेत  आपण बघत आहोत. त्यामुळेच संवेदनशील यादीतून ३८८ गावे वगळण्यास आपला विरोध असल्याचे सर्वांनी ठणकावून सांगितले पाहिजे व पश्चिम घाटाची जोशी मठाकडे  सुरू असलेली वाटचाल रोखली पाहिजे.

- राजेंद्र गाडगीळ, पर्यावरण कार्यकर्तेgadgilrajendra@yahoo.com

टॅग्स :environmentपर्यावरण