शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
4
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
5
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
6
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
7
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
8
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
9
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
10
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
12
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
13
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
14
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
15
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
16
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
17
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
18
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
19
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
20
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली

शिक्षणात मराठवाडा अव्वल

By admin | Updated: June 28, 2017 00:14 IST

जेईई-अ‍ॅडव्हान्स, एनईईटीच्या निकालात मराठवाड्याने उत्तुंग भरारी घेतली़ एकीकडे ज्ञानशाखांच्या संगमाचे शतक सुरु असताना मराठवाड्यातील बुद्धिमत्ता

 - धर्मराज हल्लाळे

जेईई-अ‍ॅडव्हान्स, एनईईटीच्या निकालात मराठवाड्याने उत्तुंग भरारी घेतली़ एकीकडे ज्ञानशाखांच्या संगमाचे शतक सुरु असताना मराठवाड्यातील बुद्धिमत्ता मर्यादित शाखांपुरती राहू नये, यासाठी केंद्र सरकारने एम्स, आयआयटी, आयआयएम, नॅशनल लॉ स्कूलसारख्या संस्था इथे का आणू नयेत, हा सवाल आहे़जेईई अ‍ॅडव्हान्स, एनईईटी या देशपातळीवरील अनुक्रमे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये लातूर, नांदेड, औरंगाबादेतील विद्यार्थ्यांनी घेतलेली झेप गुणवत्तेचा टक्का वाढविणारी आहे़ लातूरच्या एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील ४८२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल़ हा एक अद्वितीय विक्रमच आहे़ दयानंद विज्ञान महाविद्यालयातील ७४ विद्यार्थी ४०० गुणांवरील असून, त्यांना हमखास प्रवेश मिळेल. शाहू, दयानंदसोबतच त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानच्या ३१, डॉ़चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी ४०० पेक्षा अधिक गुण मिळविले. जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या निकालातही गुणवत्तेचा आलेख उंचावला.लातूर शहरातील देशीकेंद्र, केशवराज सारख्या शाळा व शाहू, दयानंद या महाविद्यालयांनी सुरु केलेली निकालाची परंपरा आजही कायम आहे़ त्यात अन्य संस्थाही स्वत:चा ठसा उमटवित आहेत़ खाजगी शिकवणी वर्गाचा विषय नेहमीच चर्चेचा राहतो़ परंतु, निकोप स्पर्धेमुळे, सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नाने शैक्षणिक भरभराट होताना दिसते़ नांदेडमधूनही एनईईटीमध्ये ६०० वर गुण मिळविणारे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये आँचल काबरा हिने ६६३ गुण घेत अव्वल स्थान पटकाविले़ ‘शाहू’चा विवेक शामंते अनुसूचित जमाती प्रवर्गात देशात पाचवा आला़ जेईई-अ‍ॅडव्हान्समध्ये औरंगाबादचा ओंकार देशपांडे याने इतिहास घडवत देशातून ८ वा क्रमांक मिळविला़ एकूणच देशपातळीवरील स्पर्धेत मराठवाड्याचा निकाल गुणवत्तेचा अनुशेष भरून काढणारा आहे़ मागासलेपणाचा शिक्का नव्या पिढीने पुसण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यांना भक्कम साथ मिळाली तर ही गुणवत्ता राज्य अन् देशात यापुढेही चमकत राहील़ एखाद्या शहरातून हजाराच्या जवळपास विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात असतील, आयआयटी सारख्या संस्थांमध्ये मराठवाडा ठळकपणे दिसत असेल तर केंद्र, राज्य सरकार या गुणवत्तेकडे कसे पाहते हेही महत्त्वाचे आहे़ या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कितपत दखलपात्र आहे, याची पडताळणी करावी लागेल़ उद्योग, शेती अन् विकासाच्या मुद्यावर मराठवाड्यात दुय्यमत्वाची भावना आहे़ निदान विद्यार्थ्यांचे लखलखीत यश पाहून इथल्या गुणवत्तेचा, बुद्धीमत्तेचा सर्वांगीण विनियोग करण्याची भूमिका घेतली जाईल का हा प्रश्न आहे़ देश अन् राज्यातील नावाजलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात पहिले दहा विद्यार्थी इथले असतील तर त्यांना इतरही राष्ट्रीय संस्थांमध्येही लौकिक मिळविण्याची संधी दिली गेली पाहिजे़ देशात नव्याने तीन एम्स उभारले जाणार आहेत़ त्यातील एक महाराष्ट्रात दिले जाईल़ गुणवत्तेच्या निकषावर ते मराठवाड्याला का मिळू नये. एखादे राष्ट्रीय विद्यापीठ, नॅशनल लॉ स्कुल, आयआयटी ही संस्था औरंगाबाद, नांदेड, लातूर येथे का स्थापित केली जावू नये़ लातूरचे देवणी, नांदेडचे लालकंधारी वाण प्रसिद्ध आहे़ त्या अनुषंगाने नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांमध्ये इथल्या गुणवत्तेला वाव मिळाला पाहिजे़ परभणी, नांदेड या भागांमध्ये कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते़ त्यासाठी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगला वाव आहे़ मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सची एक शाखा मराठवाड्यात तुळजापूरला आहे़ तिथे देशभरातून आलेले विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत़ याच धर्तीवर ग्रामीण विकासावर आधारित शैक्षणिक प्रकल्प, संशोधन संस्था शासनाकडून उभारल्या तर इथली गुणवत्ता एक दोन शाखांपुरती मर्यादित राहणार नाही़ ज्यामुळे मराठवाड्यात ग्रामीण चेहरा असलेल्या शहरांमध्ये उभे राहणारे शैक्षणिक हब अधिक चौफेर होतील.