शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

माथेरानकरांचे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 23:28 IST

माथेरान म्हणजे मुंबई नव्हे, कुणीही आले आणि जमिनी घेऊन हवे तसे मालक वा बिल्डर झाले. हव्या तशा झोपड्या बांधल्या आणि झोपड्यांचे इमले करून पुन्हा बिल्डरला देऊन टॉवर उभे केले

माथेरान म्हणजे मुंबई नव्हे, कुणीही आले आणि जमिनी घेऊन हवे तसे मालक वा बिल्डर झाले. हव्या तशा झोपड्या बांधल्या आणि झोपड्यांचे इमले करून पुन्हा बिल्डरला देऊन टॉवर उभे केले. हे सगळे मुंबईसारख्या मायानगरीत शक्य आहे. कारण मायानगरीच ती, तिथे कोण कुणाला रोखणार? पण मुंबईच्याच बाजूला असे एक निवांत गाव असावे जिथे कुणी निसर्गावर अतिक्र मण करू नये, जिथे निसर्ग जिवंत राहावा असा तब्बल १५० ते १६५ वर्षांपूर्वी इंग्रजांनी प्रयत्न केला. १८५० साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फीस्टन्स यांनी मुंबईच्या बाजूला थंड हवेचे ठिकाण असावे म्हणून माथेरानला हिल स्टेशनचा दर्जा दिला.

१९०७ साली आदमजी पिरभॉय यांनी २० किमी लांबीच्या माथेरान लाईट वेट रेल्वेची उभारणी केली. त्याचवेळी इंग्रज सरकारने या पठारावरील जवळपास ५०० एकर जागा मुंबईच्या धनिक बंगलेवाल्यांना दिली, तर उरलेली केवळ ५४ एकर जागा स्थानिक गावकऱ्यांना राहण्यासाठी दिली. तसे पाहिले तर हा शुद्ध अन्याय आहे. पण पैशाने सगळे विकत घेता येते हे धनिकांनी इंग्रजांच्या काळातही दाखवून दिले. बंगलेवाले केवळ विकेण्डला या हिल स्टेशनवर येतात, तर गावकरी पर्यटकांना सेवा-सुविधा पुरवणारे व्यवसाय चालवून आपले पोट भरतात. देश स्वतंत्र झाला तेव्हा माथेरानची लोकसंख्या ७०० ते ८०० एवढी होती. आज ६५ वर्षांत ती ४३८८ इतकी वाढली आहे.

लोकसंख्या वेगाने वाढतेय, येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील वाढत आहे, पण जमीन मात्र इंचभरही वाढत नाही. उलट हवामान बदलाच्या परिणामांमुळे पर्यावरणाचे नियम मात्र जाचक होत चाललेत. माथेरानवर जमीन वाढू शकत नाही ही स्पष्ट बाब आहे, आणि माथेरान हे पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील ठिकाण आहे. त्यामुळे या पठारावर किती लोकांनी राहायचे, किती बांधकाम करायचे तसेच किती झाडे तोडायची या प्रत्येक गोष्टीला काही बंधने आहेत. फक्त विषय एवढाच आहे की, स्थानिक महसूल, वन आणि नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी पैसेवाल्यांना आणि पोट भरणाऱ्या स्थानिकांना एकच नियम लावायला हवा एवढीच अपेक्षा आहे.

सध्यातरी माथेरानकरांचे म्हणणे एवढेच आहे की, आम्ही सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधलेल्या आमच्या घराच्या वर केवळ एकच मजला बांधकाम चढवले आहे, ते हरित लवाद का पाडतेय? बांधकाम पाडायचे हादेखील पर्यावरणाचा एक प्रकारचा ऱ्हासच नाही का? मात्र ही गोष्ट ना पर्यावरणवाल्यांच्या लक्षात येते, ना दिल्लीत बसलेल्या हरित लवादाच्या. तोफेची सलामी द्यायची एवढे सगळ्यांना कळते; पण तोफेच्या तोंडाला येणाऱ्यांचे काय याचा विचार मात्र कोणीच करत नाही, हीच माथेरानकरांची खंत आहे...