शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मनाचिये गुंथी - सुधारकांचा महाराष्ट्र

By admin | Updated: May 4, 2017 00:18 IST

महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली. लोकपरंपरा लाभली तशीच सुधारकांचीही परंपरा लाभली. बाळशास्री जांभेकरांपासून सुरू झालेली

महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली. लोकपरंपरा लाभली तशीच सुधारकांचीही परंपरा लाभली. बाळशास्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे पुढे नेत होती. लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, रा.गो. भांडारकर, स्वा. सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर बुद्धिवादी विचारवंत म्हणून गोपाळ गणेश आगरकरांचे नावही अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आचार्य अत्र्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी व अभंग उक्तीची स्फूर्तिभूमी आहे. महाराष्ट्र ही अमर पराक्रमाची रणभूमी आहे आणि अलौकिक त्यागाची आणि सेवेची यज्ञभूमी आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या भूमीच्या सुपुत्रांनी वेळोवेळी बंडाचे निशाण उभारून बुद्धिप्रामाण्यवाद मांडला. महाराष्ट्राची बंडखोरांची परंपरा आगरकरांनी वैचारिक क्षेत्रापर्यंत आणून ठेवली. ‘लोकहितवादींची शतपत्रे’ म्हणजे बुद्धिवादी विचारातून घडलेले एक वैचारिक प्रबोधनपर्व म्हणावे लागेल. मुंबईत भाऊ महाजन यांनी सुरू केलेल्या प्रभाकर या साप्ताहिकात १८४८पासून त्यांनी देशबांधवांना उद्देशून शंभर पत्रे लिहिली. त्यात त्यांनी समाजाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक अशा अनेक अंगांचे मूलभूत परीक्षण केले. संपत्तीनिरपेक्ष आणि जातीनिरपेक्ष बंधुभाव व समानता यांनी ओथंबलेली राष्ट्रवादाची कल्पना त्यांनी मांडली आणि बालविवाहास प्रतिबंध, विधवा विवाह, स्त्रीशिक्षण, जातीनिर्बंधास विरोध, पुनर्विवाह, व्यक्तिस्वातंत्र्य या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. ज्या काळात मार्क्सचा सिद्धांत रुजला नव्हता त्या काळात लोकहितवादींनी गरिबांची, श्रमजीविकांची, दलितांची बाजू घेऊन त्यांच्या प्रतिष्ठेला मोठेपणा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सन १८९६मध्ये भरलेल्या सामाजिक परिषदेमध्ये न्या. रानडे यांनी म्हटले आहे की, मानवाला पूर्णत्व प्राप्त करून देणे हेच सुधारणेचे प्रयोजन आहे. जन्मनिष्ठेपेक्षा गुणनिष्ठेची जोपासना केली पाहिजे, अंधदैववादाऐवजी मानवाची प्रतिष्ठा वाढायला हवी. सामाजिकी- करणाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या न्या. रानडे यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. ‘जग हे परिवर्तनशील आहे आणि बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मानवाने आपले विचार, आचार आणि जीवनपद्धती परिस्थितीनुसार बदलली पाहिजेत, असे सांगून आगरकरांनी ‘सुधारक’ या वृत्तपत्रातून निखळ, बुद्धिवाद प्रथम महाराष्ट्राला शिकवला. म. फुले यांनी ‘दीनबंधू’ आणि ‘सत्यशोधक’, जांभेकरांचे ‘दर्पण’, लोकहितवादींची ‘शतपत्रे’, आगरकरांचे ‘सुधारक,’ म.फुलेंचे ‘दीनबंधू’, डॉ. आंबेडकरांचे ‘समाजचिंतन’ हे ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची नवसंहिताच होय. महाराष्ट्राला पुरोगामी करण्यात सुधारकांचे विचार आणि साहित्य खरे कारणीभूत ठरले आहे. सुधारकांच्या विचारांपासून दुरावणे हाच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा पराभव म्हणावा लागेल. डॉ. - रामचंद्र देखणे -