शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानकरांचे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 23:28 IST

माथेरान म्हणजे मुंबई नव्हे, कुणीही आले आणि जमिनी घेऊन हवे तसे मालक वा बिल्डर झाले. हव्या तशा झोपड्या बांधल्या आणि झोपड्यांचे इमले करून पुन्हा बिल्डरला देऊन टॉवर उभे केले

माथेरान म्हणजे मुंबई नव्हे, कुणीही आले आणि जमिनी घेऊन हवे तसे मालक वा बिल्डर झाले. हव्या तशा झोपड्या बांधल्या आणि झोपड्यांचे इमले करून पुन्हा बिल्डरला देऊन टॉवर उभे केले. हे सगळे मुंबईसारख्या मायानगरीत शक्य आहे. कारण मायानगरीच ती, तिथे कोण कुणाला रोखणार? पण मुंबईच्याच बाजूला असे एक निवांत गाव असावे जिथे कुणी निसर्गावर अतिक्र मण करू नये, जिथे निसर्ग जिवंत राहावा असा तब्बल १५० ते १६५ वर्षांपूर्वी इंग्रजांनी प्रयत्न केला. १८५० साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फीस्टन्स यांनी मुंबईच्या बाजूला थंड हवेचे ठिकाण असावे म्हणून माथेरानला हिल स्टेशनचा दर्जा दिला.

१९०७ साली आदमजी पिरभॉय यांनी २० किमी लांबीच्या माथेरान लाईट वेट रेल्वेची उभारणी केली. त्याचवेळी इंग्रज सरकारने या पठारावरील जवळपास ५०० एकर जागा मुंबईच्या धनिक बंगलेवाल्यांना दिली, तर उरलेली केवळ ५४ एकर जागा स्थानिक गावकऱ्यांना राहण्यासाठी दिली. तसे पाहिले तर हा शुद्ध अन्याय आहे. पण पैशाने सगळे विकत घेता येते हे धनिकांनी इंग्रजांच्या काळातही दाखवून दिले. बंगलेवाले केवळ विकेण्डला या हिल स्टेशनवर येतात, तर गावकरी पर्यटकांना सेवा-सुविधा पुरवणारे व्यवसाय चालवून आपले पोट भरतात. देश स्वतंत्र झाला तेव्हा माथेरानची लोकसंख्या ७०० ते ८०० एवढी होती. आज ६५ वर्षांत ती ४३८८ इतकी वाढली आहे.

लोकसंख्या वेगाने वाढतेय, येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील वाढत आहे, पण जमीन मात्र इंचभरही वाढत नाही. उलट हवामान बदलाच्या परिणामांमुळे पर्यावरणाचे नियम मात्र जाचक होत चाललेत. माथेरानवर जमीन वाढू शकत नाही ही स्पष्ट बाब आहे, आणि माथेरान हे पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील ठिकाण आहे. त्यामुळे या पठारावर किती लोकांनी राहायचे, किती बांधकाम करायचे तसेच किती झाडे तोडायची या प्रत्येक गोष्टीला काही बंधने आहेत. फक्त विषय एवढाच आहे की, स्थानिक महसूल, वन आणि नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी पैसेवाल्यांना आणि पोट भरणाऱ्या स्थानिकांना एकच नियम लावायला हवा एवढीच अपेक्षा आहे.

सध्यातरी माथेरानकरांचे म्हणणे एवढेच आहे की, आम्ही सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधलेल्या आमच्या घराच्या वर केवळ एकच मजला बांधकाम चढवले आहे, ते हरित लवाद का पाडतेय? बांधकाम पाडायचे हादेखील पर्यावरणाचा एक प्रकारचा ऱ्हासच नाही का? मात्र ही गोष्ट ना पर्यावरणवाल्यांच्या लक्षात येते, ना दिल्लीत बसलेल्या हरित लवादाच्या. तोफेची सलामी द्यायची एवढे सगळ्यांना कळते; पण तोफेच्या तोंडाला येणाऱ्यांचे काय याचा विचार मात्र कोणीच करत नाही, हीच माथेरानकरांची खंत आहे...