शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - संपूर्ण व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:08 IST

मानवाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या अस्तित्वाची आधारशीला असते. मानवाच्या संपूर्ण जीवनाची प्रगती तसेच अधोगती त्याच्या

मानवाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या अस्तित्वाची आधारशीला असते. मानवाच्या संपूर्ण जीवनाची प्रगती तसेच अधोगती त्याच्या व्यक्तिमत्त्वावरच अवलंबून असते. यामुळेच ‘व्यक्त्तिमत्त्व विकास’ एक अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्र म्हणून विकसित झाले आहे.व्यक्तिमत्त्वाची व्याख्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. आधुनिक मनोविज्ञानाने व्यक्तिमत्त्व म्हणजे विचार, वाणी आणि कर्म यांचा संपूर्ण जमाखर्च आहे असे म्हटलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात तसेच योग शास्त्रामध्ये व्यक्तिमत्त्वाची स्पष्ट व्याख्या दिलेली आहे. उपनिषदामध्ये पंचकोशांचे वर्णन केलेले आहे. हे पाच कोश म्हणजेच - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय. अन्नमय कोश म्हणजेच आपले शरीर. ते अन्नापासून तयार झाले आहे. या कोशापेक्षा सूक्ष्म कोश प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आपली ऊर्जा होय, जी आपल्याला पूर्णपणे संचलित करते. प्राणमय कोशापेक्षाही सूक्ष्म कोश मनोमय कोश आहे. मनोमय कोश आपल्या अनंत मनाचा विस्तार आहे. त्यापेक्षाही सूक्ष्म कोश म्हणजे विज्ञानमय कोश. जे आपल्या चेतनेशी संबंधित आहे. या चारही कोशापेक्षा सर्वांत सूक्ष्म कोश आहे आनंदमय कोश. हे आनंदमय कोश म्हणजेच मानवाचा मूळ स्वभाव होय आणि त्याला प्राप्त करण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे कर्म करतो. हे पाच कोशच आपले व्यक्तिमत्त्व तयार करते. आपले शरीर या व्यक्तिमत्त्वाचा पहिला भाग आहे. अर्थात त्यामुळेच त्याला स्वच्छ व स्वस्थ ठेवण्याबाबत बोलले जाते. आयुर्वेदामध्ये शरीराचे स्वास्थ्य कसे सुरक्षित ठेवले पाहिजे याबाबत उपाय सांगितलेले आहेत. योगशास्त्रात अन्नमय कोशाला व्यवस्थित ठेवण्यासाठी आसनाचे तर प्राणायम कोशाला व्यवस्थित ठेवण्यासाठी प्राणायम करण्याबाबत सांगितले आहे. मनाच्या वृत्तीला नियंत्रित करण्यासाठी योगाचा पर्याय सुचविला आहे. त्याशिवाय काही वेगळ्या योगाची चर्चा आहे जे आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतात. या पाच कोशाचे वर्णन भारतीय वैचारिक तथा दार्शनिक चिंतनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे पाच कोश एकमेकांपासून वेगळे न होता परस्पर अनन्य रूपात जोडलेले असतात. एक कोश दुसऱ्या कोशाला प्रभावित करतो. ज्याप्रमाणे समुद्रात उसळलेली लाट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाते, त्याचप्रमाणे एका कोशामार्फत होणारी क्रिया दुसऱ्या कोशापर्यंत पोहोचते. पूर्ण व्यक्तिमत्त्व त्यालाच प्राप्त होते, ज्याचे सर्व कोश विकसित व संतुलित आहेत. यासाठी भारतीय परंपरेत अनेक मार्ग सांगितलेले आहेत. या मार्गांना आपण ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोगाच्या श्रेणीत ठेवूशकतो.डॉ. भूषणकुमार उपाध्याय