शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - जाणिजे यज्ञकर्म

By admin | Updated: February 22, 2017 00:23 IST

विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़

विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़ अन्न हे पूर्णब्रह्म मानून यज्ञकर्म म्हणून सेवन करायचे़ आवडीच्या पदार्थांचा आग्रह आणि भरपेट भोजन संपले़ बुफे पद्धत आल्यामुळे ज्याला जेवढे आवश्यक तेवढेच घ्यायचे. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबली, यज्ञकर्म ही भावना लोपली़ उदरभरण हेच दृढ झाले़ नवनवे पदार्थ आले़ माणसाच्या जिभेची चवच बदलली़ चांगल्या गावठी तुपाचा वास अनेकांना मानवेना़ गीतगोविंदकार जयदेवाने ‘शर्करे कर्कषासि’ असे मोठ्या अभिमानाने गीतगोविंद काव्याची महती गाताने लिहिले आहे़ शर्करा शब्दामधील कर्कषपणा म्हणजे आजचा ‘मधुमेह’ वाढला आहे़ मराठी खाद्य संस्कृतीमध्ये वारंवार भेटणारे गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, शिरा फार फार तर गुलाब जामुऩ थालिपीठ, धपाटे, झुणकाभाकर, भरलीवांगी, मिरचीचा ठेचा, ओंजळभर भाजलेल्या शेंगा, एखादा कांदा असा बेत जमला तर मराठी मनाला स्वर्ग दोन बोटे उरतो़ ही सुग्रास भोजनाची परिसीमा़ आजचा मराठी माणूस मराठी थाळी परिपूर्ण, असली तरी जेवायला कौतुकाने मागवत नाही़ गुजराथी, राजस्थानी थाळी, पंजाबी डिशेस यांचीच रेलचेल़ स्टार्टर्स, सूप प्रत्येकाच्या पसंतीचे़ जाताना बडीशेप आणि दात टोकरायला काडी घेऊनच हॉटेल सोडायचे़ दाक्षिणात्यांनी इडली-डोसा-मेदूवडा लोकप्रिय केले़ पंजाबची ‘मकईकी रोटी और सरसों का साग’ खाणारा हिरो हिंदी चित्रपटात लोकप्रिय ठरला़ चायनाने तर सर्वांवर फास्टफु डची कुरघोडी केली़ उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खायला हॉटेलात जायची गरज उरली नाही़ महाराष्ट्राने म्हणजेच मराठी माणसाने आपल्या खाद्यपदार्थाची ओळख जगाला करूनच दिली नाही़ ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा़ ही आपली पराक्रमी ओळख़ चीनच्या आक्रमणात ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा आपला वीरत्वाचा परिचय़ खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत मात्र आपण जगाच्या पाठीवर एकदम मागे म्हणजे मागासलेलेच राहिलो़ मिळू द्या की मराठमोळी थाळी देशाच्या कानाकोपऱ्यात़ थालिपीठ, धपाटे, झुणका-भाकर का होऊ द्या की कॉण्टिनेण्टल मेनू़ वाजू द्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा डंका़ अटकेपार झेंडे लावण्याचा पुरुषार्थ पूर्वजांनी दाखविला़ भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने विश्वसंचार केला़ संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबात फडकवली़‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही आपली परंपरा़ जगाला विठोबाचा परिचय करून दिलात पोटोबाचा केव्हा करून देणार? बा मराठी माणसा घे थोडे मनावर आणि लाग कामाला़ डॉ. गोविंद काळे