शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - जाणिजे यज्ञकर्म

By admin | Updated: February 22, 2017 00:23 IST

विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़

विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़ अन्न हे पूर्णब्रह्म मानून यज्ञकर्म म्हणून सेवन करायचे़ आवडीच्या पदार्थांचा आग्रह आणि भरपेट भोजन संपले़ बुफे पद्धत आल्यामुळे ज्याला जेवढे आवश्यक तेवढेच घ्यायचे. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबली, यज्ञकर्म ही भावना लोपली़ उदरभरण हेच दृढ झाले़ नवनवे पदार्थ आले़ माणसाच्या जिभेची चवच बदलली़ चांगल्या गावठी तुपाचा वास अनेकांना मानवेना़ गीतगोविंदकार जयदेवाने ‘शर्करे कर्कषासि’ असे मोठ्या अभिमानाने गीतगोविंद काव्याची महती गाताने लिहिले आहे़ शर्करा शब्दामधील कर्कषपणा म्हणजे आजचा ‘मधुमेह’ वाढला आहे़ मराठी खाद्य संस्कृतीमध्ये वारंवार भेटणारे गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, शिरा फार फार तर गुलाब जामुऩ थालिपीठ, धपाटे, झुणकाभाकर, भरलीवांगी, मिरचीचा ठेचा, ओंजळभर भाजलेल्या शेंगा, एखादा कांदा असा बेत जमला तर मराठी मनाला स्वर्ग दोन बोटे उरतो़ ही सुग्रास भोजनाची परिसीमा़ आजचा मराठी माणूस मराठी थाळी परिपूर्ण, असली तरी जेवायला कौतुकाने मागवत नाही़ गुजराथी, राजस्थानी थाळी, पंजाबी डिशेस यांचीच रेलचेल़ स्टार्टर्स, सूप प्रत्येकाच्या पसंतीचे़ जाताना बडीशेप आणि दात टोकरायला काडी घेऊनच हॉटेल सोडायचे़ दाक्षिणात्यांनी इडली-डोसा-मेदूवडा लोकप्रिय केले़ पंजाबची ‘मकईकी रोटी और सरसों का साग’ खाणारा हिरो हिंदी चित्रपटात लोकप्रिय ठरला़ चायनाने तर सर्वांवर फास्टफु डची कुरघोडी केली़ उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खायला हॉटेलात जायची गरज उरली नाही़ महाराष्ट्राने म्हणजेच मराठी माणसाने आपल्या खाद्यपदार्थाची ओळख जगाला करूनच दिली नाही़ ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा़ ही आपली पराक्रमी ओळख़ चीनच्या आक्रमणात ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा आपला वीरत्वाचा परिचय़ खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत मात्र आपण जगाच्या पाठीवर एकदम मागे म्हणजे मागासलेलेच राहिलो़ मिळू द्या की मराठमोळी थाळी देशाच्या कानाकोपऱ्यात़ थालिपीठ, धपाटे, झुणका-भाकर का होऊ द्या की कॉण्टिनेण्टल मेनू़ वाजू द्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा डंका़ अटकेपार झेंडे लावण्याचा पुरुषार्थ पूर्वजांनी दाखविला़ भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने विश्वसंचार केला़ संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबात फडकवली़‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही आपली परंपरा़ जगाला विठोबाचा परिचय करून दिलात पोटोबाचा केव्हा करून देणार? बा मराठी माणसा घे थोडे मनावर आणि लाग कामाला़ डॉ. गोविंद काळे