शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

मनाचिये गुंथी - जाणिजे यज्ञकर्म

By admin | Updated: February 22, 2017 00:23 IST

विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़

विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़ अन्न हे पूर्णब्रह्म मानून यज्ञकर्म म्हणून सेवन करायचे़ आवडीच्या पदार्थांचा आग्रह आणि भरपेट भोजन संपले़ बुफे पद्धत आल्यामुळे ज्याला जेवढे आवश्यक तेवढेच घ्यायचे. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबली, यज्ञकर्म ही भावना लोपली़ उदरभरण हेच दृढ झाले़ नवनवे पदार्थ आले़ माणसाच्या जिभेची चवच बदलली़ चांगल्या गावठी तुपाचा वास अनेकांना मानवेना़ गीतगोविंदकार जयदेवाने ‘शर्करे कर्कषासि’ असे मोठ्या अभिमानाने गीतगोविंद काव्याची महती गाताने लिहिले आहे़ शर्करा शब्दामधील कर्कषपणा म्हणजे आजचा ‘मधुमेह’ वाढला आहे़ मराठी खाद्य संस्कृतीमध्ये वारंवार भेटणारे गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, शिरा फार फार तर गुलाब जामुऩ थालिपीठ, धपाटे, झुणकाभाकर, भरलीवांगी, मिरचीचा ठेचा, ओंजळभर भाजलेल्या शेंगा, एखादा कांदा असा बेत जमला तर मराठी मनाला स्वर्ग दोन बोटे उरतो़ ही सुग्रास भोजनाची परिसीमा़ आजचा मराठी माणूस मराठी थाळी परिपूर्ण, असली तरी जेवायला कौतुकाने मागवत नाही़ गुजराथी, राजस्थानी थाळी, पंजाबी डिशेस यांचीच रेलचेल़ स्टार्टर्स, सूप प्रत्येकाच्या पसंतीचे़ जाताना बडीशेप आणि दात टोकरायला काडी घेऊनच हॉटेल सोडायचे़ दाक्षिणात्यांनी इडली-डोसा-मेदूवडा लोकप्रिय केले़ पंजाबची ‘मकईकी रोटी और सरसों का साग’ खाणारा हिरो हिंदी चित्रपटात लोकप्रिय ठरला़ चायनाने तर सर्वांवर फास्टफु डची कुरघोडी केली़ उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खायला हॉटेलात जायची गरज उरली नाही़ महाराष्ट्राने म्हणजेच मराठी माणसाने आपल्या खाद्यपदार्थाची ओळख जगाला करूनच दिली नाही़ ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा़ ही आपली पराक्रमी ओळख़ चीनच्या आक्रमणात ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा आपला वीरत्वाचा परिचय़ खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत मात्र आपण जगाच्या पाठीवर एकदम मागे म्हणजे मागासलेलेच राहिलो़ मिळू द्या की मराठमोळी थाळी देशाच्या कानाकोपऱ्यात़ थालिपीठ, धपाटे, झुणका-भाकर का होऊ द्या की कॉण्टिनेण्टल मेनू़ वाजू द्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा डंका़ अटकेपार झेंडे लावण्याचा पुरुषार्थ पूर्वजांनी दाखविला़ भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने विश्वसंचार केला़ संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबात फडकवली़‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही आपली परंपरा़ जगाला विठोबाचा परिचय करून दिलात पोटोबाचा केव्हा करून देणार? बा मराठी माणसा घे थोडे मनावर आणि लाग कामाला़ डॉ. गोविंद काळे